शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

राष्ट्र व संस्कृत भाषेची सेवा करा : जगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:22 IST

भाषा ही देशाच्या अस्मितेचे प्रतीक असते. संस्कृत ही संस्कारांची भाषा आहे. संस्कृतच्या माध्यमातून लोक एकजूट व सुसंस्कृत होतात. हेच या भाषेचे सामर्थ्य आहे. विद्यार्थ्यांनी देश व संस्कृत भाषा या दोघांचीही सेवा केली पाहिजे, असे मत रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय, चित्रकूट, उत्तर प्रदेश येथील कुलपतीजगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी व्यक्त केले. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभादरम्यान ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देकविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाषा ही देशाच्या अस्मितेचे प्रतीक असते. संस्कृत ही संस्कारांची भाषा आहे. संस्कृतच्या माध्यमातून लोक एकजूट व सुसंस्कृत होतात. हेच या भाषेचे सामर्थ्य आहे. विद्यार्थ्यांनी देश व संस्कृत भाषा या दोघांचीही सेवा केली पाहिजे, असे मत रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय, चित्रकूट, उत्तर प्रदेश येथील कुलपतीजगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी व्यक्त केले. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभादरम्यान ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.श्रीनिवास वरखेडी हे होते तर ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर हेदेखील उपस्थित होते. मानवाचे जीवन हे यज्ञासारखे आहे. दीक्षेचा अर्थ स्वत:चा विचार न करता राष्ट्राला जीवन अर्पण करणे हा होता. वाईट गोष्टींपासून दूर राहणे हेच दीक्षाव्रताचे आचरण आहे. देश, आई-वडील, गुरू, अतिथी यांच्याप्रति असलेल्या कर्तव्यांचे योग्य पद्धतीने निर्वाहन करणे हाच दीक्षेचा उपदेश आहे, असे रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी सांगितले. डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी प्रास्ताविक केले.मधुरा,श्रीवरदाला सर्वाधिक पदकेदीक्षांत समारंभात योग, योगविज्ञान, वास्तू, जर्मन, वेद, ग्रंथालयशास्त्र, ज्योतिष, कीर्तन, प्रशासकीय सेवा, शिक्षण, संगणक उपायोजन, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला व ललित कला यासारख्या ३५ विषयांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ६२ पदके व २८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तर २३ संशोधकांना ‘पीएचडी’ प्रदान करण्यात आली. एम.ए.संस्कृत विषयात अव्वल राहिलेली मधुरा यशवंत कायंदे व श्रीवरदा श्रीपाद मालगे यांना प्रत्येकी सात पदके व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.गुणवंतांना बसला अव्यवस्थेचा फटकादीक्षांत समारंभादरम्यान अव्यवस्थेमुळे गुणवंतांना नाहक मनस्ताप झाला. कार्यक्रम लवकर आवरता घेण्याच्या प्रयत्नात सात गुणवंतांना मंचावर बोलविण्याचाच प्रशासनाला विसर पडला. समारंभानंतर विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे याची तक्रार केली. यानंतर विद्यार्थ्यांना पदके व पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांना मंचावर पदवी प्रदान करण्यात येत असताना इतर विद्यार्थीदेखील छायाचित्र काढण्यासाठी मंचावर चढले. अव्यवस्था दूर करण्यासाठी एकाही अधिकाऱ्याने पुढाकार घेतला नाही.

 

टॅग्स :Kavi Kulguru Kalidas Sanskrit Universityकवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठStudentविद्यार्थी