शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : आशिष शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:49 IST

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी २० वर्षांपूर्वी त्यांच्या शौर्यातून आणि बलिदानातून देशाचे रक्षण केले. प्रसंगी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण म्हणून आज संपूर्ण देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. कारगिल युद्धातील शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी केले.

ठळक मुद्देभोसला मिलिटरी स्कूलतर्फे कारगिल विजय दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी २० वर्षांपूर्वी त्यांच्या शौर्यातून आणि बलिदानातून देशाचे रक्षण केले. प्रसंगी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण म्हणून आज संपूर्ण देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. कारगिल युद्धातील शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी केले.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भोसला मिलिटरी स्कूलद्वारा आयोजित कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, भोसला मिलिटरी स्कूलचे चेअरमन शैलेश जोगळेकर, सूर्यरतन डागा, कर्नल (सेवानिवृत्त) जे. एस. भंडारी, कुमार काळे, अजय शिर्के उपस्थित होते. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी शहिदांना पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी कारगिल वीरांच्या शौर्याचे पराक्रमाचे स्मरण करण्यात आले. कारगिल युद्धानंतर आता कोणतेही शत्रूराष्ट्र वा संघटना भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा देश तो हल्ला कदापिही सहन करणार नाही. तो हल्ला परतवून लावेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी हे युद्ध यशस्वीरीत्या पार पाडले.कारगिल युद्धामध्ये देशातील अनेकांनी आपला पती, भाऊ, मुलगा गमावला. मात्र, देशातील जनतेने त्यांना त्याची कधीही जाणिव होऊ दिली नाही. हा देश वीरमाता, वीरपिता, वीरपत्नींच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे शालेय शिक्षण व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.भोसला मिलिटरी स्कूलचे चेअरमन शैलेश जोगळेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेची आणि संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. तत्पूर्वी कारगिल विजय दिवसानिमित्त चित्रफितही दाखविण्यात आली. 

कारगिल विजय दिवसानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलच्या ५१४ कॅडेसनी शानदार परेड सादर केली. दीक्षाभूमीपासून सुरु झालेल्या परेडने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अश्वस्वारही या परेडमध्ये सहभागी झाले होते. परेडनंतर कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीरांना सलामी देण्यात आली. यावेळी भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, त्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन