शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पिकांच्या रक्षणासाठी साड्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 12:46 IST

राम वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिवापूर तालुक्यातील नांद परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होते. या प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करताना शेतकºयांचा जीव मेटाकुटीस येतो. त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्याही अवलंबल्या जातात. त्यातच नांद परिसरातील शेतकºयांनी त्यांच्या शेताला केलेल्या काटेरी कुंपणाला चक्क साड्या लावल्या आहेत. साड्यांचे हे कुंपण कुणाचेही लक्ष वेधून ...

ठळक मुद्देनांद परिसरातील शेतकºयांची शक्कल वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला‘डिफेक्टिव्ह’ साड्यांची विक्री वाढलीकुंपणासाठी अनुदान मिळावे

राम वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिवापूर तालुक्यातील नांद परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होते. या प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करताना शेतकºयांचा जीव मेटाकुटीस येतो. त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्याही अवलंबल्या जातात. त्यातच नांद परिसरातील शेतकºयांनी त्यांच्या शेताला केलेल्या काटेरी कुंपणाला चक्क साड्या लावल्या आहेत. साड्यांचे हे कुंपण कुणाचेही लक्ष वेधून घेते.शेतातील पीक घरी येईपर्यंत शेतकºयांना त्याची बरीच काळजी घ्यावी लागते. पूर्वी जंगलात किंवा जंगलालगतच्या परिसरात वावरणाºया वन्यप्राण्यांनी त्यांचा मोर्चा आता गावालगतच्या व अन्य शेतांकडे वळविला आहे. वन विभाग या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याकडे फारसे लक्ष देत नाही. पिकांचे नुकसान झाल्यास वन विभागाकडून नुकसान भरपाई फारशी मिळत नाही. मिळाल्यास तुटपुंजीच असते. त्यामुळे शेतकरी पिकांचे रक्षण करण्सासाठी जीवाचे रान करतात.या भागात काही शेतकºयांनी त्यांच्या शेताला तारांचे कुंपण केले असून, शेतकरी काटेरी कुंपण करतात. या कुंपणाची वन्यप्राण्यांना फारशी भीती वाटत नाही. शिवाय, ते काटेरी कुंपण सहज ओलांडतात.या प्राण्यांमध्ये भीती निर्माण व्हावी, यासाठी शेतकºयांनी कुंपणाला साड्या बांधायला सुरुवात केली आहे. रंगीबिरंगी साड्या बघून प्राणी शेतांकडे येण्यास धजावत नाही. हवेमुळे या साड्यांचा आवाजही होतो. या साड्या आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत.‘डिफेक्टिव्ह’ साड्यांची विक्री वाढलीया कुंपणासाठी शेतकºयांना बºयाच साड्यांची गरज भासते. मग, एवढ्या साड्या आणायच्या कुठून, असा प्रश्न उपस्थित होते. हल्ली काही कंपन्यांच्यावतीने ‘डिफेक्ट’ साड्यांचे सेल लावले जातात. या साड्या प्रति नग १० रुपयाला सहज मिळतात. ही किंमत शेतकºयांच्या आवाक्यातील आहे. त्यामुळे शेतकरी या कुंपणासाठी ‘डिफेक्ट’ साड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

कुंपणासाठी अनुदान मिळावेवन्यप्राणी दरवर्षी पिकांची नासाडी करतात. त्यातून शेतकºयांचे नुकसान होते. या सर्व बाबी शासन व प्रशासनाला माहीत आहे. मात्र, वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही. तशी प्रशासनाची मानसिकताही नाही. त्यामुळे शासनाने गरजू शेतकºयांना कुंपणासाठी काटेरी तारा किंवा सौर ऊर्जेचे कुंपण अनुदानावर द्यावे, अशी मागणी या परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर