शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नागपुरात रेती तस्करांना दणका : चार टिप्पर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 20:52 IST

रेती तस्करी करणाऱ्या चार वाहनांना पकडून पोलिसांनी रेती माफियांना दणका दिला आहे. पकडलेल्या ट्रकमध्ये लाखोंची रेती आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रोज करोडोंच्या रेतीची तस्करी करून रेती माफिया बिनबोभाट ती विकत आहे. यातून रेती माफिया सरकारला दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा फटका देतात.

ठळक मुद्देलाखोंची रेती जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेती तस्करी करणाऱ्या चार वाहनांना पकडून पोलिसांनी रेती माफियांना दणका दिला आहे. पकडलेल्या ट्रकमध्ये लाखोंची रेती आहे.नागपूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रोज करोडोंच्या रेतीची तस्करी करून रेती माफिया बिनबोभाट ती विकत आहे. यातून रेती माफिया सरकारला दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा फटका देतात. रेती माफियांच्या दावणीला महसूल तसेच पोलीस विभागातील काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी असल्यामुळे रेती माफियांचे चांगलेच फावते. ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १५ जूनला एक बैठक घेतली. नागपूर जिल्हा आणि शहरात सुरू असलेल्या रेती तस्करीला आळा घालण्याचे निर्देश दिले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्याची लगेच दखल घेत शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना रेती माफियांना तातडीने चाप बसविण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री भंडारावरून रामटेक मार्गे नागपूर येणारे रेतीने भरलेले चार ट्रक उप्पलवाडी पुलाजवळ अडविले. पोलिसांनी ट्रक चालक राजेश उरकुडा सिंगनजुडे, प्रवीण रमेश संतापे, कृष्­णा गंगाराम सोनवणे आणि महादेव गोपीचंद डोंगरवार यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी ही रेती भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथून आणल्याचे सांगितले मात्र पोलिसांच्या अनेक प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे पोलिसांनी महसूल विभागाच्या तहसीलदाराला बोलवून हे चारही ट्रक त्यांच्या स्वाधीन केले.रॉयल्टीच नाहीलाखोंची रेती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणणाऱ्या या चारपैकी कोणत्याच ट्रक चालकाकडे आवश्यक असलेली रॉयल्टी नव्हती. त्यामुळे त्यांनी नागपूरपर्यंत ट्रक कसे काय आणले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पुढच्यावर कारवाई, मागचे गायबनागपूर शहरात चोरीची रेती घेऊन येणाऱ्या रेती माफियांचे मोठे नेटवर्क आहे. या नेटवर्कमध्ये १०० वर दलाल काम करतात. रोज रात्री नागपुरात १०० पेक्षा जास्त ट्रक रेती घेऊन येतात. प्रत्येक ट्रकमध्ये किमान एक किलोमीटरचे अंतर असते. चार किंवा पाच ट्रक पुढे असतात. त्यांच्यापासून सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावर दुसऱ्या ट्रकची रांग असते. या ट्रकच्या पुढे आणि मागे रेती माफियांच्या नेटवर्कमधील दलाल दुचाकीने चालतात. पोलिसांची नाकेबंदी असल्यास ते लगेच फोन करून ट्रक चालकांना माहिती देतात. पोलिसांनी ट्रक अडविले की मागचे सर्व ट्रकचालक सतर्क होतात. त्यामुळे पोलिसांना एका वेळी फार तर चार-पाच किंवा दहा ट्रक कारवाईसाठी मिळतात. योजनाबद्ध पद्धतीने दहा-पंधरा किलोमीटरच्या परिसरात पोलिसांनी सापळा लावून कारवाई केल्यास एकाच रात्रीतून किमान ५० ते १०० ट्रक पोलिसांच्या हाती लागू शकतात.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीArrestअटक