शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ आयडी घाेटाळा : शिक्षणमंत्र्यांची शिष्टाई, शिक्षणसेवा अधिकाऱ्यांचे आंदाेलन स्थगित

By निशांत वानखेडे | Updated: August 12, 2025 18:58 IST

बुधवारपासून कामावर परतणार : सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा

नागपूर : शालार्थ आयडी घाेटाळा प्रकरणात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या अटकेविराेधात शिक्षण सेवेतील राजपत्रित अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदाेलन मंगळवारी स्थगित करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व प्रधान सचिव रनजित सिंह देओल यांच्यासाेबत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने आंदाेलन थांबविण्यात आल्याची माहिती नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी दिली.

राज्यभरात गाजअसलेल्या शालार्थ आयडी घाेटाळा प्रकरणात नागपूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी राेहिणी कुंभार यांना चाैकशीला बाेलावून अटक केल्याने शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंताेष पसरला हाेता. काेणत्याही चाैकशीविना नियमबाह्य पद्धतीने त्यांना अटक झाल्याचा आराेप करीत अधिकारी संघटनेने आंदाेलनाची घाेषणा केली. अशा नियमबाह्य कारवाई मुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले. यानंतर राज्यातील शिक्षण सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांनी ८ ऑगस्टपासून राज्यभरात सामूहिक रजा आंदाेलन सुरू केले हाेते.

नागपूर विभागासह सर्व बोगस शालार्थ प्रकरणांची चौकशी ७ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयाव्दारे गठित केलेल्या विशेष चौकशी समितीकडे वर्ग करावी, विनाचौकशी कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांना नियमवाह्य अटक करू नये, शालार्थ प्रकरणी निलंबित झालेले सर्व अधिकारी यांना सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे आदी मागण्या करीत हे आंदाेलन सुरू हाेते. याविषयी मंगळवारी शालेय शिक्षण मंत्री च प्रधान सचिव यांच्यासाेबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक झाली.

संघटनेच्या सर्व न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल, तसेच संघटनेच्या मागण्यांचे निवेदनाबाबत पोलीस विभागाला शासन स्तरावरून कळवण्यात येणार आहे, कोणत्याही निरपराध अधिकारी कर्मचारी यांच्यावर चुकीची कारवाई होणार नाही अशा प्रकारचे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिल्यानंतर सामुहीक रजा आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे माधुरी सावरकर यांनी सांगितले. यापुढे अशाप्रकारे विनाचौकशी नियमबाह्य पद्धतीने अटक झाल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता स्तगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू केले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. झालेल्या निर्णयानुसार सर्व शिक्षणसेवा राजपत्रीत अधिकारी कर्मचारी यांनी बुधवार १३ ऑगस्टपासून पूर्ववत कामावर रूजू व्हावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर