शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

संजय राऊत यांना पक्षाने बळीचा बकरा बनविले, तुरुंगातून आल्यावर समजावलेले; निलम गोऱ्हेंचे वक्तव्य

By नरेश डोंगरे | Updated: December 7, 2023 20:45 IST

पक्षात जनाधार असलेल्यांनाही न्याय मिळत नव्हता : मनोहर जोशी सारख्या नेत्यांना अपमाणित केले जायचे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संजय राऊत यांना पक्षाने बळीचा बकरा बनविले, असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मांडले. नागपूर प्रेस क्लब तर्फे आयोजित 'मिट द प्रेस' कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी गोऱ्हे यांचा बुके देऊन स्वागत केले. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांनी प्रस्तावणा केल्यानंतर गोऱ्हे यांनी नागपूर - विदर्भाशी असलेले नाते, येथील हिवाळी अधिवेशन आणि भूमीका यासंबंधाने त्या सविस्तर बोलल्या. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवरही त्यांनी आपली मते व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, मनोहर जोशी, संजय राऊत अशा अनेकांसंदर्भात त्या मोकळेपणाने बोलल्या.

प्रत्येक राजकीय नेत्याची शैली वेगळी असते. शिवसेना प्रमुखांची वेगळी होती. त्यावेळी कठोर शिस्त होती. त्यांना बारिक माहिती असायची. आमच्याकडे २०१५ नंतर कार्यपद्धती बदलली. मला एक्सेस होता. मात्र, प्रश्न घेऊन जाणाऱ्या अनेक बड्या नेत्यांना न्याय मिळत नव्हता. नेत्यांना काम करू देत नव्हते. अपमाणित केले जायचे. त्यांना मुद्दामहून बाजुला टाकले जायचे. मनोहर जोशींच्या बाबतीत हेच झाले.

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी पडल्यानंतर पक्षात काय सुरू आहे, हे कळतच नव्हते. पक्षश्रेष्ठींना हवे असलेले संजय राऊत यांच्याकडून बोलून घेतले जायचे. त्यांच्याबद्दल आदर असला तरी त्यांची शब्दप्रणाली पटत नव्हती. त्यामुळे आपण त्यांना जेलमधून आल्यानंतर समजावल देखिल. आक्रमक बोलण्यापेक्षा वैचारिक मतभेद वेगळ्या पद्धतीनेही मांडता येतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले. नंतर राऊत यांना बळीचा बकरा बनविल्याचे लक्षात आले.शिंदेंच्या नाराजीची कल्पना होतीकोव्हिडमध्ये शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी होती. मात्र, त्यांना कामच करू दिले जात नव्हते. उद्धव ठाकरे आजारी पडल्यानंतर संवाद हरविला. पारदर्शिपणाही दिसून येत नव्हता. कोव्हीड कमी झाल्यानंतर या सर्व बाबी जाणवायला लागल्या. डावलले जात असल्याची अनेकांची भावना झाली. कालांतराने पक्षाची कार्यपद्धती बदलली. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावरून ते नाराज असल्याची कल्पना होती. मात्र, पक्षात फुट पडल्यानंतर महिना-दोन महिने सून्न पडल्यासारखे झाले होते.साहेब म्हणतील त्याला हो म्हणायचेसाहेब म्हणतील त्याला हो म्हणायचे हीच पक्षाची शिस्त होती. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल चांगल्या भावना आहेत. मात्र बड्या नेत्यांपेक्षा त्यांनाच जास्त निमंत्रण मिळत होते. जनाधार असलेल्या नेत्यांना डावलले जात असल्याने खटकू लागले. आता जे प्रकरण कोर्टात आहे, कुठले रेकॉर्ड नाहीत. कुणाला कशासाठी निवडल ते माहित नाही. बऱ्याच वेळी कोऱ्या पेपरवर सह्या घेतल्या जातात. आता अनेक त्रुटी उघड झाल्याचे त्या म्हणाल्या.शक्ती कायदा त्रुट्यांमध्ये अडकलामहिला मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचा मुद्दा आणि शक्ती कायद्यासंबंधाने प्रश्न आले असता गोऱ्हे यांनी हा कायदा त्रुट्यांमध्ये अडकल्याचे सांगितले. अल्पवयीन मुलांना चुकीच्या व्यवसायात ढकलणारे रॅकेट सक्रिय आहेत. हे सगळं थांबविण्यासाठी पोलिस प्रशासन कमी पडत आहे. या संबंधाने अन्य संस्थांमध्येही अनास्था दिसते’, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. पूर्वी महिलांवर होणाऱ्या अन्यायाला गांभीर्याने घेतले जात नव्हते. मात्र आता महिला आपल्या हक्कासाठी सजग होत आहेत. अडचणीत असणाऱ्या महिलांसाठी भरोसा सेल आणि ११२ क्रमांक महत्त्वाचे ठरत आहे, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना