शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

निधी दिल्याशिवाय शाळा सुरू करणार नाही; महामंडळाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 11:09 IST

शाळांच्या ‘सॅनिटायझेशन’चा खर्च संस्थांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे जोपर्यंत शासनाकडून निधी देण्यात येत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणार नाही, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे शाळा सुरू करण्यावरून अद्यापही चित्र स्पष्ट झाले नसताना, राज्य पातळीवरील शिक्षण संस्था संघटनेने सरकारला इशाराच दिला आहे. शासनाकडे वेतनाव्यतिरिक्तचे इतर अनुदानदेखील प्रलंबित आहेत. शाळांच्या ‘सॅनिटायझेशन’चा खर्च संस्थांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे जोपर्यंत शासनाकडून निधी देण्यात येत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणार नाही, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रदेखील पाठविण्यात आले आहे. महामंडळाने शालेय शिक्षणमंत्र्यांऐवजी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविल्याने शाळा व्यवस्थापनांची नाराजी किती गंभीर आहे, हे दिसून येत आहे.शाळांच्या ‘सॅनिटायझेशन’साठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पंधराव्या वित्त आयोगाकडून निधीची व्यवस्था करण्यात येईल व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्याचे शाळांना वितरण होईल, असे आम्हाला सांगण्यात आले होते. परंतु अशाप्रकारचा कुठलाही निधी उपलब्ध नसल्याचे स्थानिक पातळीवरून आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यकारी समिती सदस्य रवींद्र फडणवीस यांनी दिली.नेमके काय करायचे आहे याबाबत राज्याच्या शिक्षण विभागात संभ्रम आहे व समन्वयाचादेखील अभाव आहे. ज्यांच्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांच्या ‘ऑनलाईन’ वर्गांचे काय करायचे, याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. याबाबत आम्ही शासनाला काही शिफारशी केल्या, मात्र त्याबाबत काहीच उत्तर आले नाही. ‘सॅनिटायझेशन’साठी कोण निधी देईल याबाबतदेखील काहीच समन्वय नाही. एकूणच शालेय शिक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याचेच दिसून येत असल्याचा आरोप रवींद्र फडणवीस यांनी केला.१ जुलैपासून काही उच्च वर्ग सुरू होतील असे समजले जात होते. परंतु, त्यासाठी अटी अशा होत्या की, कुणालाही हे शक्य झाले नसते. त्यालाही स्थानिक सक्षम प्राधिकाºयाची परवानगी हवी होती.फडणवीस म्हणाले, शुल्कातून निधी उभारत येत नसल्यामुळे अनुदानित शाळा अडचणीत सापडल्या आहेत. अनुदानित शाळा असल्यामुळे आम्ही शुल्क आकारू शकत नाही. वेतनेत्तर अनुदान एवढे कमी आहे की, त्यातून वीजेचे बिल भरू शकत नाही. शाळा देखभाल व इतर खर्चाकरिता आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. १५ व्या वित्त आयोग कोषातून निधी उपलब्ध होईल असे बोलले जात असताना स्थानिक अधिकाऱ्यांना त्यातून डावलण्यात आले आहे. वेतनेत्तर अनुदान एकूण वेतन अनुदानाच्या ४ ते ५ टक्के असते. परंतु, सध्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू झाला असताना, वेतनेत्तर अनुदान मात्र पाचव्या वेतन आयोगानुसार दिले जात आहे. त्यामुळे शाळेची इमारत दिवसातून दोनवेळा सॅनिटाईज करण्याचा खर्च भागवणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरू केल्या जाऊ शकत नाहीत असे फडणवीस यांनी सांगितले.१ जुलैपासून काही उच्च वर्ग सुरू होतील असे समजले जात होते. परंतु, त्यासाठी अटी अशा होत्या की, कुणालाही हे शक्य झाले नसते. त्यालाही स्थानिक सक्षम प्राधिकाºयाची परवानगी हवी होती.फडणवीस म्हणाले, शुल्कातून निधी उभारत येत नसल्यामुळे अनुदानित शाळा अडचणीत सापडल्या आहेत. अनुदानित शाळा असल्यामुळे आम्ही शुल्क आकारू शकत नाही. वेतनेतर अनुदान एवढे कमी आहे की त्यातून विजेचे बिल भरू शकत नाही. शाळा देखभाल व इतर खर्चाकरिता आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. १५ व्या वित्त आयोग कोषातून निधी उपलब्ध होईल असे बोलले जात असताना स्थानिक अधिकाºयांना त्यातून डावलण्यात आले आहे.वेतनेतर अनुदान एकूण वेतन अनुदानाच्या ४ ते ५ टक्के असते. परंतु, सध्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू झाला असताना, वेतनेतर अनुदान मात्र पाचव्या वेतन आयोगानुसार दिले जात आहे. त्यामुळे शाळेची इमारत दिवसातून दोनवेळा सॅनिटाईझ करण्याचा खर्च भागवणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरू केल्या जाऊ शकत नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :Schoolशाळा