शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एससी-एसटी-ओबीसींनो, आपली सत्ता मिळवा: प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:00 IST

प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन

ठळक मुद्देस्कॉलरशिप परिषदेत आवाहन

नागपूर : आरक्षित जागांवरून निवडून गेलेले सर्व प्रतिनिधी हे गुलाम आहेत. त्यांच्याकडून काही होणार नाही. आपल्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवायच्या असतील तर शासन आपल्या हातात असायला हवे. शासनात एक किंवा दोन माणसे पाठवून काहीही होणार नाही. शासनाच्या धोरणात सहभागी व्हावे लागेल आणि त्यासाठी किमान ५० पेक्षा अधिक माणसे पाठवा. एस.सी., एस.टी., ओबीसी, व्हीजेएनटी सत्तेत बसले तर त्यांना कुणाला न्याय  मागण्याची गरज नाही. केवळ नियोजनाची आवश्यकता आहे, हे नियोजनच देशाचे संविधान वाचवू शकते. तेव्हा आपली सत्ता मिळवा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केले.संजीवनी ह्यमन डेव्हलपमेंट संस्था, आदिवासी विद्यार्थी संघ, बहुजन विद्यार्थी संघ, युवाज वुई द युथ आदींसह विविध संघटनांच्यावतीने शुक्रवारी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे स्कॉलरशिप परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, स्कॉलरशिपचा विषय आपण गेल्या ४० वर्षातही सोडवू शकलो नाही. १९७२ मध्ये ज्यावर बोलले जात होते. तेच आजही बोलतो. परंतु तेव्हा समस्यांवर उपायसुद्धा सुचविले जायचे. आज ती परिस्थिती दिसत नाही. विषम परिस्थिती व विषम शिक्षण जोपर्यंत आहे. तसेच शासन शिक्षणाची जबाबदारी घेत नाही, तोपर्यंत आरक्षण व स्कॉलरशिप मिळायलाच हवी. महाराष्ट्र सरकार हे सर्वाधिक प्रतिगामी सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकार जितकी स्कॉलरशिप देते तितकीच विद्यार्थ्यांना मिळते. राज्य सरकारचा त्यात कुठलाही हिस्सा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी ओबीसी एकता मंचचे अध्यक्ष सुनील पाल, समता सैनिक दलाच्या अ‍ॅड. स्मिता कांबळे, आदिवासी विद्यार्थी संघाचे विलास उईके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अतुल खोब्रागडे, डॉ. आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सिद्धांत भरणे यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अमन कांबळे यांनी केले. संचालन प्रीतम बुलकुंडे यांनी केले. प्रफुल भालेराव यांनी आभार मानले. प्रज्ञा सालवटकर, लक्ष्मीकांत सुदामे, नवनीत कांबळे, सम्राट उंदीरवाडे, धम्मपाल माटे, मनीष पाटील, प्रवीण वानखेडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.विदर्भ हे आंबेडकरी विचारांचे राज्य होऊ शकतेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले होते, याची सर्वानाच माहिती आहे. परंतु का केले, हे मात्र कुणाला सांगता येत नाही. विदर्भ हे आंबेडकरी विचारांचे राज्य होऊ शकते. ते देशातील शोषित वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे केंद्र ठरू शकते, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसला मत द्यायला हवे, असे नागपूरच्या जनतेला वाटते. पण आपण येथे २८ टक्के आहोत. इतर समाजाला सोबत घेऊन आपण स्वत:च इथले सत्ताधारी होऊ शकतो, असे मात्र तुम्हाला वाटत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.स्कॉलरशिप मिळायलाच हवी , पण जे विद्यार्थीच नाही त्यांचे काय?आपण टीकाकार आहोत, निर्माते नाहीत, अशी टीका आपल्यावर नेहमी केली जाते. त्यामुळे आता आपल्याला निर्मात्यांच्या भूमिकेत यावे लागेल. स्कॉलरशिपचा मुद्दा हा विद्यार्थ्यांशी संंबंधित आहे. स्कॉलरशिप मिळायलाच हवी. परंतु जे विद्यार्थी होऊ शकले नाही, त्यांचे काय? त्यांचा विचारही करावा लागेल. ते विद्यार्थी कसे होतील, हे पाहावे लागेल. सर्वानांच शिक्षण मिळायला हवे. या देशातील व्यक्ती किमान दहावीपर्यंत शिकलेली असावी, यासाठी दहावीपर्यंत शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, अशी मागणी आपली असायला हवी, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSC STअनुसूचित जाती जमातीOBCअन्य मागासवर्गीय जातीScholarshipशिष्यवृत्ती