शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

हा तर सेना-भाजपाचा ‘ड्रामा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:57 IST

कोकणातील नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापले असताना काँग्रेसकडून सेना-भाजपवर प्रहार करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात सेना-भाजपचे नेते ‘ड्रामा’ करत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. नाणार येथील प्रस्ताविक ग्रीन रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्यायचा प्रयत्न असून शिवसेनेने यात दुटप्पी भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन विखे पाटील यांनी केले.

ठळक मुद्देनाणार प्रकल्पावरून राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोलसत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोकणातील नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापले असताना काँग्रेसकडून सेना-भाजपवर प्रहार करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात सेना-भाजपचे नेते ‘ड्रामा’ करत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. नाणार येथील प्रस्ताविक ग्रीन रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्यायचा प्रयत्न असून शिवसेनेने यात दुटप्पी भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन विखे पाटील यांनी केले.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. नाणार प्रकल्पासंदर्भात विधानसभेत सरकार दावा करते ही हा प्रकल्प राज्यातच होणार, तर दुसऱ्या बाजूला उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई कामकाज थांबवून प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगतात. मंत्री म्हणून सुभाष देसार्इंचे मत हे सरकारचे मत समजले जाते. त्यामुळे या सर्व रस्सीखेचातून हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे स्पष्ट आहे व शिवसेनादेखील त्यात साथ देत आहे, असा दावा विखे पाटील यांनी केला.सेना-भाजपची युती निश्चितयावेळी शिवसेना-भाजप यांची युती होणार असल्याचा दावादेखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. एकीकडे शिवसेना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडते. दुसरीकडे एकमेकांच्या हातात हात घालून सत्तेचा लाभ घेतला जातो. मुळात भाजपसोबत जाण्याशिवाय शिवसेनेला पर्याय नसल्यामुळे येत्या निवडणुकात भाजप-शिवसेना यांच्यात युती होणार आहे, असे विखे-पाटील म्हणाले.शेतकरी नेत्यांमध्ये सरकारने फूट पाडलीकर्जमाफी, शेतकरी समस्या व इतर प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारीच नाही. शेतकरी आंदोलनातदेखील सरकारने फूट पाडली. किसान सभेचे मूळ आंदोलन होते. मात्र ते त्यानंतर भलत्याच लोकांनी ‘टेकओव्हर’ केले. रघुनाथ पाटील यांच्यासारखे लोक शेतकरी आंदोलनात श्रेयवादाच्या लढाईतून पुढे आले, असा आरोप राधाकृष्ण-विखे पाटील यांनी केला.आघाडीबाबत कार्यकर्त्यांचा जाणून घेतला कलदरम्यान, राज्यात लोकसभेच्या दोन आणि विधानसभेची एक अशा तीन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. यात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचादेखील समावेश आहे. या पोटनिवडणुकांसाठी त्यांनी भंडारा-गोंदिया येथील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आघाडीसंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. मात्र कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी ही बैठक आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलRavi Bhavan, Nagpurरविभवन नागपूर