शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

हा तर सेना-भाजपाचा ‘ड्रामा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:57 IST

कोकणातील नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापले असताना काँग्रेसकडून सेना-भाजपवर प्रहार करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात सेना-भाजपचे नेते ‘ड्रामा’ करत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. नाणार येथील प्रस्ताविक ग्रीन रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्यायचा प्रयत्न असून शिवसेनेने यात दुटप्पी भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन विखे पाटील यांनी केले.

ठळक मुद्देनाणार प्रकल्पावरून राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोलसत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोकणातील नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापले असताना काँग्रेसकडून सेना-भाजपवर प्रहार करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात सेना-भाजपचे नेते ‘ड्रामा’ करत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. नाणार येथील प्रस्ताविक ग्रीन रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्यायचा प्रयत्न असून शिवसेनेने यात दुटप्पी भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन विखे पाटील यांनी केले.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. नाणार प्रकल्पासंदर्भात विधानसभेत सरकार दावा करते ही हा प्रकल्प राज्यातच होणार, तर दुसऱ्या बाजूला उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई कामकाज थांबवून प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगतात. मंत्री म्हणून सुभाष देसार्इंचे मत हे सरकारचे मत समजले जाते. त्यामुळे या सर्व रस्सीखेचातून हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे स्पष्ट आहे व शिवसेनादेखील त्यात साथ देत आहे, असा दावा विखे पाटील यांनी केला.सेना-भाजपची युती निश्चितयावेळी शिवसेना-भाजप यांची युती होणार असल्याचा दावादेखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. एकीकडे शिवसेना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडते. दुसरीकडे एकमेकांच्या हातात हात घालून सत्तेचा लाभ घेतला जातो. मुळात भाजपसोबत जाण्याशिवाय शिवसेनेला पर्याय नसल्यामुळे येत्या निवडणुकात भाजप-शिवसेना यांच्यात युती होणार आहे, असे विखे-पाटील म्हणाले.शेतकरी नेत्यांमध्ये सरकारने फूट पाडलीकर्जमाफी, शेतकरी समस्या व इतर प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारीच नाही. शेतकरी आंदोलनातदेखील सरकारने फूट पाडली. किसान सभेचे मूळ आंदोलन होते. मात्र ते त्यानंतर भलत्याच लोकांनी ‘टेकओव्हर’ केले. रघुनाथ पाटील यांच्यासारखे लोक शेतकरी आंदोलनात श्रेयवादाच्या लढाईतून पुढे आले, असा आरोप राधाकृष्ण-विखे पाटील यांनी केला.आघाडीबाबत कार्यकर्त्यांचा जाणून घेतला कलदरम्यान, राज्यात लोकसभेच्या दोन आणि विधानसभेची एक अशा तीन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. यात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचादेखील समावेश आहे. या पोटनिवडणुकांसाठी त्यांनी भंडारा-गोंदिया येथील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आघाडीसंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. मात्र कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी ही बैठक आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलRavi Bhavan, Nagpurरविभवन नागपूर