शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सुरक्षा भिंत पडली : १४५०० मेट्रिक टन धान्याची सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 21:46 IST

पूर्व नागपुरातील वर्धमाननगर येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनची सुरक्षा भिंत मागील सव्वा महिन्यापासून कोसळली आहे. गोदामात १४५०० मेट्रिक टन धान्य आहे. परंतु सुरक्षा भिंतीच्या डागडुजीसाठी महामंडळातर्फे काहीच उपाययोजना न करण्यात आल्यामुळे गोदामातील धान्याच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय वखार महामंडळाचा बेजबाबदारपणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपुरातील वर्धमाननगर येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनची सुरक्षा भिंत मागील सव्वा महिन्यापासून कोसळली आहे. गोदामात १४५०० मेट्रिक टन धान्य आहे. परंतु सुरक्षा भिंतीच्या डागडुजीसाठी महामंडळातर्फे काहीच उपाययोजना न करण्यात आल्यामुळे गोदामातील धान्याच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.केंद्रीय वखार महामंडळाचे पूर्व नागपुरातील वर्धमाननगर परिसरात गोडाऊन आहे. आठ एकर परिसरातील भव्य जागेवर असलेल्या या गोडाऊनमध्ये १४ हजार ५०० मेट्रिक टन धान्य ठेवण्यात येते. मागील सव्वा महिन्यापूर्वी या गोडाऊनची १०० मीटर असलेली सुरक्षा भिंत कोसळली आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये धान्य असूनही महामंडळाने सुरक्षा भिंत उभारण्यासाठी काहीच उपाययोजना केलेली दिसत नाही. गोडाऊनच्या सुरक्षेसाठी तीन पाळीत सुरक्षा रक्षक ड्युटीवर राहतात. परंतु आठ एकर परिसरातील या गोडाऊनची सुरक्षा सुरक्षा भिंतीच्या अभावी कशी करावी, असा प्रश्न सुरक्षा रक्षकांना पडला आहे. त्यामुळे या गोडाऊनमधील धान्याची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षा भिंतीचे काम त्वरित करण्याची गरज निर्माण झाली आहे.अधिकारी म्हणतात, तुम्हीच भिंत बांधाकेंद्रीय वखार महामंडळाच्या कोसळलेल्या भिंतीबाबत मुंबई येथील प्रादेशिक व्यवस्थापक ए. के. दुबे यांचे लक्ष वेधले. त्यांनी कोसळलेल्या भिंतीबाबत काय कारवाई केली याची माहिती देण्यास नकार दिला. गोदामातील धान्य चोरीला जाऊ शकते असा प्रश्न विचारला असता तुम्हीच भिंत बांधा, असे अफलातून उत्तर दिले.

 

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर