शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दप्तराचे ओझे काही कमी होईना : ना आढावा, ना काही निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 20:46 IST

मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला आदेश दिले होते. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात परिपत्रक काढले. शाळेशाळेत जावून विद्यार्थ्यांचे वजन, दप्तराचे वजन मोजण्यात आले. त्याचा आढावा घेण्यात आला. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून ओझे कसे कमी करता येईल, यासाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. शाळांमध्ये उपाययोजना करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले. एक वर्षभर शिक्षण विभागाकडून त्याचा चांगलाच गवगवा झाला. पण या सत्रात दप्तराच्या ओझ्याची मोहिमच शांत झाली. सत्र सुरू झाल्यापासून विभागाने त्यासंदर्भात कुठलाच आढावा घेतला नसल्याने, कुठलेही निर्देश नसल्याने स्थानिक पातळीवर दप्तराच्या ओझ्याकडे दुर्लक्षच झाले.

ठळक मुद्देशिक्षण विभागाकडून वर्षभरापासून दप्तराच्या ओझ्याचा नुसताच गवगवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला आदेश दिले होते. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात परिपत्रक काढले. शाळेशाळेत जावून विद्यार्थ्यांचे वजन, दप्तराचे वजन मोजण्यात आले. त्याचा आढावा घेण्यात आला. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून ओझे कसे कमी करता येईल, यासाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. शाळांमध्ये उपाययोजना करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले. एक वर्षभर शिक्षण विभागाकडून त्याचा चांगलाच गवगवा झाला. पण या सत्रात दप्तराच्या ओझ्याची मोहिमच शांत झाली. सत्र सुरू झाल्यापासून विभागाने त्यासंदर्भात कुठलाच आढावा घेतला नसल्याने, कुठलेही निर्देश नसल्याने स्थानिक पातळीवर दप्तराच्या ओझ्याकडे दुर्लक्षच झाले.नागपूर शहरासह जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये सुमारे चार हजारांवर शाळा आहेत. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खांद्यावर दप्तर टांगून शाळेत जात असताना त्यांना ते पेलवत नाही. त्यावर आळा बसावा यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला, तसे परिपत्रकही २१ जुलै २०१५ रोजी काढले. शिक्षण विभागाचा हा निर्णय जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी शाळांसाठीही बंधनकारक होता. जिल्हा परिषदेच्या शाळांत दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या.पण या शैक्षणिक सत्रात ही मोहीम थंडावली आहे. खासगी शाळांतील अभ्यासक्रमांची पुस्तके जास्त आहेत. शिक्षण विभागाकडून या निर्णयाची शाळांकडून योग्य अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची पडताळणी केली जात नाही. शहरात समूह साधन केंद्रा (सीआरसी)मार्फत याची तपासणी करून त्याचा अहवाल जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर केल्या जातो. तर जिल्ह्यातील शाळांमधील तपासणी ही गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील पथकाकडून होत असते. त्यांचाही अहवाल प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर केल्यानंतर, तो शिक्षण उपसंचालकांकडे सादर करावयाचा असतो. तेथून तो राज्य शिक्षण विभागाकडे सादर केल्या जातो. शिक्षण विभागाकडून कुठल्याच सूचना नसल्याने सर्व शांत आहे.विभागाकडून सूचनाच नाहीशासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबतचा अहवाल हा दर महिन्याला शासनाकडे सादर करावयाचा असल्याचे सांगण्यात येते. मात्र, नागपूर जि.प.च्या शिक्षण विभागाकडून यंदाच्या वर्ष २०१८-१९ चे शालेय सत्र सुरू होऊनही आजवर अहवालच शासनाकडे सादर केला नाही. अधिकारी म्हणतात, की शासनाकडून याबाबत पत्रच आले नाही. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून आपण अहवाल मागविला नाही.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी