शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

पश्‍चिम विदर्भात एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा

By admin | Updated: May 25, 2014 00:50 IST

पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात या खरीप हंगामात किमान एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता खुद्द कृषी विभागाने वर्तविली आहे

यवतमाळ : पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात या खरीप हंगामात किमान एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता खुद्द कृषी विभागाने वर्तविली आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी उपलब्ध बियाणे वाचविणे आणि नव्या बियाण्यांचा शोध घेण्याची मोहीम कृषी खात्याने हाती घेतली आहे.

अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम या पाच जिल्ह्यात खरिपाचे ३२ लाख हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यातील १६ लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात सोयाबीनचे पाच हजारावर गेलेले भाव लक्षात घेता शेतकर्‍यांचा कल सोयाबीन लागवडीकडे अधिक आहे. प्रती हेक्टरी ७५ किलो प्रमाणे अमरावती विभागाला १२ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. गेल्या वर्षी अकाली पावसामुळे सोयाबीनचे बियाणे निकृष्ट झाले. एवढेच नव्हे तर महाबीजचे प्लॉटस्ही फेल झाले. चाचणीत या बियाण्यांची उगवण क्षमता ७0 टक्क्यापेक्षा बरीच कमी असल्याचे सिद्ध झाले. महाबीजकडून दोन लाख क्विंटल बियाण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात त्यांच्याकडून केवळ ७0 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. कृषी खात्याने केलेल्या सर्वेक्षणात शेतकर्‍यांकडे साडेचार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे आढळून आले. तर दहा ते बारा चांगल्या खासगी कंपन्यांकडून साडेचार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. अशा विविध मार्गाने ११ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असले तरी एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासणार आहे. तो भरुन काढण्यासाठी कृषी विभागाची धडपड सुरू आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना घरचेच बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गावागावांत अतिरिक्त बियाणे असलेल्या शेतकर्‍यांकडून इतर शेतकर्‍यांनी सोयाबीन बियाणे उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)