शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

विज्ञान दिवस : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केले जैव प्लास्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:18 IST

मागील काही काळापासून जगभरात प्लास्टिकमुळे विविध समस्या निर्माण झालेल्या दिसून येत आहेत. संशोधकांसाठी तर ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. दुसरीकडे प्लास्टिकला दैनंदिन जीवनातून कायमचे हद्दपार करणेदेखील शक्य नाही. मात्र जर ‘इकोफ्रेंडली’ प्लास्टिक मिळाले तर! नागपुरातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या विचारांनीच झोप उडाली होती. अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी प्रयोगावर प्रयोग करून पाहिले व अखेरीस त्यांच्या तोंडून शब्द निघाले ‘यूरेका’. पर्यावरण संवर्धनासाठी फायदेशीर ठरू शकणारे जैव प्लास्टिक तयार केल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रातील काही तज्ज्ञदेखील त्यांच्या या संशोधनामुळे प्रभावित झाले आहेत.

ठळक मुद्देविघटन करणे शक्य : पर्यावरण संवर्धनासाठी ठरू शकते फायदेशीर

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : मागील काही काळापासून जगभरात प्लास्टिकमुळे विविध समस्या निर्माण झालेल्या दिसून येत आहेत. संशोधकांसाठी तर ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. दुसरीकडे प्लास्टिकला दैनंदिन जीवनातून कायमचे हद्दपार करणेदेखील शक्य नाही. मात्र जर ‘इकोफ्रेंडली’ प्लास्टिक मिळाले तर! नागपुरातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या विचारांनीच झोप उडाली होती. अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी प्रयोगावर प्रयोग करून पाहिले व अखेरीस त्यांच्या तोंडून शब्द निघाले ‘यूरेका’. पर्यावरण संवर्धनासाठी फायदेशीर ठरू शकणारे जैव प्लास्टिक तयार केल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रातील काही तज्ज्ञदेखील त्यांच्या या संशोधनामुळे प्रभावित झाले आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागातील धम्मदीप वाघमारे व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील नितीन ढोरे यांनी ही कमाल केली आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे जगात सर्वात जास्त समस्या निर्माण होत आहे. हीच बाब लक्षात ठेवून या दोघांनीही विघटनशील प्लास्टिक कसे तयार होईल, यासंदर्भात विविध प्रयोग सुरू केले. धम्मदीपने तर बीएस्सीला असल्यापासूनच यासंदर्भात सखोल वाचन केले. ग्लिसरीन, स्टार्च पावडर व विनेगर या खाद्यपदार्थात वापर होणाऱ्या घटकांचा त्यांनी उपयोग केला. या मिश्रणाला त्यांनी अगोदर विशिष्ट तापमानावर गरम केले व त्यानंतर प्रक्रिया केल्यानंतर त्यातून प्लास्टिकसारखा पदार्थ तयार झाला. सुरुवातीला हे प्लास्टिक लगेच तुटत होते. मग वेगवेगळे ‘कम्पोनन्ट्स’ वापरल्यानंतर जैव प्लास्टिक तयार झाले. हे प्लास्टिक जमिनीत टाकल्यानंतर दीड महिन्याच्या आत विघटित होत आहे, असा दावा त्यांनी केला आहे.या दोघांनीही त्यांचा हा प्रयोग रसायनशास्त्रातील विविध तज्ज्ञांना दाखविला. तसेच विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’मध्ये ते सहभागी झाले. विद्यापीठ पातळीवर दोघांनाही पुरस्कार मिळाला व त्यांना राज्यपातळीवर प्रतिनिधित्व केले.आणखी सुधारणेची आवश्यकतानवोदय विद्यालयात बारावीला असल्यापासूनच आम्ही दोघांनी या कल्पनेवर काम करायला सुरुवात केली होती. आम्ही सुरुवातीला अनेकदा अपयशाचा सामना केला. जैव प्लास्टिकचा दर्जा वाढावा यासाठी रबराच्या झाडासारख्या विविध घटकांचा उपयोग करून पाहिला. आम्ही जे जैव प्लास्टिक तयार केले आहे त्यातून प्लेट, कप, पिशवी बनू शकते. मात्र या गोष्टी जास्त वजन उचलू शकत नाही. जैव प्लास्टिकला मजबूत करण्यासाठी आम्ही नवीन प्रयोग करीत असल्याची माहिती धम्मदीप वाघमारेने दिली.

टॅग्स :scienceविज्ञानStudentविद्यार्थी