शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून महिला मनोरुग्ण पळाल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 20:13 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कमी उंचीच्या संरक्षण भिंतीमुळे दरवर्षी आठ ते दहा रुग्ण पळून जायचे. यावर आवर घालण्यासाठी लाखो रुपये खर्च करून भिंतीची उंची वाढविण्यात आली. ३२ लाख रुपये खर्चून ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यानंतरही रुग्णालयातून मनोरुग्णांचे पळणे सुरूच आहे. शुक्रवारी पुन्हा एक ३६ वर्षीय महिला रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली. गेल्या तीन वर्षांत हे रुग्णालय मनोरुणाची हत्या, अत्याचार, मृत्यू आणि पळण्याच्या घटनेने चांगलेच चर्चेत राहिले आहे.

ठळक मुद्देदरवर्षी ८ ते १० रुग्ण काढतात पळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कमी उंचीच्या संरक्षण भिंतीमुळे दरवर्षी आठ ते दहा रुग्ण पळून जायचे. यावर आवर घालण्यासाठी लाखो रुपये खर्च करून भिंतीची उंची वाढविण्यात आली. ३२ लाख रुपये खर्चून ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यानंतरही रुग्णालयातून मनोरुग्णांचे पळणे सुरूच आहे. शुक्रवारी पुन्हा एक ३६ वर्षीय महिला रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली. गेल्या तीन वर्षांत हे रुग्णालय मनोरुणाची हत्या, अत्याचार, मृत्यू आणि पळण्याच्या घटनेने चांगलेच चर्चेत राहिले आहे.नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून रुग्ण पळून जातात, याकडे आ. तारासिंग यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर संरक्षण भिंतीची उंची वाढविण्यासाठी एक कोटी आठ लाखांचा निधी देण्यात आला. यामुळे सहा-सात फूट उंचीची भिंत बारा फुटाच्याही वर गेली. सामान्य व्यक्तीलाही ही भिंत ओलांडणे अवघड झाले. असे असताना, जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत पाचवर रुग्ण पळून गेले. विशेष म्हणजे, यातील चार रुग्ण हे मुख्य प्रवेशद्वारातून पळून गेले. गेल्या महिन्यात दोन रुग्ण तर चक्क रुग्णालयाच्या स्वयंपाकीची दुचाकी चोरून पळून गेले. त्यानंतर या महिन्यात पुन्हा एक ४० वर्षीय मनोरुग्ण पळून गेला. हा रुग्ण दिल्ली येथील एका बड्या घरातील असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, रुग्ण पळून जाणाऱ्या घटनांवर प्रतिबंध बसण्यासाठी व रुग्णांच्या सुरक्षेला घेऊन नुकतेच ३२ लाख रुपये खर्चून रुग्णालयाच्या आत व परिसरात ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. परंतु त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे रुग्ण पळून जाण्याच्या घटनांवरून दिसून येते.प्राप्त माहितीनुसार, पळून गेलेली ३६ वर्षीय महिला मनोरुग्णाला दोन महिन्यांपूर्वी प्रादेशिक मनोरुग्णालयात पोलिसांकडून भरती करण्यात आले. परंतु तिला स्वत:ची माहिती नसल्याने अनोळखी रुग्ण म्हणून तिची नोंद करण्यात आली. रुग्णालयाने तिचे नाव रिता ठेवले होते. वॉर्ड क्र. १७ मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान ती पळून गेली. वॉर्डाच्या मागील कमी उंचीच्या भिंतीवरून ती पळून गेली असावी, अशी शंका उपस्थित केली जात आहे.रुग्ण पळून जाण्याच्या घटना थांबणार कधी?प्रादेशिक मनोरुग्णालयातून रुग्ण पळून जातात, चौकशी समिती बसविली जाते आणि सुरक्षा रक्षकाला जबाबदार धरून त्याला निलंबित केले जाते. त्यानंतर ते प्रकरण बंद पडते. पुन्हा कुणी पळून गेल्यावर हेच चक्र फिरते. परंतु रुग्ण पळून का जातो, या मागील कारण जाणून घेण्यास कुणीच इच्छुक नसल्याचे चित्र आहे. पावसाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने आरोग्य विभागाचे मंत्र्यांपासून ते आयुक्त, सचिव व संचालक नागपुरात आहेत, त्यांनी हा विषय गंभीरतेने घेतल्यास तो कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयnagpurनागपूर