शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

ती ‘संजीवनी’ पुन्हा सुरू

By admin | Updated: October 28, 2014 00:26 IST

ज्या ब्रॅण्डेड औषधांसाठी पूर्वी हजारो रु पये खर्च व्हायचे, त्याच औषधांसाठी होणारा खर्च शे-पाचशेवर आला होता. तो मध्य भारतातील पहिल्या जनमंचच्या जेनेरिक औषेधांच्या दुकानांमुळे.

जनमंचच्या जेनेरिक औषध दुकानाचे उद्घाटननागपूर : ज्या ब्रॅण्डेड औषधांसाठी पूर्वी हजारो रु पये खर्च व्हायचे, त्याच औषधांसाठी होणारा खर्च शे-पाचशेवर आला होता. तो मध्य भारतातील पहिल्या जनमंचच्या जेनेरिक औषेधांच्या दुकानांमुळे. गरिबांसाठी जणू प्राण वाचविणारी ही ‘संजीवनी’च ठरली. सर्वसामान्यांना जगण्याची पुन्हा एकदा उमेद मिळाली होती. परंतु ऐन दिवाळीच्या तोंडावर दुकानाला आग लागली. सात लाखांचे औषधांसह इतर साहित्य भस्मसात झाले. मात्र, या राखेतून जनमंचने पुन्हा उभे राहण्याची जिद्द दाखविली. न डगमगता, न खचता पुढे जाण्याची ऊर्मी दाखवत आठवडाभरात जेनेरिक औषधाचे दुकान उभे केले. आज सोमवारी सायंकाळी या दुकानाचे पुन्हा उद्घाटन झाले. तेही एका सामान्य वयोवृद्ध नेहमीच्या ग्राहकाकडून.धरमपेठ झेंडा चौकातील या जनमंच जेनेरिक दुकानाच्या उद्घाटनाच्यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. पिनाक दंदे होते. प्रमुख पाहुणे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, उद्घाटक म्हणून अनसूयाबाई जाधव तर मंचावर जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, महासचिव राजू जगताप उपस्थित होते. जनमंचचा हा लोकोपयोगी पुढाकार २०१३ मध्ये सुरू झाला. जेनेरिक औषधे स्वस्त असतातच, पण ती गुणवत्तेत आणि परिणामकारकतेत जराही कमी नसतात. यामुळे ग्राहकांची गर्दी वाढू लागली. या सेवेतून खऱ्या अर्थाने गरिबांची-मध्यमवर्गांची सेवा घडू लागली. दुकानाला आग लागली तरी या सेवेत खंड पडला नाही, असा आवर्जून उल्लेख अ‍ॅड. किलोर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून केला. ते म्हणाले, दुकानात आलेल्या ग्राहकांकडून त्यांच्या औषधांची यादी घेऊन सायंकाळी ती औषधे उपलब्ध करून दिली जात होती. यामुळे ही सेवा अखंडित होती. जेनेरिक औषधाचे हे दुकान पुन्हा सुरू करण्यासाठी लोकांनीच मदत केली. यामुळे आता हे दुकान खऱ्या अर्थाने लोकांचे झाले आहे, असे म्हणत मदत करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. विष्णू मनोहर म्हणाले, हे दुकान गरीब गरजूंसाठी अक्षरश: संजीवनी बनून धावून आले. परंतु जेव्हा दुर्दैवी घटना घडली तेव्हा जनमंच ही संघटना तीळमात्रही खचली नाही. रात्रंदिवस मेहनत घेऊन हे दुकान पुन्हा उभे केले. औषधांची आरोग्य सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे, असे म्हणत त्यांनी जनमंचच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. दंदे म्हणाले, अन्न-वस्त्र-निवाऱ्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आरोग्याचा. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात. यामुळे अनेकांचा अकाली मृत्यू होतो. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी जनमंचचे हे दुकान संजीवनी ठरले आहे. औषधांच्या बाबतीत इतकी विदारक परिस्थिती असताना सामान्यांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम असाच अखंडित सुरू राहावा, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. आभारप्रदर्शन राजू जगताप यांनी केले.जेनेरिक दुकानाला पुन्हा उभे करण्यासाठी ज्यांचे सहकार्य मिळाले त्या सर्वांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. यात माजी नगरसेवक बाबा मैंद, बुलडाणा येथील विष्णुपंत धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कन्हेरे, औषध सप्लायर अशोक अग्रवाल, गुप्ता, रंगलानी, आहुजा, दिलीपभाई, श्रीधर आर्ट्सचे श्रीधर उगले, भारद्वाज, तामस्कर, दवे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)