शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

अ‍ॅग्रो व्हिजनने जागविला शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास

By admin | Updated: December 15, 2015 05:22 IST

शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागविण्याचे काम अ‍ॅग्रो व्हिजनने केले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन शेतकऱ्यांनी ज्ञान

नागपूर : शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागविण्याचे काम अ‍ॅग्रो व्हिजनने केले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन शेतकऱ्यांनी ज्ञान मिळविले. या ज्ञानाच्या उपयोगातून त्यांनी यशस्वी शेतकरी व्हावे. केवळ परंपरागत शेतीने आता काम चालणार नाही. नवीन तंत्रज्ञान आणि पीक पद्धतीत बदल केल्याशिवाय सध्या पर्याय नाही. त्याचा फायदाही शेतकऱ्यांना अनुभवता येईल, असा मंत्र कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रो व्हिजनचे प्रवर्तक आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना दिला. रेशीमबाग मैदानावर आयोजित चार दिवसीय कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रो व्हिजनचा समारोप करताना ते बोलत होेते. याप्रसंगी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, माजी खा. दत्ता मेघे, आ. मिलिंद माने, आ. अनिल गोटे, आ. भीमराव घोंडे, आ. किशनराव कथोरे, आयोजक सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ग्लोबल आणि लिब्रल इकॉनॉमीत शेतकऱ्यांच्या उत्पादनांना जास्त भाव मिळणे कठीण आहे. कुठलेही सरकार असले तरी ते शेतकऱ्यांना अधिक मूल्य देऊ शकत नाही. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी होईल. केवळ सरकार किंवा एखादी योजना शेतकऱ्यांची मदत करू शकत नाही. शेतकऱ्यांना स्वत:च्या भरवशावरच सक्षम व्हावे लागेल. ज्या वर्षी एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, त्या दिवशी मला आनंद आणि समाधान मिळेल. त्यावेळी खऱ्या अर्थाने शेतकरी आत्मनिर्भर झाला असे मी समजील. त्यावेळी अ‍ॅग्रो व्हिजनची गरज पडणार नाही. ज्ञानाला संपत्तीत परिवर्तन करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगातून कृषी क्षेत्रात रोजगाराची निर्मिती होणार आहे. पण त्यासाठी शेतीशिवाय पूरक उद्योगांवरही लक्ष द्यावे लागेल. मत्स्यपालन, डेअरी, पोल्ट्री उद्योग, मधमाशापालन आदी उद्योगवाढ करावी लागेल. याप्रसंगी नागार्जुन कंपनीतर्फे गडकरींनी दत्तक घेतलेल्या पाचगावसाठी ‘सॉईल टेस्टिंग युनिट’ त्यांना प्रदान करण्यात आले. अतिथींचा सत्कार संत्री देऊन करण्यात आला. या प्रदर्शनाला पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भेट दिली. त्यांच्यासाठी गाड्या पाठविण्यात आल्या नाही. पण शेतकऱ्यांनी पुढाकार घेत प्रदर्शनाला भेट दिली, अशी माहिती गडकरी यांनी दिली. (प्रतिनिधी)‘अ‍ॅग्रो व्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा समारोप सोमवारी रेशीमबाग मैदानावर झाला. याप्रसंगी अ‍ॅग्रो व्हिजनचे प्रवर्तक आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. मिलिंद माने, अनिल गोटे, किशन कथोरे, भीमराव घोंडे, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, जि.प.च्या अध्यक्षा निशा सावरकर, अ‍ॅग्रो व्हिजनच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, संयोजक सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर, माजी आमदार दादाराव केचे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.