शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

महिलांचा उद्धार ही पुरुषांच्या क्षमतेच्या बाहेरची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2022 22:08 IST

Nagpur News महिलांचा उद्धार ही पुरुषांच्या क्षमतेबाहेरची बाब आहे. महिलांना योग्य संधी देण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

ठळक मुद्देअखिल भारतीय महिला चरित्र कोशाचे लोकार्पण

नागपूर : भारतीय परंपरेत महिलांना मातृशक्तीचे स्थान दिले असले तरी दोन हजार वर्षांत विविध आक्रमणांमुळे महिलांची हवी तशी प्रगती होऊ शकली नाही. सार्वजनिक जीवनात राहून महिला यशाचे शिखर गाठू शकतात याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. महिलांचा उद्धार करण्याची भाषा पुरुष करतात; परंतु महिलांचा उद्धार ही पुरुषांच्या क्षमतेबाहेरची बाब आहे. महिलांना योग्य संधी देण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संघमित्रा सेवा प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या अखिल भारतीय महिला चरित्र कोशाच्या पहिल्या खंडाचे बुधवारी त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

चिटणवीस केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, डॉ. विद्या देवधर, डॉ. मेघा ब्रह्मापूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. देशाला विश्वगुरू बनवायचे असेल तर महिला सक्षमीकरण आवश्यकच आहे. मात्र जी गोष्ट लहान मुलांना समजते ती अनेकदा मोठे लोक आचरणात आणत नाही. महिलांच्या उद्धारासाठी व्यवस्थेत परिवर्तन आवश्यक आहे. मात्र देशातील विविधता पाहता भारतातील महिलांच्या समस्या, त्यावरील उपाय वेगवेगळे आहेत. जगात महिला श्रेष्ठ की पुरुष यावर चर्चा होते. मात्र, आपल्या प्राचीन संस्कृतीत दोघांनाही समान स्थान देण्यात आले होते. परकीय आक्रमणानंतर आपण महिलांचे श्रेष्ठत्व विसरत गेलो. मोठमोठ्या गोष्टी करणाऱ्यांच्या घरात मातृशक्तीचे स्थान अबाधित आहे का, याचा विचार करायला हवा. मातृशक्ती उत्थान हा खरे तर पुरुषांच्याच प्रबोधनाचा विषय आहे. महिला सक्षमीकरणाची सुरुवात घरापासूनच व्हावी, असे सरसंघचालक म्हणाले.

देशातील महिलांमध्ये पृथ्वीसारखी सहनशीलता आहे. सामान्य घरातील गृहिणींमध्येदेखील असामान्य कर्तृत्व असते. जे समोर येईल ते आनंदाने ग्रहण करणे हा भारतीय महिलांचा गुण आहे. भारतीय महिलांचा आदर्श जगभरात पोहोचविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रेरणादायी चरित्रे अभ्यासक्रमातून शिकविली गेली पाहिजे, असे शांताक्का म्हणाल्या. चित्रा जोशी यांनी पुस्तक परिचय केला.

भूतकाळाला दूषणे देण्याचे चलन

आपल्या देशाचा इतिहास प्रेरणादायी होता. मात्र, इंग्रजांच्या काळात भूतकाळाला दूषणे देण्याचे चलन सुरू झाले व ती फॅशन झाली. आजच्या अनेक घटनांनादेखील भूतकाळाशी जोडण्यात येते. आपल्या कुटुंब व्यवस्थेला लोक नावे ठेवत होते. मात्र, आज जगभरात आपल्या कुटुंब व्यवस्थेवर अभ्यास होत आहे. भारतीय संस्कृतीबाबत आपला दृष्टिकोन चुकला असल्याची जाणीव आता पाश्चिमात्यांना होत आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत