शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सा.बा. खात्यातील बदल्या कागदावर

By admin | Updated: June 20, 2014 00:55 IST

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नागपूर विभागात लिपिक पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन दोन आठवड्याचा कालावधी झाला असला तरी अद्यापही कर्मचाऱ्यांना ‘रिलीव्ह’ केले नसल्याने बदल्या केवळ

नागपूर: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नागपूर विभागात लिपिक पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन दोन आठवड्याचा कालावधी झाला असला तरी अद्यापही कर्मचाऱ्यांना ‘रिलीव्ह’ केले नसल्याने बदल्या केवळ कागदोपत्रीच ठरल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर विभागातील विविध उपविभागातील लिपिक व तत्सम दर्जाच्या कर्मचाऱ्यांच्या दोन आठवड्यापूर्वी बदल्या करण्यात आल्या. पूर्व विभागातील सहा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. बदल्या झाल्यावर कर्मचाऱ्यांना रिलीव्ह करणे अपेक्षित असते.मात्र नागपुरातील उपविभाग, एक, दोन आणि तीनमध्ये याउलट चित्र आहे. बदलीचे आदेश प्राप्त होऊन दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ झाला तरी कर्मचाऱ्यांना रिलीव्ह करण्यात आले नाही. वरिष्ठांना याबाबत विचारणा केल्यावर कर्मचारी मिळाल्यावरच तुम्हाला रिलीव्ह केले जाईल असे सांगण्यात येते. कर्मचाऱ्यांना रिलीव्ह न करणे व मर्जीतील कर्मचाऱ्याची बदली झाल्यावर त्याला त्याच ठिकाणी ठेवणे यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याची माहिती हाती आली आहे.या संदर्भात अधीक्षक अभियंता व्ही.आर बनगीरवार यांच्या कानावर ही बाब टाकण्यात आली होती. मात्र त्यांनी असा काही प्रकार होत असल्याचा इन्कार केला होता. तसे होत असेल तर कर्मचाऱ्यांनी थेट संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले होते. कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेशच प्राप्त होण्यास विलंब होतो. त्यातून काही वेळा रुजू करून घेण्यास किंवा रिलीव्ह करण्यास विलंब होतो, असे त्यांनी स्पष्ट ्केले होते. या नंतर एक आठवड्याचा कालावधी लोटला. सर्व कर्मचाऱ्यांना विशेषत: उपविभागातील कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश प्राप्त होऊन दोन आठवडे झाले तरीही कर्मचाऱ्यांना अद्यापही रिलीव्ह करण्यात आले नाही. वरिष्ठ अधिकारी त्यांच्याच मर्जीने याबाबत निर्णय घेत असल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे. दर वेळी असाच प्रकार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फक्त कागदोपत्री बदल्या दाखवून कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी ठेवण्याचा प्रकार अनाकलनीय असून याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)