शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

रेतीमाफिया : १० महिन्यांत २२.९५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:44 IST

जिल्ह्यातील सर्वच रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया रखडली असताना रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूक यात अलिकडच्या काळात प्रचंड वाढ झाली आहे. गौण खनिजांच्या संवर्धनाची जबाबदारी तरी शासनाने महसूल व खनिकर्म विभागाकडे सोपविली असली तरी, रेतीचोरीला आळा घालण्यात या दोन्ही विभागाला सपशेल अपयश आले आहे. दुसरीकडे, नागपूर ग्रामीण पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत रेतीमाफियांवर करडी नजर ठेवली. त्यातूनच पोलिसांनी १० महिन्यांत जिल्ह्यातील २२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करीत अवैध रेतीवाहतूक प्रकरण्ी १५८ गुन्हे दाखल केले असून, ३१७ जणांना अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून तब्बल २२ कोटी ९५ लाख ७० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई करणाऱ्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आघाडीवर आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील २२ पोलीस ठाण्यांमध्ये १५८ गुन्ह्यांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील सर्वच रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया रखडली असताना रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूक यात अलिकडच्या काळात प्रचंड वाढ झाली आहे. गौण खनिजांच्या संवर्धनाची जबाबदारी तरी शासनाने महसूल व खनिकर्म विभागाकडे सोपविली असली तरी, रेतीचोरीला आळा घालण्यात या दोन्ही विभागाला सपशेल अपयश आले आहे. दुसरीकडे, नागपूर ग्रामीण पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत रेतीमाफियांवर करडी नजर ठेवली. त्यातूनच पोलिसांनी १० महिन्यांत जिल्ह्यातील २२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करीत अवैध रेतीवाहतूक प्रकरणी १५८ गुन्हे दाखल केले असून, ३१७ जणांना अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून तब्बल २२ कोटी ९५ लाख ७० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई करणाऱ्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आघाडीवर आहे.संपूर्ण विदर्भात वैनगंगा आणि कन्हान नदीच्या रेतीला विशेष मागणी आहे. त्यामुळे रेतामाफियांनी जिल्ह्यातील सावनेर, पारशिवनी, कामठी व मौदा तालुक्यातील वाहणाऱ्या कन्हान नदीला लक्ष्य केले. जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव करण्यात न आल्याने रेतीचा अवैध उपसा आणि वाहतुकीचे प्रमाणही प्रचंड वाढले. महसूल विभाग या रेतीचोरीला आळा घालण्यात अपयशी ठरल्याने तसेच खनिकर्म विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने याला आळा घालण्याची जबाबदारी ही नागपूर ग्रामीण पोलिसांनी समर्थपणे पार पाडली.नागपूर ग्रामीण पोलिसांनी १ जानेवारी २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०१८ या १० महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील २२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवार्इंचा सपाटा लावला. त्यात त्यांनी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूक प्रकरणी ८८ गुन्हे नोंदवित १४३ जणांना अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून या काळात ५ कोटी १५ लाख ६८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांत कारवाईचे प्रमाण वाढले. या काळात ७० गुन्हे दाखल करण्यात आले असून, १७१ जणांना अटक करण्यात आली. शिवाय, त्यांच्याकडून एकूण १७ कोटी ८० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील आरोपींमध्ये ट्रक, टिप्पर व जेसीबी चालक व मालकांचा समावेश असून, जप्त केलेल्या मुद्देमालांमध्ये या वाहनांसह हजारो ब्रास रेतीचा समावेश आहे.अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्लेरेतीच्या चोरीतून जिल्ह्यात एकीकडे टोळीयुद्धाची शक्यता बळावली आहे तर, रेतीमाफियांवर पोलीस वगळता कुणाचाही अंकुश नसल्याने त्यांनी पोलीस व महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्लेही केले आहेत. काही वर्षांपूर्वी पोलीस उपअधीक्षक मंगेश शिंदे यांच्या सरकारी वाहनाला धडक देण्याची घटना पारश्यिावनी तालुक्यात घडली होती. शिवाय, मंगळवारी (दि. ३०) उमरेडचे तहसीलदार प्रमोद कदम आणि नायब तहसीलदार योगेश शिंदे यांच्यावरही रेतीमाफियांच्या हस्तकांनी जीवघेणा हल्ला केला. परंतु, या हल्ल्यांमध्ये हे अधिकारी सुदैवाने बचावले.स्थानिक गुन्हे शाखा आघाडीवरजिल्ह्यात आजवर करण्यात आलेल्या कारवार्इंमध्ये सर्वाधिक ८० टक्के कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्या आहेत. या पथकाने सर्वाधिक कारवाई खापरखेडा, कन्हान, मौदा, पारशिवनी, उमरेड व त्याखालोखाल भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केल्या आहेत. जिल्ह्यात रेती उपशावर बंदी असल्याने वैनगंगा नदीची रेती ही मौदा - नागपूर व गडचिरोली - भिवापूर - उमरेड - नागपूर या मार्गांनी सर्वाधिक केली जात आहे.

टॅग्स :sandवाळूtheftचोरी