शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नागपूर जिल्ह्याच्या सावंगी येथील संजय तभाने यांनी संत्रा उत्पादनातून साधली आर्थिक उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 13:10 IST

शेती व्यवसाय नफ्याचा की तोट्याचा हा विचार न करता काही शेतकरी जिद्दीने शेती कसतात व आपल्या मेहनतीने शेती व्यवसायालाही प्रतिष्ठा मिळवून देतात. असाच संत्रा उत्पादनातून उन्नती साधण्याचा यशस्वी प्रयत्न संजय तभाने यांनी केला आहे.

ठळक मुद्देस्वखर्चाने २४४० झाडांची लागवड

विजय नागपुरेआॅनलाईन लोकमतनागपूर : शेती व्यवसाय नफ्याचा की तोट्याचा हा विचार न करता काही शेतकरी जिद्दीने शेती कसतात व आपल्या मेहनतीने शेती व्यवसायालाही प्रतिष्ठा मिळवून देतात. असाच संत्रा उत्पादनातून उन्नती साधण्याचा यशस्वी प्रयत्न संजय तभाने यांनी केला आहे. त्यांचा हा प्रयत्न परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.कळमेश्वर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सावंगी (तोमर) येथील तरुण शेतकरी संजय भाऊराव तभाने यांनी वडिलांचे निधन झाल्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी घरादाराची जबाबदारी सांभाळण्यासाठी बारावीनंतर शिक्षण न घेता वडिलोपार्जित शेती व्यवसायात लक्ष घातले. त्यांच्याकडे एकूण २० एकर शेती आहे. जेव्हा शेतीचा व्यवहार संजय यांनी हाती घेतला तेव्हा त्यांच्या शेतात २०० संत्रा झाडे होती. आज ३० वर्षांच्या काळात त्यांनी शासकीय योजनेचा लाभ न घेता २० एकरात २४४० संत्रा झाडांची लागवड केली आहे.त्यांच्याकडे एक वर्ष वयाची ६००, ४ वर्षे वयाची ९४० तर १८ वर्ष वयाची ९०० संत्रा झाडे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची कमतरता भासू लागते. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करणे सुरू केले. तर शेतजमिनीचा पोत लक्षात घेता नागपुरी संत्रा कलमांची निवड केली.मृग बहाराचे उत्पादन न घेता दरवर्षी अंबिया बहाराचे संत्रा उत्पादन घेतल्या जाते. अंबिया बहाराचे उत्पादन घेतले तर झाडांची स्थिती चांगली राहाते, असे संजय तभाने यांचा अनुभव सांगतो.वर्षाकाठी आठ लाखांचा खर्चसंपूर्ण संत्रा बागेला दरवर्षी ४० ते ५० ट्रक कुजलेले शेणखत, ३० पोती रासायनिक खत सोबतच ५० ते ५५ हजारांचे जैविक खत टाकण्यात येते. तर कीड नियंत्रणासाठी वर्षाला पाच फवारण्या करण्यात येतात. मशागत, निंदण, सालदार व इतर मजुरीचा खर्च पकडता वर्षाकाठी जवळपास आठ लाखांचा खर्च होत असून यावर्षी ९०० संत्रा झाडांच्या बागेतून ४० टन संत्रा विकला व चार वर्षीय ९४० संत्रा झाडावर ७० ते ८० टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या बागेतून उत्पादन घेण्याचे पहिलेच वर्ष असून संत्र्याच्या वजनाने फांद्या तुटू नये म्हणून बालाघाट येथून २ लाख १५ हजारांचे ५००० बांबू खरेदी केले. तसेच संत्रा तोडून विकण्यापेक्षा जागेवरूनच संत्रा व्यापाºयाला विकणे पसंत करीत असल्याचे तभाने यांनी सांगितले.ठिबक सिंचन उत्तम पर्यायसंत्रा बाग टिकविण्यासाठी ठिबक सिंचन महत्त्वाचे असून दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे. तरी कमी पाण्यात नियोजन करून संत्रा उत्पादन घेणे सोईस्कर होईल, याकरिता शासनाने ठिबक सिंचन संचावर ७५ टक्के अनुदान द्यावे. तसेच संत्रा उत्पादनात वाढ झाली तर संत्र्याच्या भावात मंदी येते व यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. यासाठी संत्रा प्रक्रिया प्रकल्प शासनाने उभारावे.- संजय तभाने,शेतकरी, सावंगी.

 

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर