शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच हा प्रयोगाचा पांढरा उंदीर नाही; शासननिर्णयाला केला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 11:48 IST

Nagpur News राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर सरपंचाचे आरक्षण काढण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा सरपंचांनी विरोध केला आहे. शासननिर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देन्यायालयात याचिका दाखल होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सरपंचाला कधी अपत्याची अट, कधी शिक्षणाची अट, एक सरकार जनतेतून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय घेते, दुसरे सरकार त्याला रद्द करते. २५ वर्षापासून निवडणुकीपूर्वी आरक्षण काढले जात असताना अचानक सरकार ते रद्द करून निवडणूक झाल्यानंतर आरक्षण काढण्याचा निर्णय घेते. हे सर्व प्रयोग सरपंचाच्या बाबतीत का? सरपंच लोकशाहीत प्रयोगाचा पांढरा उंदीर आहे का? असा संतप्त सवाल सरपंचांचा आहे. राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर सरपंचाचे आरक्षण काढण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा सरपंचांनी विरोध केला आहे. शासननिर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्यात येणार आहे.

राज्यात १४,२३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. पण जनतेतून थेट सरपंच निवडीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. दिवाळीपूर्वी आरक्षणाचा ड्रॉ काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्याना आले. ८ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी रोस्टरनुसार ग्रामपंचायत सदस्यांचे व सरपंचाचे आरक्षण काढले. काही जिल्ह्यांचे आरक्षण काढण्यात आले नाही. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर २५ वर्षापासून सरपंच आरक्षणाची पद्धत बदलविण्यात आली. ज्या जिल्ह्यांनी पूर्वीच काढलेले आरक्षणही रद्द करण्यात आले. आता सरपंचाचे आरक्षण निवडणूक झाल्यानंतर निघणार आहे. पण हा निर्णय सयुक्तिक नसल्याची ओरड सरपंचांची आहे.

- सर्वांना एक न्याय द्या

निवडणुकीनंतर सरपंचाचे आरक्षण निघाल्यास गावागावात वाद होऊ शकतात. घोडेबाजार होऊ शकते. गावात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या बाबतीत वेगळा निर्णय आणि इतर स्वराज्य संस्थांच्या बाबतीत वेगळा निर्णय हे योग्य नाही.

प्रांजल वाघ, सरपंच

- गावात अस्थिरता निर्माण करणारा निर्णय

ग्रा.पं.ची निवडणूक लढविताना पॅनलला सर्वप्रथम आरक्षणानुसार सरपंच पदाचे नेतृत्व निवडावे लागते. त्यानंतर त्याला सपोर्ट करायला इतर सदस्य निवडावे लागतात. आता सदस्य निवडून आल्यानंतर सरपंचाचे आरक्षण काढण्यात येत असल्याने नेतृत्व मिळणार नाही. शिवाय गावातील वातावरण खराब होईल. जनतेतून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय योग्य होता. सरकारचा हा निर्णय गावात अस्थिरता निर्माण करणारा आहे.

सुनील कोडे, सरपंच

- घोडेबाजार वाढेल

चुकीचा निर्णय आहे. यामुळे गावात गट-तट पडतील, निवडणुकीनंतर घोडेबाजार वाढेल. गावात भांडणे वाढतील, वातावरण खराब होईल. गावाचा विकास न होता, अस्थिरता निर्माण होईल.

मनीष फुके, सरपंच

- सरपंच हे सरकारच्या प्रयोगाचा भाग झाले आहे. सरकार बदलले की सरपंचाबाबतचा जुन्या सरकारचा निर्णय नवीन सरकार खोडून काढते. २५ वर्षापासून ज्या नियमाने आरक्षण काढले जात होते, ते नियम अचानक बदलण्यात आले. जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय रद्द करण्यात आला. निवडणुकीपूर्वी काढण्यात येणारे आरक्षण रद्द करून निवडणुकीनंतर काढण्यात येणार आहे. सरकार ज्या गोष्टी ग्रामीण हिताच्या आहे त्या न करता, चुकीचे निर्णय घेत असल्याने, या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे.

जयंत पाटील, अध्यक्ष, अ.भा. सरपंच परिषद

टॅग्स :sarpanchसरपंच