शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आरटीईत एकाच विद्यार्थ्याची ३ शाळांमध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 23:50 IST

आरटीईत प्रवेश मिळण्यासाठी एकीकडे पालकांची ओढाताण सुरू आहे. ६५०० बालके अजूनही प्रतीक्षा यादीत आहे. असे असताना एका विद्यार्थ्याची तीन शाळांमध्ये प्रवेशासाठी निवड झाल्याचे उघडकीस आले आहे. आरटीई अ‍ॅक्शन कमिटीच्या माध्यमातून निवड प्रक्रियेतील बोगसपणा उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देआरटीई अ‍ॅक्शन कमिटीच्या माध्यमातून प्रक्रियेतील बोगसपणा उघड

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आरटीईत प्रवेश मिळण्यासाठी एकीकडे पालकांची ओढाताण सुरू आहे. ६५०० बालके अजूनही प्रतीक्षा यादीत आहे. असे असताना एका विद्यार्थ्याची तीन शाळांमध्ये प्रवेशासाठी निवड झाल्याचे उघडकीस आले आहे. आरटीई अ‍ॅक्शन कमिटीच्या माध्यमातून निवड प्रक्रियेतील बोगसपणा उघडकीस आला आहे.नागपूर जिल्ह्यात ६८० शाळांमध्ये आरटीईची प्रक्रिया राबविण्यात आली. २५ टक्के आरक्षणानुसार ६७८४ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. यासाठी ३१०४४ पालकांनी आॅनलाईन अर्ज केले होते. आरटीईच्या लॉटरीमध्ये यापैकी ६६८५ बालकांची निवड झाली. अजूनही ६५०० वर बालके निवडीच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना अनुराग जयप्रकाश गुप्ता या विद्यार्थ्याचा आरटीईच्या लॉटरीमध्ये प्रवीण सुपर फाईन कॉन्व्हेंट, गरोबा मैदान, निलकंठराव काळे कॉन्व्हेंट, श्रीकृष्णनगर व स्वामी नारायण स्कूल, पूर्व वर्धमाननगर या तीनही शाळेत त्याची निवड झाली. विशेष म्हणजे या बालकाच्या पालकाने आरटीईत अर्ज करताना वेगवेगळ्या जन्मतारखा टाकल्या होत्या. पण त्याचे नाव, पत्ता व इतर सर्व आवश्यक दस्तावेज सारखेच होते. पण आरटीईच्या प्रक्रियेत त्याचे तीनही शाळेत निवड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आरटीई अ‍ॅक्शन कमिटीकडे निवड झालेल्या बालकांचा संपूर्ण डाटाबेस आहे. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात हे उघडकीस आल्यानंतर, त्याच्या पालकाने क्षमापत्र देऊन मुलाचे प्रवेश आरटीईतून रद्द केले आहे.निव्वळ जन्मतारखेचाच घोळ नाही, तर अनेक पालकांनी उत्पन्नाचा दाखला, घरभाड्याचे करारनामे बोगस दिले आहे. अंतराचा घोळसुद्धा कायम आहे. अशा अनेक प्रकारच्या बोगसगिरी पुढे येत असून, आरटीईच्या निवडप्रक्रियेवरच आमचा आक्षेप आहे. हा प्रकार तर निवड करतानाच लक्षात येण्यासारखा आहे.मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अ‍ॅक्शन कमिटी

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाnagpurनागपूर