शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ती ‘संजीवनी’ पुन्हा सुरू

By admin | Updated: October 28, 2014 00:26 IST

ज्या ब्रॅण्डेड औषधांसाठी पूर्वी हजारो रु पये खर्च व्हायचे, त्याच औषधांसाठी होणारा खर्च शे-पाचशेवर आला होता. तो मध्य भारतातील पहिल्या जनमंचच्या जेनेरिक औषेधांच्या दुकानांमुळे.

जनमंचच्या जेनेरिक औषध दुकानाचे उद्घाटननागपूर : ज्या ब्रॅण्डेड औषधांसाठी पूर्वी हजारो रु पये खर्च व्हायचे, त्याच औषधांसाठी होणारा खर्च शे-पाचशेवर आला होता. तो मध्य भारतातील पहिल्या जनमंचच्या जेनेरिक औषेधांच्या दुकानांमुळे. गरिबांसाठी जणू प्राण वाचविणारी ही ‘संजीवनी’च ठरली. सर्वसामान्यांना जगण्याची पुन्हा एकदा उमेद मिळाली होती. परंतु ऐन दिवाळीच्या तोंडावर दुकानाला आग लागली. सात लाखांचे औषधांसह इतर साहित्य भस्मसात झाले. मात्र, या राखेतून जनमंचने पुन्हा उभे राहण्याची जिद्द दाखविली. न डगमगता, न खचता पुढे जाण्याची ऊर्मी दाखवत आठवडाभरात जेनेरिक औषधाचे दुकान उभे केले. आज सोमवारी सायंकाळी या दुकानाचे पुन्हा उद्घाटन झाले. तेही एका सामान्य वयोवृद्ध नेहमीच्या ग्राहकाकडून.धरमपेठ झेंडा चौकातील या जनमंच जेनेरिक दुकानाच्या उद्घाटनाच्यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. पिनाक दंदे होते. प्रमुख पाहुणे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, उद्घाटक म्हणून अनसूयाबाई जाधव तर मंचावर जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, महासचिव राजू जगताप उपस्थित होते. जनमंचचा हा लोकोपयोगी पुढाकार २०१३ मध्ये सुरू झाला. जेनेरिक औषधे स्वस्त असतातच, पण ती गुणवत्तेत आणि परिणामकारकतेत जराही कमी नसतात. यामुळे ग्राहकांची गर्दी वाढू लागली. या सेवेतून खऱ्या अर्थाने गरिबांची-मध्यमवर्गांची सेवा घडू लागली. दुकानाला आग लागली तरी या सेवेत खंड पडला नाही, असा आवर्जून उल्लेख अ‍ॅड. किलोर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून केला. ते म्हणाले, दुकानात आलेल्या ग्राहकांकडून त्यांच्या औषधांची यादी घेऊन सायंकाळी ती औषधे उपलब्ध करून दिली जात होती. यामुळे ही सेवा अखंडित होती. जेनेरिक औषधाचे हे दुकान पुन्हा सुरू करण्यासाठी लोकांनीच मदत केली. यामुळे आता हे दुकान खऱ्या अर्थाने लोकांचे झाले आहे, असे म्हणत मदत करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. विष्णू मनोहर म्हणाले, हे दुकान गरीब गरजूंसाठी अक्षरश: संजीवनी बनून धावून आले. परंतु जेव्हा दुर्दैवी घटना घडली तेव्हा जनमंच ही संघटना तीळमात्रही खचली नाही. रात्रंदिवस मेहनत घेऊन हे दुकान पुन्हा उभे केले. औषधांची आरोग्य सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे, असे म्हणत त्यांनी जनमंचच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. दंदे म्हणाले, अन्न-वस्त्र-निवाऱ्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आरोग्याचा. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात. यामुळे अनेकांचा अकाली मृत्यू होतो. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी जनमंचचे हे दुकान संजीवनी ठरले आहे. औषधांच्या बाबतीत इतकी विदारक परिस्थिती असताना सामान्यांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम असाच अखंडित सुरू राहावा, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. आभारप्रदर्शन राजू जगताप यांनी केले.जेनेरिक दुकानाला पुन्हा उभे करण्यासाठी ज्यांचे सहकार्य मिळाले त्या सर्वांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. यात माजी नगरसेवक बाबा मैंद, बुलडाणा येथील विष्णुपंत धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कन्हेरे, औषध सप्लायर अशोक अग्रवाल, गुप्ता, रंगलानी, आहुजा, दिलीपभाई, श्रीधर आर्ट्सचे श्रीधर उगले, भारद्वाज, तामस्कर, दवे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)