शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

संघरत्न मानके भारत-जपानमधील मैत्रीचा दुवा : मान्यवरांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:00 IST

धम्मदूत भदन्त संघरत्न मानके कठोर तप करून भिक्खू झाले. त्यांनी भारतात आणि जपानमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. ते भारत-जपान यांच्यातील मैत्रीचा दुवा आहेत, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देधम्मदूत संघरत्न माणके यांचा सुवर्ण महोत्सवी गौरव समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मदूत भदन्त संघरत्न मानके कठोर तप करून भिक्खू झाले. त्यांनी भारतात आणि जपानमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. ते भारत-जपान यांच्यातील मैत्रीचा दुवा आहेत, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.धम्मदूत भदन्त संघरत्न मानके प्रवज्जीत जीवनाचा स्वर्णमहोत्सवी गौरव समारंभाचे आयोजन दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी भारतीय भिक्खुसंघाचे संघानुशासक भदन्त सदानंद महास्थवीर होते. प्रमुख पाहुणे म्हणून तिब्बती कॅम्प गोठणगाव येथील भदन्त लोबसांग तेन्पा, निप्पोंझा म्योहोजि शांती स्तूप वर्धाचे भदन्त मिकिओ आसाई, सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, पय्या मेत्ता संघाचे उपाध्यक्ष डॉ. बालचंद्र खांडेकर, औद्योगिक विकास महामंडळाचे आयुक्त डॉ. हर्षवर्धन कांबळे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे, गुरुदेव युवा मंचाचे ज्ञानेश्वर रक्षक, सामाजिक कार्यकर्ते भीमराव वैद्य, मिलिंंद फुलझेले उपस्थित होते. यावेळी बोलताना भदन्त सदानंद महास्थवीर म्हणाले, एकुलता एक मुलगा धम्माला दान देऊन सच्चिदानंद आणि सीताबाई मानके यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील दायित्व प्रामाणिकपणे निभावले. अशीच भावना समाजाने ठेवण्याची गरज आहे. डॉ. भाऊ लोखंडे यांनी मुलगा दान देण्याचे सच्चिदानंद मानके यांचे कार्य सम्राट अशोकाच्या परंपरेतील असल्याचे मत व्यक्त केले. भन्ते धम्मशिखर यानी संघरत्न मानके यांनी आपल्याला बुद्ध धम्मात स्थापन केल्याचे सांगितले. माजी न्यायाधीश महेंद्र गौतम यांनी संघरत्न मानके यांचे धम्मासाठी मोलाचे योगदान असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. हर्षवर्धन कांबळे यांनी भिक्खू प्रशिक्षण केंद्र ठिकठिकाणी उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी संघरत्न मानके यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार केल्याची माहिती दिली. पत्रकार मिलिंंद फुलझेले, तुका कोचे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना संघरत्न मानके म्हणाले, प्रत्येकाने आपल्यातील बुद्ध उभारला पाहिजे. देशातील बुद्ध अवशेषांपैकी ३० टक्के अवशेष महाराष्ट्रात आहेत. बाबासाहेबांनी महाराष्ट्रातच धम्मदीक्षा दिली. त्यामुळे परकीय बौद्धांपुढे हात न पसरता स्व:तच्या बळावर धम्म गतिमान करण्याचे आवाहन त्यांनी केले. संचालन डॉ. वीणा राऊत यांनी केले. आभार संध्या राजुरकर यांनी मानले.

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी