शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
4
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
5
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
6
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
7
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
8
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
9
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
10
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
11
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
12
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
13
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
14
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
15
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
17
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
18
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
19
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
20
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार

समर्थांचा उपदेश मानवी जीवनाचा आदर्श

By admin | Updated: February 4, 2015 00:57 IST

एकांतात आत्मसाधना करा आणि समष्टीत समाजासाठी काम करा, हा आदर्श समर्थ रामदास स्वामींनी आपल्या आचरणाने दिला. त्यांच्या दासवाणीत त्यांनी ज्ञानाची परीक्षा घेतलेली नाही

सरसंघचालक मोहन भागवत : समर्थ रामदासनवमी सुवर्णजयंती उत्सवनागपूर : एकांतात आत्मसाधना करा आणि समष्टीत समाजासाठी काम करा, हा आदर्श समर्थ रामदास स्वामींनी आपल्या आचरणाने दिला. त्यांच्या दासवाणीत त्यांनी ज्ञानाची परीक्षा घेतलेली नाही तर कृतीची, वागण्याची परीक्षा घेतली आहे. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, हीच त्यांची शिकवण आहे. आत्मसाधना करताना समाजातले दु:ख, वेदना विसरून चालणार नाही. आत्मसाधनेसोबतच समाजाचे ऋण फेडण्याचाही उपदेश त्यांनी दिला आहे आणि मानवी जीवनाची समृद्धता समता, बंधूता, सेवा यातच आहे, हेही त्यांनी सांगितले. समर्थांच्या उपदेशातून संपूर्ण जगाला मानवी जीवनाचा आदर्श शिकविण्याची जबाबदारी आपली आहे, असे मत रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी व्यक्त केले. हनुमाननगर सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे समर्थ रामदास नवमी सुवर्णमहोत्सवी उत्सव हनुमाननगरच्या त्रिकोणी मैदानात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, संयोजन समितीचे अध्यक्ष गिरीश हरकरे उपस्थित होते. भागवत म्हणाले, शाश्वत सुखाचा लाभ सर्वांनाच व्हावा म्हणून आपल्या ऋषींनी साधना, तपस्या केली. त्यातूनच हे राष्ट्र तेजस्वी झाले, असे वेद म्हणतात. पण शाश्वत समाधान, आनंद हवा असेल तर मन, शरीर आणि आत्मा यांची शांतता, स्थिरता आवश्यक आहे. विरक्तीशिवाय शाश्वत आनंद मिळत नाही. त्यामुळेच प्रपंच करावा नेटका त्यानंतर परमार्थ साधावा, असे वचन आहे. समर्थही प्रपंचात पडताना सावधान शब्द ऐकून पळून गेले, कारण त्यांनी पूर्वायुष्यात प्रपंच समाधानी केला असला पाहिजे. ही त्यांची साधना होती. प्रपंचातून पळून जाण्याचे समर्थन त्यांनी केले नाही. आपला संघर्ष माणसांशीच होतो. पण इतरांच्या प्रगतीत समाधान मानले तर संघर्ष होत नाही. बंधूतेने इतरांना मदत करणाराच शाश्वत धर्म आहे. हा धर्म पाळल्याशिवाय अर्थ, काम, मोक्ष लाभत नाही. आपल्याला दासवाणी कंठस्थ असते, पण त्याचा अर्थ आणि आचरण कळत नाही. खडतर जीवनातही कसे वागावे, याचा आदर्श दासवाणीत आहे. हे आचरण समाजात कसे वाढेल, याचा प्रयत्न सुवर्ण महोत्सवानिमित्त करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद जोशी, प्रास्ताविक श्रीराम धोंड यांनी केले. (प्रतिनिधी)