शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्त्यांनी पाणीटंचाई समोर ठेवून नियोजन करावे : अभिजित घोरपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 23:17 IST

पाण्याच्या बाबतीत राज्यकर्त्यांकडून वस्तुस्थिती मांडल्या जात असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भवतालचे संपादक अभिजित घोरपडे यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देसातव्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याच्या बाबतीत राज्यकर्त्यांकडून वस्तुस्थिती मांडल्या जात असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भवतालचे संपादक अभिजित घोरपडे यांनी आज येथे केले.महिला पाणी मंच आणि आकांक्षा मासिकाच्यावतीने शंकरनगरच्या साई सभागृहात आयोजित सातव्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले. व्यासपीठावर संयोजक अरुणा सबाने, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, उल्का महाजन, बबनराव तायवाडे, वंदना महात्मे, रमेश बोरकुटे, वृंदा ठाकरे, अतुल गुडधे उपस्थित होते. अभिजित घोरपडे म्हणाले, पाणीप्रश्न गुंतागुंतीचा आहे. त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. महाराष्ट्रात बऱ्याच भागात दुष्काळ असताना स्मार्ट सिटीमध्ये पाण्याची गळती ४० ते ४५ टक्के आहे. जलसाक्षरता नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असून त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून पाण्याचा अपव्यय टाळण्यास सुरुवात करावी. माजी मंत्री वसंत पुरके म्हणाले, साहित्यातून जीवनाचे प्रतिबिंब प्रतिबिंबित होण्याची गरज आहे. संवेदनशील नेतृत्व असले की पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नसून पुढील संमेलनात जलसंपदा मंत्र्यांना बोलविण्याची सूचना त्यांनी केली. उल्का महाजन म्हणाल्या, पाण्याचा प्रश्न सामाजिक न्यायाचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे. उद्योगधंद्यांमुळे नद्या, धरणे प्रदूषित होत असून नदीशेजारी उद्योगांना जागा खुल्या करण्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकातून अरुणा सबाने यांनी गावोगावची पाणीटंचाई पाहून साहित्यिकांना या चळवळीशी जोडल्याचे सांगून महिला पाणी मंचाने पाणीटंचाईबाबत राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते नीर-क्षीर स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात गो. ना. मुलघाटे चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. संचालन डॉ. स्मिता वानखेडे यांनी केले.साहित्यिकांची मने मोठी व्हावीत : सुरेश द्वादशीवारसाहित्यिकांच्या मनात खेड्यातील नागरिकांच्या समस्या येणे गरजेचे असून साहित्यिकांची मने मोठी झाली पाहिजेत. साहित्यिकांनी समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास समाजही त्यांच्याकडे दुर्लक्ष करेल, असे मत लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, पाणीटंचाई दूर करण्याची जबाबदारी असलेले बेजबाबदारपणे वागत आहेत. तेलंगणातील पाणीप्रश्न तेथील राज्यकर्त्यांनी सोडविला. त्यामुळे राज्यकर्त्यांना नाकर्तेपणा सोडण्याची गरज आहे. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन पाणीप्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Waterपाणीliteratureसाहित्य