शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचे दोन वर्ग भरतात एका खोलीत, दोन व्हरांड्यात आणि एक समाजमंदिरात; नागपूर जिल्ह्यातील भिवापूरचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 12:37 IST

भिवापूर तालुक्यातील भागेबोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केवळ एकच वर्गखोली असल्याने दोन वर्ग एकाच वर्गखोलीत, दोन वर्ग व ऱ्हांड्यात आणि एका वर्गातील विद्यार्थी समाजमंदिरात बसून ज्ञानार्जन करतात.

ठळक मुद्देभागेबोरी येथील विद्यार्थ्यांची परवड थांबणार कधी?

शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा ‘डिजिटल’ केल्या जात असताना भिवापूर तालुक्यातील भागेबोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षणाची सोय असून, या पाचही वर्गात एकूण ६४ विद्यार्थी आहेत. येथे केवळ एकच वर्गखोली असल्याने दोन वर्ग एकाच वर्गखोलीत, दोन वर्ग व ऱ्हांड्यात आणि एका वर्गातील विद्यार्थी समाजमंदिरात बसून ज्ञानार्जन करतात. एकीकडे, राज्य शासन कमी पटसंख्येचे कारण पुढे करून शाळा बंद करीत आहे, तर दुसरीकडे पुरेशी पटसंख्या असूनही ग्रामीण विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांसारखी मूलभूत सुविधा पुरविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यावरून शासन व प्रशासन ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बाबतीत किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.भिवापूर तालुक्यातील भागेबोरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी १९५२-५३ मध्ये दोन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले. या वर्गखोल्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे आहे. या वर्गखोल्यांच्या बांधकामापासून आजवर जिल्हा परिषद प्रशासनाने या वर्गखोल्यांकडे ढुंकूनही बघितले नाही. यातील एक वर्गखोली मोडकळीस आल्याने स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीने २०१२ मध्ये नवीन वर्गखोली बांधण्याची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे मागणी केली. त्यासाठी ठराव, पत्रव्यवहार व त्यांचा पाठपुरावा या सर्व बाबी करण्यात आल्या. परंतु, प्रशासनाने लक्ष दिले नाही.दरम्यान, यातील एक वर्गखोली कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसेच त्यातून प्राणहानी होण्याची शक्यता बळावल्याने ती वर्गखोली शाळा व्यवस्थापनाने जमीनदोस्त केली. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने आधी ठराव पारित केला होता. तेव्हापासून आजवर भागेबोरी येथे शाळेची केवळ एकच वर्गखोली शिल्लक आहे. या खोलीत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे एकूण ६४ विद्यार्थी - विद्यार्थिनी एकत्र बसतात आणि शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांना तीन शिक्षक शिकवितात. एकाच खोलीत एवढे विद्यार्थी कसे शिक्षण घेत असतील याची कल्पना न केलेली बरी!व ऱ्हांड्यात बसण्याची वेळया शाळेत एकूण पाच वर्ग आहेत. यातील इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थी शाळेच्या व ऱ्हांड्यात बसून, शिक्षण घेतात तर, इयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी - विद्यार्थिनी वर्गखोलीत बसून ज्ञानार्जन करतात. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना मात्र शाळेपासून ४०० मीटर अंतरावर असलेल्या समाजमंदिरात शिक्षण घेण्यासाठी बसावे लागते. तिथे जागा अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसावे लागते. विशेष म्हणजे, मुख्याध्यापकाचे कार्यालयदेखील त्याच वर्गखोलीत आहे.‘डिजिटल स्कूल’चा देखावाभिवापूर तालुक्यातील ८० टक्के शाळा ‘डिजिटल’ व उर्वरित २० टक्के शाळा ‘मिनी डिजिटल’ झाल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले. यात भागेबोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचाही समावेश आहे. या शाळेत संगणक, मोबाईल, प्रोजेक्टर यासह अन्य साहित्य देण्यात आले. वर्गखोलीअभावी सदर साहित्य ठेवायचे कुठे, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे वर्गखोलीतील एका टेबलवर कॉम्प्युटर व मोबाईल ठेवण्यात आले असून, इतर साहित्य कुलूपबंद आहे.अतिरिक्त वर्गखोली आली कुठून?वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी शाळा व्यवस्थापन समितीने सतत पाठपुरावा केला. परंतु, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या पत्रांकडे काडीचेही लक्ष दिले नाही. उलट, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने भागेबोरी येथे तीन वर्गखोल्या होत्या. त्यातील दोन खोल्या मोडकळीस आल्या असून, एक खोली शाबूत असल्याचा अहवाल तयार केला. आता ही अतिरिक्त वर्गखोली आली कुठून, असा प्रश्न भागेबोरीवासीयांनाच पडला आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधीही लक्ष देत नाही, असा आरोप पालकांनी केला आहे.

टॅग्स :Schoolशाळा