शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
9
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
12
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
13
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
14
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
15
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
16
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
17
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
18
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
19
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
20
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

हा तर सेना-भाजपाचा ‘ड्रामा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:57 IST

कोकणातील नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापले असताना काँग्रेसकडून सेना-भाजपवर प्रहार करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात सेना-भाजपचे नेते ‘ड्रामा’ करत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. नाणार येथील प्रस्ताविक ग्रीन रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्यायचा प्रयत्न असून शिवसेनेने यात दुटप्पी भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन विखे पाटील यांनी केले.

ठळक मुद्देनाणार प्रकल्पावरून राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोलसत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोकणातील नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापले असताना काँग्रेसकडून सेना-भाजपवर प्रहार करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात सेना-भाजपचे नेते ‘ड्रामा’ करत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. नाणार येथील प्रस्ताविक ग्रीन रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्यायचा प्रयत्न असून शिवसेनेने यात दुटप्पी भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन विखे पाटील यांनी केले.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. नाणार प्रकल्पासंदर्भात विधानसभेत सरकार दावा करते ही हा प्रकल्प राज्यातच होणार, तर दुसऱ्या बाजूला उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई कामकाज थांबवून प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगतात. मंत्री म्हणून सुभाष देसार्इंचे मत हे सरकारचे मत समजले जाते. त्यामुळे या सर्व रस्सीखेचातून हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे स्पष्ट आहे व शिवसेनादेखील त्यात साथ देत आहे, असा दावा विखे पाटील यांनी केला.सेना-भाजपची युती निश्चितयावेळी शिवसेना-भाजप यांची युती होणार असल्याचा दावादेखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. एकीकडे शिवसेना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडते. दुसरीकडे एकमेकांच्या हातात हात घालून सत्तेचा लाभ घेतला जातो. मुळात भाजपसोबत जाण्याशिवाय शिवसेनेला पर्याय नसल्यामुळे येत्या निवडणुकात भाजप-शिवसेना यांच्यात युती होणार आहे, असे विखे-पाटील म्हणाले.शेतकरी नेत्यांमध्ये सरकारने फूट पाडलीकर्जमाफी, शेतकरी समस्या व इतर प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारीच नाही. शेतकरी आंदोलनातदेखील सरकारने फूट पाडली. किसान सभेचे मूळ आंदोलन होते. मात्र ते त्यानंतर भलत्याच लोकांनी ‘टेकओव्हर’ केले. रघुनाथ पाटील यांच्यासारखे लोक शेतकरी आंदोलनात श्रेयवादाच्या लढाईतून पुढे आले, असा आरोप राधाकृष्ण-विखे पाटील यांनी केला.आघाडीबाबत कार्यकर्त्यांचा जाणून घेतला कलदरम्यान, राज्यात लोकसभेच्या दोन आणि विधानसभेची एक अशा तीन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. यात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचादेखील समावेश आहे. या पोटनिवडणुकांसाठी त्यांनी भंडारा-गोंदिया येथील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आघाडीसंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. मात्र कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी ही बैठक आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलRavi Bhavan, Nagpurरविभवन नागपूर