शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

शालार्थ आयडी घाेटाळा : शिक्षणमंत्र्यांची शिष्टाई, शिक्षणसेवा अधिकाऱ्यांचे आंदाेलन स्थगित

By निशांत वानखेडे | Updated: August 12, 2025 18:58 IST

बुधवारपासून कामावर परतणार : सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा

नागपूर : शालार्थ आयडी घाेटाळा प्रकरणात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या अटकेविराेधात शिक्षण सेवेतील राजपत्रित अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदाेलन मंगळवारी स्थगित करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व प्रधान सचिव रनजित सिंह देओल यांच्यासाेबत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने आंदाेलन थांबविण्यात आल्याची माहिती नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी दिली.

राज्यभरात गाजअसलेल्या शालार्थ आयडी घाेटाळा प्रकरणात नागपूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी राेहिणी कुंभार यांना चाैकशीला बाेलावून अटक केल्याने शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंताेष पसरला हाेता. काेणत्याही चाैकशीविना नियमबाह्य पद्धतीने त्यांना अटक झाल्याचा आराेप करीत अधिकारी संघटनेने आंदाेलनाची घाेषणा केली. अशा नियमबाह्य कारवाई मुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले. यानंतर राज्यातील शिक्षण सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांनी ८ ऑगस्टपासून राज्यभरात सामूहिक रजा आंदाेलन सुरू केले हाेते.

नागपूर विभागासह सर्व बोगस शालार्थ प्रकरणांची चौकशी ७ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयाव्दारे गठित केलेल्या विशेष चौकशी समितीकडे वर्ग करावी, विनाचौकशी कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांना नियमवाह्य अटक करू नये, शालार्थ प्रकरणी निलंबित झालेले सर्व अधिकारी यांना सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे आदी मागण्या करीत हे आंदाेलन सुरू हाेते. याविषयी मंगळवारी शालेय शिक्षण मंत्री च प्रधान सचिव यांच्यासाेबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक झाली.

संघटनेच्या सर्व न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल, तसेच संघटनेच्या मागण्यांचे निवेदनाबाबत पोलीस विभागाला शासन स्तरावरून कळवण्यात येणार आहे, कोणत्याही निरपराध अधिकारी कर्मचारी यांच्यावर चुकीची कारवाई होणार नाही अशा प्रकारचे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिल्यानंतर सामुहीक रजा आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे माधुरी सावरकर यांनी सांगितले. यापुढे अशाप्रकारे विनाचौकशी नियमबाह्य पद्धतीने अटक झाल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता स्तगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू केले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. झालेल्या निर्णयानुसार सर्व शिक्षणसेवा राजपत्रीत अधिकारी कर्मचारी यांनी बुधवार १३ ऑगस्टपासून पूर्ववत कामावर रूजू व्हावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर