शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

‘मोठा भाऊ’ सांगा, राम मंदिर कधी बनणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 10:37 IST

गेल्या चार वर्षात राम मंदिराच्या मुद्यावर अपयशी राहिलेल्या केंद्र सरकारवर टीका करीत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला.

ठळक मुद्देप्रवीण तोगडिया यांचा सवालपंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या चार वर्षात राम मंदिराच्या मुद्यावर अपयशी राहिलेल्या केंद्र सरकारवर टीका करीत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला. सर्वच जण आपल्या ‘मन की बात’ करीत आहेत. रामजीच्या मनातील बात तर कुणी ऐका. भगवान राम यांना अयोध्येत राहण्यासाठी घर नाही. त्यांना घर कधी मिळेल, याचे उत्तर माझा ‘मोठा भाऊ ’अर्थात नरेंद्र मोदींनी द्यावे, असेही ते म्हणाले.रामनवमीच्या पर्वाचे निमित्त साधत धंतोली येथील विहिंप कार्यालयात पत्रकारांशी चर्चा करताना डॉ. तोगडिया म्हणाले, राम मंदिराबाबत १९८४ पासून प्रकरण सुरू आहे.सद्यस्थितीत न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर उभारले जाईल, असे सरकार सांगत आहे. असे आहे तर राम मंदिराच्या मुद्यावर आंदोलन का उभारण्यात आले. लाखो कार सेवक एकत्र आले, हजारोंना तुरुंगात जावे लागले. शेकडोंनी बलिदान दिले. मात्र, २०१४ मध्ये सत्ता सांभाळताच राम मंदिरला विसरले. गेल्या चार वर्षांपासून आपण या मुद्यावर सरकारला जाब विचारत आहोत. मात्र, काहीच उत्तर मिळत नाही. दहा दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राम मंदिराबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले होते. केंद्रात भाजपाचे सरकार बहुमतात आहे. कायदा तयार करून राम मंदिर उभारायला हवे. न्यायालयाचा निर्णय आला तर पुन्हा वाद तयार होतील. मंदिरासमोर मशीद उभारली जाईल. हिंदूंना हे कधीच मान्य राहणार नाही, असेही ते म्हणाले.तोगडिया म्हणाले. १९७२ पासून आपले मोदींशी व्यक्तिगत संबंध आहेत. आपले त्यांच्या घरी येणे जाणे राहिले आहे. मोदी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची पाकिस्तानात जाऊन भेट घेऊ शकतात, तर माझी का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जीवाला धोका असल्याबाबतच्या प्रश्नावर तोगडिया म्हणाले, मला माझ्या जीवाची पर्वा नाही. पूर्वी जे बोलायचे होतो, ते बोललो. आता काहीच बोलायचे नाही.राम मंदिराबाबत संघाच्या भूमिकेबाबतच्या प्रश्नालाही बगल देत आपण स्वयंसेवक असून गेल्या ५० वर्षांपासून संघाशी संबध असल्याचे सांगत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. हार्दिक पटेल यांच्याशी झालेल्या भेटीबाबत विचारणा केली असता आपण कुणाशीही भेटू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता हिंदू आंदोलन करणार नाहीतोगडिया म्हणाले, राम मंदिराच्या मुद्यावर आता हिंदू आंदोलन करणार नाही. छातीवर गोळ्या झेलणार नाहीत. आता ही सरकारची जबाबदारी आहे. संसदेत कायदा तयार करावा व अयोध्येत राम मंदिर उभारावे. रामनवमीच्या पर्वावर नागपुरात शोभायात्रेचे उद्घाटनप्रसंगी आपण हीच प्रार्थना देवाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

रोजगार, शिक्षण, कर्जमाफीत सरकार अपयशीकेंद्र सरकार २० कोटी युवकांना रोजगार, उत्तम शिक्षण, शेतकऱ्यांना कर्जमाफी. चार लाख काश्मिरी पंडितांना हक्काचे घर देण्यात अपयशी ठरली असल्याची टीका तोगडिया यांनी केली. बांग्लादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यातही सरकार अपयशी ठरले. कापूस, चणा, डाळींच्या किंमती गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत ३० टक्क्यांहून कमी झाल्या आहेत. गरीब व्यक्तीचा मुलगा डॉक्टर बनू शकत नाही, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BJPभाजपा