शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

राज्यकर्त्यांनी पाणीटंचाई समोर ठेवून नियोजन करावे : अभिजित घोरपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 23:17 IST

पाण्याच्या बाबतीत राज्यकर्त्यांकडून वस्तुस्थिती मांडल्या जात असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भवतालचे संपादक अभिजित घोरपडे यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देसातव्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याच्या बाबतीत राज्यकर्त्यांकडून वस्तुस्थिती मांडल्या जात असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भवतालचे संपादक अभिजित घोरपडे यांनी आज येथे केले.महिला पाणी मंच आणि आकांक्षा मासिकाच्यावतीने शंकरनगरच्या साई सभागृहात आयोजित सातव्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले. व्यासपीठावर संयोजक अरुणा सबाने, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, उल्का महाजन, बबनराव तायवाडे, वंदना महात्मे, रमेश बोरकुटे, वृंदा ठाकरे, अतुल गुडधे उपस्थित होते. अभिजित घोरपडे म्हणाले, पाणीप्रश्न गुंतागुंतीचा आहे. त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. महाराष्ट्रात बऱ्याच भागात दुष्काळ असताना स्मार्ट सिटीमध्ये पाण्याची गळती ४० ते ४५ टक्के आहे. जलसाक्षरता नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असून त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून पाण्याचा अपव्यय टाळण्यास सुरुवात करावी. माजी मंत्री वसंत पुरके म्हणाले, साहित्यातून जीवनाचे प्रतिबिंब प्रतिबिंबित होण्याची गरज आहे. संवेदनशील नेतृत्व असले की पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नसून पुढील संमेलनात जलसंपदा मंत्र्यांना बोलविण्याची सूचना त्यांनी केली. उल्का महाजन म्हणाल्या, पाण्याचा प्रश्न सामाजिक न्यायाचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे. उद्योगधंद्यांमुळे नद्या, धरणे प्रदूषित होत असून नदीशेजारी उद्योगांना जागा खुल्या करण्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकातून अरुणा सबाने यांनी गावोगावची पाणीटंचाई पाहून साहित्यिकांना या चळवळीशी जोडल्याचे सांगून महिला पाणी मंचाने पाणीटंचाईबाबत राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते नीर-क्षीर स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात गो. ना. मुलघाटे चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. संचालन डॉ. स्मिता वानखेडे यांनी केले.साहित्यिकांची मने मोठी व्हावीत : सुरेश द्वादशीवारसाहित्यिकांच्या मनात खेड्यातील नागरिकांच्या समस्या येणे गरजेचे असून साहित्यिकांची मने मोठी झाली पाहिजेत. साहित्यिकांनी समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास समाजही त्यांच्याकडे दुर्लक्ष करेल, असे मत लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, पाणीटंचाई दूर करण्याची जबाबदारी असलेले बेजबाबदारपणे वागत आहेत. तेलंगणातील पाणीप्रश्न तेथील राज्यकर्त्यांनी सोडविला. त्यामुळे राज्यकर्त्यांना नाकर्तेपणा सोडण्याची गरज आहे. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन पाणीप्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Waterपाणीliteratureसाहित्य