शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बिबट मृत्यु प्रकरणात मानद वन्यजीव संरक्षकांचे गंभीर आराेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 23:23 IST

leopard death case खापा वनपरिक्षेत्रातील बिबट मादी व तिचे पिल्लू यांच्या पाण्याअभावी झालेल्या मृत्यूप्रकरणात वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीत खोटारडेपणा असल्याचा गंभीर आराेप नागपूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक अविनाश लाेंढे यांनी केला आहे.

ठळक मुद्देवन अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणा केल्याचा आराेप : कठाेर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खापा वनपरिक्षेत्रातील बिबट मादी व तिचे पिल्लू यांच्या पाण्याअभावी झालेल्या मृत्यूप्रकरणात वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीत खोटारडेपणा असल्याचा गंभीर आराेप नागपूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक अविनाश लाेंढे यांनी केला आहे.

अविनाश लाेंढे यांनी बिबटांच्या मृत्यूपासून ते शवविच्छेदनापर्यंत घडलेल्या घडामाेडींवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते शवविच्छेदन करण्याकरिता सावनेर येथील पशुधन विकास अधिकारी रोहिणी बावसकर यांच्यासह वनविभागाच्या ट्रान्झिट सेंटरचे डॉ बिलाल अली उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. मात्र डाॅ. बिलाल हे संपूर्ण दिवस नागपुरातील बिबट शोध मोहिमेत होते व ते खापा येथे गेलेच नसल्याने त्यांची उपस्थिती दर्शविणे हा वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा खाेटेपणा उघड करीत असल्याचा आराेप लाेंढे यांनी केला.

बिबट शेड्युल एक मध्ये येतो तेव्हा उपवनसंरक्षक किंवा सहायक वनसंरक्षक यांनी घटनास्थळी जाण्याचे का टाळले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतकी मोठी घटना घडली असतांना अधिकारी घटनास्थळी का पोहचले नाही? त्यांना बिबट मादी व पिल्लू यांच्या मृत्यूचे गांभीर्य नसल्याचे दिसते. दोघांचेही मृत्यू पाणी न मिळाल्याने झाले आहेत. शवविच्छेदनसमध्ये त्यांचे सर्व अंतर्गत अवयव डिहायड्रेट झालेले आढळले. वन्यजीवांना उन्हाळ्यात पाणी पुरवणे हे वनधिकाऱ्यांचे काम आहे. पाण्याअभावी वन्यजीवांचा मृत्यू होणे ही अतिशय गंभीर बाब असून जबाबदार वन अधिकाऱ्यावर कारवाई हाेणे आवश्यक असल्याची मागणी लाेंढे यांनी केली.

मानद वन्यजीव रक्षकाची भूमिका संशयास्पद

नागपूर जिल्ह्यात चार मानद वन्यजीव रक्षक आहेत. असे असताना त्या अधिकाऱ्याला कुणीच कसे नाही मिळाले? मानद वन्यजीव रक्षकाचा प्रतिनिधी म्हणून आशिष कोहळे याला शवविच्छेदन दरम्यान नेमले किंवा मानद वन्यजीव रक्षकाने स्वतः न जाता प्रतिनिधी कसा पाठवला, त्यांना प्रतिनिधी ठेवायचा अधिकार कुणी दिला? परराज्यातून नागपूरचा मानद वन्यजीव रक्षकाचा कारभार चालवायचा असेल तर मानद वन्यजीव रक्षक बनून एक जागा का अडवली, असे गंभीर प्रश्न उपस्थित करीत संपूर्ण प्रकरणात गंभीर दखल घेऊन कठाेर कारवाईची मागणी अविनाश लाेंढे यांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यू