शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
3
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
4
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
5
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
6
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
7
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
8
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
9
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
10
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
11
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
12
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
13
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
14
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
15
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
16
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
17
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
18
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
19
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
20
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

समर्थांचा उपदेश मानवी जीवनाचा आदर्श

By admin | Updated: February 4, 2015 00:57 IST

एकांतात आत्मसाधना करा आणि समष्टीत समाजासाठी काम करा, हा आदर्श समर्थ रामदास स्वामींनी आपल्या आचरणाने दिला. त्यांच्या दासवाणीत त्यांनी ज्ञानाची परीक्षा घेतलेली नाही

सरसंघचालक मोहन भागवत : समर्थ रामदासनवमी सुवर्णजयंती उत्सवनागपूर : एकांतात आत्मसाधना करा आणि समष्टीत समाजासाठी काम करा, हा आदर्श समर्थ रामदास स्वामींनी आपल्या आचरणाने दिला. त्यांच्या दासवाणीत त्यांनी ज्ञानाची परीक्षा घेतलेली नाही तर कृतीची, वागण्याची परीक्षा घेतली आहे. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, हीच त्यांची शिकवण आहे. आत्मसाधना करताना समाजातले दु:ख, वेदना विसरून चालणार नाही. आत्मसाधनेसोबतच समाजाचे ऋण फेडण्याचाही उपदेश त्यांनी दिला आहे आणि मानवी जीवनाची समृद्धता समता, बंधूता, सेवा यातच आहे, हेही त्यांनी सांगितले. समर्थांच्या उपदेशातून संपूर्ण जगाला मानवी जीवनाचा आदर्श शिकविण्याची जबाबदारी आपली आहे, असे मत रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी व्यक्त केले. हनुमाननगर सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे समर्थ रामदास नवमी सुवर्णमहोत्सवी उत्सव हनुमाननगरच्या त्रिकोणी मैदानात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, संयोजन समितीचे अध्यक्ष गिरीश हरकरे उपस्थित होते. भागवत म्हणाले, शाश्वत सुखाचा लाभ सर्वांनाच व्हावा म्हणून आपल्या ऋषींनी साधना, तपस्या केली. त्यातूनच हे राष्ट्र तेजस्वी झाले, असे वेद म्हणतात. पण शाश्वत समाधान, आनंद हवा असेल तर मन, शरीर आणि आत्मा यांची शांतता, स्थिरता आवश्यक आहे. विरक्तीशिवाय शाश्वत आनंद मिळत नाही. त्यामुळेच प्रपंच करावा नेटका त्यानंतर परमार्थ साधावा, असे वचन आहे. समर्थही प्रपंचात पडताना सावधान शब्द ऐकून पळून गेले, कारण त्यांनी पूर्वायुष्यात प्रपंच समाधानी केला असला पाहिजे. ही त्यांची साधना होती. प्रपंचातून पळून जाण्याचे समर्थन त्यांनी केले नाही. आपला संघर्ष माणसांशीच होतो. पण इतरांच्या प्रगतीत समाधान मानले तर संघर्ष होत नाही. बंधूतेने इतरांना मदत करणाराच शाश्वत धर्म आहे. हा धर्म पाळल्याशिवाय अर्थ, काम, मोक्ष लाभत नाही. आपल्याला दासवाणी कंठस्थ असते, पण त्याचा अर्थ आणि आचरण कळत नाही. खडतर जीवनातही कसे वागावे, याचा आदर्श दासवाणीत आहे. हे आचरण समाजात कसे वाढेल, याचा प्रयत्न सुवर्ण महोत्सवानिमित्त करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद जोशी, प्रास्ताविक श्रीराम धोंड यांनी केले. (प्रतिनिधी)