शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

 नागपुरात भाजपा नगरसेवकांची झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:02 IST

निवडणुकीच्या वेळी आणाभाका घेणारे नगरसेवक निवडून येताच प्रभागाला विसरले आहेत. संपर्क नसल्याने अनेकांना नागरिक ओळखतही नाही. प्रभागातील मूलभूत समस्या व विकास कामांचा अभाव यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. याचा फटका लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांची झाडाझडती घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देसहा विधानसभा क्षेत्रात आज बैठका : पक्षाच्या बैठकींना अनुपस्थित राहणाऱ्यांना जाब विचारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या वेळी आणाभाका घेणारे नगरसेवक निवडून येताच प्रभागाला विसरले आहेत. संपर्क नसल्याने अनेकांना नागरिक ओळखतही नाही. प्रभागातील मूलभूत समस्या व विकास कामांचा अभाव यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. याचा फटका लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांची झाडाझडती घेतली घेणार आहे. मंगळवारी सहा विधानसभा क्षेत्रनिहाय भाजपाचे शहर अध्यक्ष, आमदार यांच्या उपस्थितीत पक्षाचे नगरसेवक, संघटन मंत्री व मंडळ अध्यक्षांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.महापालिका निवडणुकीत मतदारांनी विश्वास दर्शविल्याने भाजपाचे तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले. एकहाती सत्ता दिली तर प्रभागातील विकास कामांना गती मिळेल, अशी मतदारांना आशा होती. मात्र निवडणुका संपल्यापासून बहुसंख्य नगरसेवकांनी प्रभागातील सर्व वस्त्यांत फेरफटकाही मारलेला नाही. निवडणूक प्रचारात एकत्र फिरून विकासाची ग्वाही देणारे आता आपसात कुरघोडी करीत असल्याचे चित्र आहे. वर्ष झाले तरी भाजपाचे अनेक नगरसेवक सभागृहात मौन बाळगून असतात. यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर टीका होत आहे.सत्तापक्ष कार्यालयातील हजेरी पुस्तकात पक्षाचे नगरसेवक हजेरी लावत होते; परंतु वर्षभरात ही प्रथा जवळजवळ बंद आहे. काही मोजकेच नगरसेवक कार्यालयात येतात. सभागृहात नगरसेवकांनी प्रभागातील वा शहर विकासाच्या दृष्टीने विषय मांडणे अपेक्षित आहे. परंतु काही पाच-सात नगरसेवक सोडले तर भाजपाचे नगरसेवक सभागृहात गप्पच असतात. दुसरीकडे पक्षसंघटनेही बहुसंख्य नगरसेवक ांचे योगदान नाही. पक्षाच्या बैठकांनाही उपस्थित नसतात. प्रभागातील विकास कामे करताना नगरसेवक संघटन मंत्री, महामंंत्री यांना विश्वासात घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात नगरसेवकांना जाब विचारला जाणार आहे. याला पक्षाच्या नेत्यांनी दुजोरा दिला आहे.‘केआरए’ तपासणारगेल्या वर्षभरात नगरसेवकांनी प्रभागात केलेली विकास कामे, पक्षसंघटनेतील योगदान, महापालिकेच्या सभागृहातील योगदान, शासनाच्या तसेच महापालिकेच्या विविध योजना राबविण्यासाठी केलेले प्रयत्न, जनमानसात पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न याचा आढावा घेतला जाणार आहे. म्हणजेच बैठकीत नगरसेवकांचा केआरए तपासला जाणार आहे. महापालिकेतील ज्येष्ठनगरसेवकांनीही नवीन नगरसेवकांना शिस्त नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :BJPभाजपाNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका