शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

रेल्वेतील आदिवासी कर्मचाऱ्याची दुसरी पत्नी निवृत्तिवेतनास पात्र : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 20:49 IST

रेल्वेतील आदिवासी कर्मचाऱ्याची दुसरी अधिकृत पत्नी कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देकेंद्र सरकारची याचिका फेटाळली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेतील आदिवासी कर्मचाऱ्याची दुसरी अधिकृत पत्नी कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला.घासिराम अर्जुन गोंड असे रेल्वे कर्मचाºयाचे तर, गणेशीबाई असे त्याच्या दुसऱ्या अधिकृत पत्नीचे नाव आहे. १८ जुलै २०१६ रोजी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणने गणेशीबाईस कुटुंब निवृत्तिवेतन अदा करण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला होता. त्या आदेशाविरुद्ध केंद्र सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कर्मचाऱ्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न केले. हिंदू विवाह कायद्यानुसार या प्रकारचे दुसरे लग्न अनधिकृत आहे. तसेच, कर्मचाऱ्याने दुसरे लग्न करण्यासाठी रेल्वेची परवानगी घेतली नाही. त्याने नियमांचा भंग केला. त्यामुळे दुसऱ्या पत्नीला कुटुंब निवृत्तिवेतन देता येणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली होती. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता केंद्र सरकारचे मुद्दे खोडून काढले. तसेच, न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवून केंद्र सरकारची याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.मोतीबाग, नागपूर येथील घासिराम हा दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये गँगमन होता. तो ३० जून २००१ रोजी सेवानिवृत्त झाला. त्यानंतर त्याची पहिली पत्नी सुंदरबाई २५ ऑगस्ट २००२ रोजी मरण पावली तर, घासिरामचे १२ मार्च २००३ रोजी निधन झाले. त्यामुळे दुसरी पत्नी गणेशीबाईने कुटुंब निवृत्तिवेतनावर दावा केला होता. रेल्वेने ११ मार्च २००६ रोजी तिचा दावा खारीज केला. परिणामी तिने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली होती.निर्णयातील अंतिम निरीक्षणरेल्वे कर्मचारी गोंड समाजातील असून या समाजात दुसरे लग्न करणे अधिकृत आहे. कर्मचाऱ्याने दोन लग्न केले होते हे चौकशीमध्ये आढळून आले आहे. या समाजात विवाह व घटस्फोटासंदर्भात विशिष्ट पद्धत आहे. या समाजाला हिंदू विवाह कायद्यातील तरतूद लागू होत नाही. तसेच, कर्मचाऱ्याला एकापेक्षा जास्त अधिकृत बायका असल्यास कुटुंब निवृत्तिवेतन विभागून देण्याची रेल्वे सेवा नियमात तरतूद आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका फेटाळताना नोंदवले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयrailwayरेल्वेEmployeeकर्मचारी