शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

संघरत्न मानके भारत-जपानमधील मैत्रीचा दुवा : मान्यवरांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:00 IST

धम्मदूत भदन्त संघरत्न मानके कठोर तप करून भिक्खू झाले. त्यांनी भारतात आणि जपानमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. ते भारत-जपान यांच्यातील मैत्रीचा दुवा आहेत, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देधम्मदूत संघरत्न माणके यांचा सुवर्ण महोत्सवी गौरव समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मदूत भदन्त संघरत्न मानके कठोर तप करून भिक्खू झाले. त्यांनी भारतात आणि जपानमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. ते भारत-जपान यांच्यातील मैत्रीचा दुवा आहेत, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.धम्मदूत भदन्त संघरत्न मानके प्रवज्जीत जीवनाचा स्वर्णमहोत्सवी गौरव समारंभाचे आयोजन दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी भारतीय भिक्खुसंघाचे संघानुशासक भदन्त सदानंद महास्थवीर होते. प्रमुख पाहुणे म्हणून तिब्बती कॅम्प गोठणगाव येथील भदन्त लोबसांग तेन्पा, निप्पोंझा म्योहोजि शांती स्तूप वर्धाचे भदन्त मिकिओ आसाई, सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, पय्या मेत्ता संघाचे उपाध्यक्ष डॉ. बालचंद्र खांडेकर, औद्योगिक विकास महामंडळाचे आयुक्त डॉ. हर्षवर्धन कांबळे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे, गुरुदेव युवा मंचाचे ज्ञानेश्वर रक्षक, सामाजिक कार्यकर्ते भीमराव वैद्य, मिलिंंद फुलझेले उपस्थित होते. यावेळी बोलताना भदन्त सदानंद महास्थवीर म्हणाले, एकुलता एक मुलगा धम्माला दान देऊन सच्चिदानंद आणि सीताबाई मानके यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील दायित्व प्रामाणिकपणे निभावले. अशीच भावना समाजाने ठेवण्याची गरज आहे. डॉ. भाऊ लोखंडे यांनी मुलगा दान देण्याचे सच्चिदानंद मानके यांचे कार्य सम्राट अशोकाच्या परंपरेतील असल्याचे मत व्यक्त केले. भन्ते धम्मशिखर यानी संघरत्न मानके यांनी आपल्याला बुद्ध धम्मात स्थापन केल्याचे सांगितले. माजी न्यायाधीश महेंद्र गौतम यांनी संघरत्न मानके यांचे धम्मासाठी मोलाचे योगदान असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. हर्षवर्धन कांबळे यांनी भिक्खू प्रशिक्षण केंद्र ठिकठिकाणी उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी संघरत्न मानके यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार केल्याची माहिती दिली. पत्रकार मिलिंंद फुलझेले, तुका कोचे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना संघरत्न मानके म्हणाले, प्रत्येकाने आपल्यातील बुद्ध उभारला पाहिजे. देशातील बुद्ध अवशेषांपैकी ३० टक्के अवशेष महाराष्ट्रात आहेत. बाबासाहेबांनी महाराष्ट्रातच धम्मदीक्षा दिली. त्यामुळे परकीय बौद्धांपुढे हात न पसरता स्व:तच्या बळावर धम्म गतिमान करण्याचे आवाहन त्यांनी केले. संचालन डॉ. वीणा राऊत यांनी केले. आभार संध्या राजुरकर यांनी मानले.

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी