शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

स्वत: वरील विश्वासच तुम्हाला मोठे करतो : वर्तिका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:04 IST

महिलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्या स्वत: स्वत:ची दिशा ठरवू शकतात. गरज आहे केवळ स्वत:वरील विश्वासाची. हा विश्वासच तुम्हाला पेरणा देतो आणि तुमची चिकाटी, परिश्रमाला मोठे करतो, असे मत ‘मिसेस इंडिया वेस्ट-एम्प्रेस ऑफ वेस्ट’चा किताब जिंकणाऱ्या नागपूरचा डॉ. वर्तिका पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘मिसेस इंडिया वेस्ट’चा जिंकला किताब : सौंदर्य आणि बुद्धिमतेच्या कसोटीवर स्वत:ला केले सिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्या स्वत: स्वत:ची दिशा ठरवू शकतात. गरज आहे केवळ स्वत:वरील विश्वासाची. हा विश्वासच तुम्हाला पेरणा देतो आणि तुमची चिकाटी, परिश्रमाला मोठे करतो, असे मत ‘मिसेस इंडिया वेस्ट-एम्प्रेस ऑफ वेस्ट’चा किताब जिंकणाऱ्या नागपूरचा डॉ. वर्तिका पाटील यांनी व्यक्त केले. सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या कसोटीवर स्वत:ला सिद्ध करीत त्यांनी हा पुरस्कार खेचून आणलापुरस्कार जिंकल्यानंतर डॉ. पाटील यांनी शनिवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, आता पुढचे लक्ष्य ‘मिसेस वर्ल्ड’ आहे. ही स्पर्धा डिसेंबरमध्ये होणार आहे. त्यासाठी तयारी करायची आहे.मूळच्या नागपूरकर असलेल्या डॉ. पाटील यांची ‘मिसेस इंडिया वेस्ट’ स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रासह, गुजरात आणि गोवा मिळून ३२ स्पर्धक सहभागी झाले होते. सौंदर्य स्पर्धेचा मुकुट पटकावणारच असा प्रचंड आत्मविश्वास घेऊन त्या स्पर्धेत उतरल्या. त्यांच्या पाठीशी ‘मिस मेडिको’, ‘मिस संजीवनी’, ‘मिसेस महाराष्ट्र’ आदी स्पर्धेतील विजेतेपदाचा अनुभव होता. पुण्यात झालेल्या अतिशय भव्य आणि दिव्य ग्लॅमरस वातावरणात ‘मिसेस इंडिया वेस्ट’ ही स्पर्धा रंगली. वेगवेगळ्या कसोट्यांवर डॉ. पाटील यांनी स्वत:ला सिद्ध केले. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी विविध फेऱ्यांत त्यांनी चुणूक दाखवली. मुलाखतीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी परीक्षकांची मने जिंकली. त्यामध्ये सर्वाधिक गुण मिळाले.डॉ. पाटील म्हणाल्या, ‘दिवा पेजेंट’च्यावतीने आयोजित या स्पर्धेसाठी सलग पाच महिने कठोर परिश्रम उपसले. यात पती, चार वर्षाची मुलगी आणि संपूर्ण कुटुंबाकडून मोठे सहकार्य मिळाले. पती डॉ. हिमांशु पाटील हे एन्डोक्रायनोलॉजिस्ट यांची बरीच मदत झाली. शेवटच्या फेरीपर्यंत स्वत:वरील विश्वास ढळू दिला नाही. प्रत्येक फेरीत सर्वांची मने जिंकली. पाठीशी असलेल्या इतर स्पर्धेचा स्वत:चा अनुभवही इतर स्पर्धकांना देऊन मदतही केली. संपूर्ण स्पर्धेत स्वत:ची वेगळी छाप पाडली. यामुळेच ‘मिसेस इंडिया वेस्ट’चा मुकुट पटकाविता आला, असेही त्या म्हणाल्या. ‘मिसेस इंडिया’ या स्पर्धेद्वारे स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यास उत्सुक असलेल्या विवाहित स्त्रियांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ज्याद्वारे त्यांना त्यांच्या प्रतिभेला प्रयत्नांची जोड देत बहर आणता येईल, असेही सांगितले.चर्चेदरम्यान कार्ल मस्करेन्हास, अंजना मस्करेन्हास, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. अरुणा पाटील, पौर्णिमा पाटील व डॉ. हिमांशु पाटील उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूरMediaमाध्यमे