शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

राष्ट्र व संस्कृत भाषेची सेवा करा : जगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:22 IST

भाषा ही देशाच्या अस्मितेचे प्रतीक असते. संस्कृत ही संस्कारांची भाषा आहे. संस्कृतच्या माध्यमातून लोक एकजूट व सुसंस्कृत होतात. हेच या भाषेचे सामर्थ्य आहे. विद्यार्थ्यांनी देश व संस्कृत भाषा या दोघांचीही सेवा केली पाहिजे, असे मत रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय, चित्रकूट, उत्तर प्रदेश येथील कुलपतीजगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी व्यक्त केले. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभादरम्यान ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देकविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाषा ही देशाच्या अस्मितेचे प्रतीक असते. संस्कृत ही संस्कारांची भाषा आहे. संस्कृतच्या माध्यमातून लोक एकजूट व सुसंस्कृत होतात. हेच या भाषेचे सामर्थ्य आहे. विद्यार्थ्यांनी देश व संस्कृत भाषा या दोघांचीही सेवा केली पाहिजे, असे मत रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय, चित्रकूट, उत्तर प्रदेश येथील कुलपतीजगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी व्यक्त केले. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभादरम्यान ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.श्रीनिवास वरखेडी हे होते तर ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर हेदेखील उपस्थित होते. मानवाचे जीवन हे यज्ञासारखे आहे. दीक्षेचा अर्थ स्वत:चा विचार न करता राष्ट्राला जीवन अर्पण करणे हा होता. वाईट गोष्टींपासून दूर राहणे हेच दीक्षाव्रताचे आचरण आहे. देश, आई-वडील, गुरू, अतिथी यांच्याप्रति असलेल्या कर्तव्यांचे योग्य पद्धतीने निर्वाहन करणे हाच दीक्षेचा उपदेश आहे, असे रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी सांगितले. डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी प्रास्ताविक केले.मधुरा,श्रीवरदाला सर्वाधिक पदकेदीक्षांत समारंभात योग, योगविज्ञान, वास्तू, जर्मन, वेद, ग्रंथालयशास्त्र, ज्योतिष, कीर्तन, प्रशासकीय सेवा, शिक्षण, संगणक उपायोजन, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला व ललित कला यासारख्या ३५ विषयांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ६२ पदके व २८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तर २३ संशोधकांना ‘पीएचडी’ प्रदान करण्यात आली. एम.ए.संस्कृत विषयात अव्वल राहिलेली मधुरा यशवंत कायंदे व श्रीवरदा श्रीपाद मालगे यांना प्रत्येकी सात पदके व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.गुणवंतांना बसला अव्यवस्थेचा फटकादीक्षांत समारंभादरम्यान अव्यवस्थेमुळे गुणवंतांना नाहक मनस्ताप झाला. कार्यक्रम लवकर आवरता घेण्याच्या प्रयत्नात सात गुणवंतांना मंचावर बोलविण्याचाच प्रशासनाला विसर पडला. समारंभानंतर विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे याची तक्रार केली. यानंतर विद्यार्थ्यांना पदके व पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांना मंचावर पदवी प्रदान करण्यात येत असताना इतर विद्यार्थीदेखील छायाचित्र काढण्यासाठी मंचावर चढले. अव्यवस्था दूर करण्यासाठी एकाही अधिकाऱ्याने पुढाकार घेतला नाही.

 

टॅग्स :Kavi Kulguru Kalidas Sanskrit Universityकवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठStudentविद्यार्थी