शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

रेल्वेतील आदिवासी कर्मचाऱ्याची दुसरी पत्नी निवृत्तिवेतनास पात्र : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 20:49 IST

रेल्वेतील आदिवासी कर्मचाऱ्याची दुसरी अधिकृत पत्नी कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देकेंद्र सरकारची याचिका फेटाळली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेतील आदिवासी कर्मचाऱ्याची दुसरी अधिकृत पत्नी कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला.घासिराम अर्जुन गोंड असे रेल्वे कर्मचाºयाचे तर, गणेशीबाई असे त्याच्या दुसऱ्या अधिकृत पत्नीचे नाव आहे. १८ जुलै २०१६ रोजी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणने गणेशीबाईस कुटुंब निवृत्तिवेतन अदा करण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला होता. त्या आदेशाविरुद्ध केंद्र सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कर्मचाऱ्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न केले. हिंदू विवाह कायद्यानुसार या प्रकारचे दुसरे लग्न अनधिकृत आहे. तसेच, कर्मचाऱ्याने दुसरे लग्न करण्यासाठी रेल्वेची परवानगी घेतली नाही. त्याने नियमांचा भंग केला. त्यामुळे दुसऱ्या पत्नीला कुटुंब निवृत्तिवेतन देता येणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली होती. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता केंद्र सरकारचे मुद्दे खोडून काढले. तसेच, न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवून केंद्र सरकारची याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.मोतीबाग, नागपूर येथील घासिराम हा दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये गँगमन होता. तो ३० जून २००१ रोजी सेवानिवृत्त झाला. त्यानंतर त्याची पहिली पत्नी सुंदरबाई २५ ऑगस्ट २००२ रोजी मरण पावली तर, घासिरामचे १२ मार्च २००३ रोजी निधन झाले. त्यामुळे दुसरी पत्नी गणेशीबाईने कुटुंब निवृत्तिवेतनावर दावा केला होता. रेल्वेने ११ मार्च २००६ रोजी तिचा दावा खारीज केला. परिणामी तिने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली होती.निर्णयातील अंतिम निरीक्षणरेल्वे कर्मचारी गोंड समाजातील असून या समाजात दुसरे लग्न करणे अधिकृत आहे. कर्मचाऱ्याने दोन लग्न केले होते हे चौकशीमध्ये आढळून आले आहे. या समाजात विवाह व घटस्फोटासंदर्भात विशिष्ट पद्धत आहे. या समाजाला हिंदू विवाह कायद्यातील तरतूद लागू होत नाही. तसेच, कर्मचाऱ्याला एकापेक्षा जास्त अधिकृत बायका असल्यास कुटुंब निवृत्तिवेतन विभागून देण्याची रेल्वे सेवा नियमात तरतूद आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका फेटाळताना नोंदवले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयrailwayरेल्वेEmployeeकर्मचारी