शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या वेगवेगळ्या घोषणांनी बाजारपेठांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:11 IST

नागपूर : कोरोना रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्याचे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असताना पालकमंत्र्यांसह अन्य मंत्री नागपूरसह ...

नागपूर : कोरोना रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्याचे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असताना पालकमंत्र्यांसह अन्य मंत्री नागपूरसह राज्यात लॉकडाऊनचे संकेत देत आहेत. पालकमंत्री नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यात वेळेच्या निर्बंधांसह संभाव्य लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनंतर विविध बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली असून, किरकोळ व्यापाऱ्यांनी ऑर्डर्स रद्द केल्या असून त्यामुळे होलसेल व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. व्यवसायाची प्रक्रिया थांबल्याचा आरोप नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आश्विन मेहाडिया यांनी बुधवारी पत्र परिषदेत केला.

रुग्ण वाढ नाही, मग बंधने कशाला?

मेहाडिया म्हणाले, मंत्र्यांनी व्यापारी संघटनांशी चर्चा करूनच घोषणा कराव्यात; पण सध्या नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीच्या घटना नसतानाही नितीन राऊत यांनी वेळेच्या निर्बंधाची संभाव्य घोषणा केली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. रुग्ण वाढले तर लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध नाही; पण अनावश्यक घोषणा करून मंत्री व्यापाऱ्यांना संकटात टाकत आहेत. व्यापाऱ्यांवर पूर्वीच कर्जाचा बोजा आहे आणि त्यातच या घोषणेने ते संकटात आले आहेत. गेल्यावेळी रुग्णसंख्या हजारावर गेल्यानंतर लॉकडाऊन लावले होते; पण आता रुग्णसंख्या दोन असताना वेळेचे निर्बंध का, असा सवाल मेहाडिया यांनी केला.

इन्स्पेक्टर राज येणार

बाजारपेठेत सर्वांचे दोन डोस झाले आहेत. दुकानदार मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेत आहेत. मंत्र्यांच्या निर्णयामुळे इन्स्पेक्टर राज येणार आहे. मनपाचे पथक केव्हाही येऊन दुकानदारांना दंड ठोठावणार आहे. अनेक नेते, अधिकारी व कर्मचारी मास्क घालत नाहीत. त्यांच्यावर दंड का ठोठावत नाही, असा सवाल मेहाडिया यांनी केला.

पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप, विदर्भाकडे कानाडोळा

नागपूर लेव्हल-१ मध्ये असतानाही राज्य सरकारने नागपूरला अडीच महिने वेळेच्या बंधनात ठेवले. तेव्हा पालकमंत्री काहीच बोलले नाहीत. या उलट पश्चिम महाराष्ट्रात सर्व दुकाने पूर्णवेळ सुरू होती. राज्यकर्ते विदर्भाकडे कानाडोळा करून अन्याय करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

-तर व्यापारी स्वत:च दुकाने बंद करतील

रूग्ण वाढू लागताच व्यापारी स्वत:च दुकाने बंद करतील. त्यावेळी वेळेचे निर्बंध लादल्यास व्यापारी विरोध करणार नाही; पण अनावश्यक निर्बंध लादल्यास व्यापारी विरोध करतील आणि आंदोलनाचा मार्गही पत्करतील. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत ते आधी सांगावे. व्यापारी नेहमीच सरकारसोबत आहोत, असेही ते म्हणाले.

पत्र परिषदेत चेंबरचे माजी अध्यक्ष हेमंत गांधी, सचिव रामअवतार तोतला, उपाध्यक्ष फारूक अकबानी, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, संजय अग्रवाल, अर्जुनदास आहुजा आणि शब्बीर उपस्थित होते.