शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

शाळा सुरू केली, सुविधा कोण देणार? मनपाला नाही गांभीर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:57 IST

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने बंद पडलेल्या शाळा सुरू तर केल्या, मात्र विद्यार्थ्यांसाठी सोईसुविधांबाबत पालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. बाबुळबनच्या मराठी प्राथमिक शाळेबाबतही हीच स्थिती दिसून येत आहे. ही बंद असलेली शाळा मनपाने सुरू केली व ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतला. मात्र विद्यार्थ्यांना विदारक स्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. आठ दिवस लोटूनही सोईसुविधांबाबत प्रशासनाने गंभीरता दाखविली नसल्याने पालकांमध्ये रोष पसरला आहे.

ठळक मुद्देसंतप्त पालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने बंद पडलेल्या शाळा सुरू तर केल्या, मात्र विद्यार्थ्यांसाठी सोईसुविधांबाबत पालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. बाबुळबनच्या मराठी प्राथमिक शाळेबाबतही हीच स्थिती दिसून येत आहे. ही बंद असलेली शाळा मनपाने सुरू केली व ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतला. मात्र विद्यार्थ्यांना विदारक स्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. आठ दिवस लोटूनही सोईसुविधांबाबत प्रशासनाने गंभीरता दाखविली नसल्याने पालकांमध्ये रोष पसरला आहे. 

आपल्या मुलांना अतिशय वाईट अवस्थेत दिवस घालवावा लागत असल्याने, बहुतेक पालकांनी महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी भेट घेउन संतप्त भावना व्यक्त केल्या. २६ जूनपासून सर्वत्र नियमित शाळा सुरू झाल्या आहेत. पटसंख्येची कारणे देत बाबुळबनची शाळा बंद करण्यात आली होती. मात्र यावर्षी पालकांनी मुलांना या शाळेत प्रवेश देण्याची तयारी दाखविल्यानंतर ही शाळा सुरू करण्यात आली. त्यानुसार ३२ मुलांचे प्रवेश झाले आहेत. दोन शिक्षक या शाळेत सेवारत झाले आहेत. मात्र विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा तरी पुरवाव्या याची भ्रांत मनपा प्रशासनाला राहिली नाही.पालकांच्या तक्रारीनुसार शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही, डेस्कबेंच नसल्याने मुलांना सतरंजीवरच बसावे लागते, शिक्षकांना बसण्यासाठीही येथे खुर्च्या-टेबल नाहीत. शाळेच्या भिंती जुनाट व भकास आहेत, त्यावर रंगरंगोटी करून शाळा बोलकी होईल व विद्यार्थ्यांना शिकण्यास आनंद मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची तसदी मनपाने घेतली नाही. साफसफाईसाठी सफाई कामगार नाही किंवा चपराशीही नाही. मुलांसाठी पाणी भरून ठेवावे म्हणून कुठलीही व्यवस्था नाही. मुलांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळाल्याची माहिती आहे, मात्र गणवेश अद्याप मिळाला नाही. त्यामुळे शाळेत मोटरपंप किंवा ओसीडब्ल्यूकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, शालेय साहित्य ठेवण्यासाठी लोखंडी कपाट उपलब्ध करावे, शाळेची घंटी, नोंदणी रजिस्टर, वह्या, पुस्तक पुरविणे, पटांगणात खेळणी बसविणे, शालेय पोषण आहाराची व्यवस्था करणे, महिला चपराशी व सफाई कामगाराची नियुक्ती करणे आदी मागण्यांचे निवेदन पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.निवेदनातील मागण्या बघता साध्या साध्या सुविधाही उपलब्ध करण्याची गरज मनपाला वाटली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. पटसंख्या नाही म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय मनपाकडून सहज घेतला जातो. पण वाईट परिस्थिती असताना कोण पालक आपल्या मुलांना अशा शाळेत पाठवेल, याचा विचार मात्र केला जात नाही.शाळेसमोर चिखल, अतिक्रमणहीबाबुळबनच्या शाळेला दोन एकरच्या परिसरात प्रशस्त असे पटांगण आहे. आठ वर्गखोल्या असलेली प्रशस्त इमारतही आहे. मात्र त्याची दुरावस्था झाली आहे. पटांगणात धार्मिक स्थळांचे बांधकाम झाले असून काही भागात अतिक्रमणही झाले आहे. रात्री व दिवसाही असामाजिक तत्त्वांचा वावर येथे असल्याच्या तक्रारी नागरिकांनी दिल्या. पावसाळ््याचे दिवस असल्याने शाळेच्या पटांगणात सर्वत्र चिखल साचलेला आहे आणि या चिखलातूनच मुलांना ये-जा करावी लागते. पावसाळ्यात ही अवस्था होते, याची पूर्वकल्पना कुणालाही येईल. मनपाला मात्र याबाबत जाग आली नाही.दुर्बल समाज विकास संस्थेचे प्रयत्नमहापालिकेच्या मराठी शाळा टिकाव्या म्हणून अ. भा. दुर्बल समाज विकास संसाधन या संस्थेमार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या याचिकेवरच न्यायालयाने बंद शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन पालकांना मनपाच्या शाळेत मुलांना टाकण्यास प्रेरित केले व बाबुळबनच्या शाळेत ३२ प्रवेश मिळवून दिले. मात्र शाळा सुरू होऊच नये, अशा मानसिकतेत असलेल्या मनपा प्रशासनाकडून त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSchoolशाळा