शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

स्कूल बॅगच्या हट्टापायी विद्यार्थ्याचा आत्मघात

By admin | Updated: July 10, 2017 01:19 IST

स्कूल बॅग हे तसे कुणाच्या मृत्यूचे कारण होऊ शकेल का? पण, दुर्दैवाने असे घडलेय खरे. सातवीत शिकणाऱ्या एका १३ वर्षांच्या विद्यार्थ्याने स्कूल बॅगसाठी आपल्या पालकांकडे हट्ट धरला.

समाजमन स्तब्ध : पाच दिवसांपूर्वीच दिले होते आत्महत्येचे संकेतलोकमत न्यूज नेटवर्कसावनेर : स्कूल बॅग हे तसे कुणाच्या मृत्यूचे कारण होऊ शकेल का? पण, दुर्दैवाने असे घडलेय खरे. सातवीत शिकणाऱ्या एका १३ वर्षांच्या विद्यार्थ्याने स्कूल बॅगसाठी आपल्या पालकांकडे हट्ट धरला. परंतु सध्या शेतीची कामे ऐन भरात असल्याने व्यस्ततेमुळे त्याच्या वडिलांना ते वेळीच शक्य झाले नाही. यामुळे संतापलेल्या या बालकाने थेट घराच्या धाब्यावर जाऊन गळफास घेतला. सावनेर-नागपूर मार्गावरील माळेगाव (टाकळी) येथील या घटनेने समाजमन स्तब्ध झाले असून, या वयातील मुलांच्या शीघ्रकोपीपणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.शिवम राजेश कोहळे (१३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. राजेश कोहळे हे शेतकरी असून, त्यांच्याकडे सहा एकर शेती आहे. शिवम हा त्यांचा एकुलला एक मुलगा. तो माळेगाव (टाकळी) येथील प्रकाश विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकायचा. शिवमला तीन बहिणी असून, तिघ्याही त्याच्यापेक्षा मोठ्या आहेत. शाळा सुरू झाल्याने शिवमने नवीन स्कूल बॅगसाठी वडिलांकडे हट्ट धरला होता. पेरणीचा काळ सुरू असल्यामुळे वडिलांना शिवमसाठी नवीन स्कूल बॅग वेळीच खरेदी करणे शक्य झाले नाही. ‘मला जर स्कूल बॅग घेऊन दिली नाही तर मी गळफास लावेन’ असे शिवम चार-पाच दिवसांपूर्वीच बोलला होता. पण, तो खर्रंच असे टोकाचे पाऊल उचलेल असे कुणालाच वाटले नाही. शिवमचे आई व वडील रविवारी सकाळी शेतात गेले होते. तो तिन्ही बहिणींसोबत घरी असताना अगदी बेमालूमपणे धाब्यावर चढला अन् छताला गळफास लावून मृत्यूला कवटाळले. बराच वेळ होऊनही शिवम दिसत नसल्याने मोठी बहीण त्याला शोधण्यासाठी धाब्यावर गेली. तेव्हा तिला शिवम लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही माहिती मिळताच आई-वडिलांनी घर गाठले. शिवमला पाहताच आईने हंबरडा फोडला. पोलिसांना कळवण्यात आले. त्यांनी पंचनामा करून शिवमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेरला पाठविला. या घटनेमुळे अवघ्या माळेगाव(टाकळी)वर शोककळा पसरली आहे. या घटनेने या वयातील बालकांच्या अतिसंवेदनशीलपणाला पुन्हा अधोरेखित केले असून पालकही अस्वस्थ झाले आहेत.