शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शालार्थ आयडी घाेटाळा : शिक्षणमंत्र्यांची शिष्टाई, शिक्षणसेवा अधिकाऱ्यांचे आंदाेलन स्थगित

By निशांत वानखेडे | Updated: August 12, 2025 18:58 IST

बुधवारपासून कामावर परतणार : सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा

नागपूर : शालार्थ आयडी घाेटाळा प्रकरणात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या अटकेविराेधात शिक्षण सेवेतील राजपत्रित अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदाेलन मंगळवारी स्थगित करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व प्रधान सचिव रनजित सिंह देओल यांच्यासाेबत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने आंदाेलन थांबविण्यात आल्याची माहिती नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी दिली.

राज्यभरात गाजअसलेल्या शालार्थ आयडी घाेटाळा प्रकरणात नागपूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी राेहिणी कुंभार यांना चाैकशीला बाेलावून अटक केल्याने शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंताेष पसरला हाेता. काेणत्याही चाैकशीविना नियमबाह्य पद्धतीने त्यांना अटक झाल्याचा आराेप करीत अधिकारी संघटनेने आंदाेलनाची घाेषणा केली. अशा नियमबाह्य कारवाई मुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले. यानंतर राज्यातील शिक्षण सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांनी ८ ऑगस्टपासून राज्यभरात सामूहिक रजा आंदाेलन सुरू केले हाेते.

नागपूर विभागासह सर्व बोगस शालार्थ प्रकरणांची चौकशी ७ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयाव्दारे गठित केलेल्या विशेष चौकशी समितीकडे वर्ग करावी, विनाचौकशी कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांना नियमवाह्य अटक करू नये, शालार्थ प्रकरणी निलंबित झालेले सर्व अधिकारी यांना सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे आदी मागण्या करीत हे आंदाेलन सुरू हाेते. याविषयी मंगळवारी शालेय शिक्षण मंत्री च प्रधान सचिव यांच्यासाेबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक झाली.

संघटनेच्या सर्व न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल, तसेच संघटनेच्या मागण्यांचे निवेदनाबाबत पोलीस विभागाला शासन स्तरावरून कळवण्यात येणार आहे, कोणत्याही निरपराध अधिकारी कर्मचारी यांच्यावर चुकीची कारवाई होणार नाही अशा प्रकारचे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिल्यानंतर सामुहीक रजा आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे माधुरी सावरकर यांनी सांगितले. यापुढे अशाप्रकारे विनाचौकशी नियमबाह्य पद्धतीने अटक झाल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता स्तगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू केले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. झालेल्या निर्णयानुसार सर्व शिक्षणसेवा राजपत्रीत अधिकारी कर्मचारी यांनी बुधवार १३ ऑगस्टपासून पूर्ववत कामावर रूजू व्हावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर