शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सप्टेंबर ठरला दु:खहर्ता; शहरात एकही मृत्यू नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 13:05 IST

सप्टेंबर महिन्यात नागपूर शहर व ग्रामीणमध्ये एकही मृत्यूची नोंद झाली नाही. एक मृत्यू हा जिल्ह्याबाहेरील रुग्णाचा होता. तर, कोरोनाचा या १९ महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा कोरोना संक्रमणाचा दर ०.०५ टक्क्यांवर आला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू : संक्रमणाचा दर ०.०५ टक्के

नागपूर : गणेश उत्सवाच्या दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, सप्टेंबर महिन्यात नागपूर शहर व ग्रामीणमध्ये एकही मृत्यूची नोंद झाली नाही. एक मृत्यू हा जिल्ह्याबाहेरील रुग्णाचा होता. विशेष म्हणजे, कोरोनाचा या १९ महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा कोरोना संक्रमणाचा दर ०.०५ टक्क्यांवर आला आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च २०२० रोेजी आढळून आला. या महिन्यात मृत्यूची नोंद नव्हती. परंतु, एप्रिल २०२० पासून रुग्णसंख्येसोबतच मृत्यूची संख्या वाढत गेली. या महिन्यात १२३ रुग्ण व २ मृत्यू झाले होते. सप्टेंबर २०२० मध्ये ४८,४५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर १४०६ मृत्यू झाले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील ही सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची संख्या होती. परंतु, त्या तुलनेत सप्टेंबर २०२१ मध्ये २७३ रुग्ण व १ मृत्यूची नोंद झाली. सध्या कोरोना रुग्णांत घसरण दिसून येत आहे. परंतु, दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहे. यामुळे धोका टळला नाही. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉक्टर करीत आहे.

३० दिवसांत तपासले ४,८१,६६१ नमुने

सप्टेंबर महिन्यात रोज ४ ते ५ हजारांदरम्यान कोरोना संशयिताचे नमुने तपासले जात होते. या ३० दिवसांत ४,८१,६६१ नमुने तपासण्यात आले. यात २७३ नमुने पॉझिटिव्ह आले. २६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ३१ ऑगस्ट रोजी कोरोनाचे ६६ रुग्ण सक्रिय असताना ३० सप्टेंबर रोजी ही संख्या वाढून ७३ वर पोहोचली.

४ नव्या रुग्णांची भर

नागपूर जिल्ह्यात शनिवारी ४ नव्या रुग्णांची भर पडली. यात शहरातील २, जिल्ह्याबाहेरील २ रुग्ण आहेत. सलग दुस-या दिवशी ग्रामीणमध्ये रुग्णांची नोंद झाली नाही. मागील १६ दिवसांपासून मृत्यूची संख्या स्थिर आहे. २४ तासांमध्ये ४०६५ चाचण्या झाल्या. यात शहरातील ३१३९ तर ग्रामीणमधील ९२६ चाचण्या आहेत. आज १४ रुग्ण बरे झाले. यात शहरातील १३, ग्रामीणमधील १ आहे. सध्या शहरात ४७, ग्रामीणमध्ये ९ तर जिल्ह्याबाहेरील ५ असे ६१ कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत.

९ महिन्यांतील मृत्यूची स्थिती

जानेवारी : २२४

फेब्रुवारी : १८१

मार्च : ७६३

एप्रिल : २२९०

मे : १५१४

जून १२३

जुलै : १६ (वाढीव १०९१)

ऑगस्ट : ३

सप्टेंबर : १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर