शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आरटीईची प्रवेश प्रक्रिया ठप्प : पालकांच्या चिंतेत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 20:17 IST

तीन महिन्यापूर्वी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. लॉकडाऊनच्या काळात सोडतही जाहीर झाली. पालकांच्या मोबाईलवर निवड झाल्याचे संदेशही प्राप्त झाले. मात्र शाळा बंद असल्याने आणि शासनाकडून आरटीई प्रवेशाच्या बाबतीत कुठलाही विकल्प न दिल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत.

ठळक मुद्देखासगी शाळांमध्ये प्रवेशाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन महिन्यापूर्वी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. लॉकडाऊनच्या काळात सोडतही जाहीर झाली. पालकांच्या मोबाईलवर निवड झाल्याचे संदेशही प्राप्त झाले. मात्र शाळा बंद असल्याने आणि शासनाकडून आरटीई प्रवेशाच्या बाबतीत कुठलाही विकल्प न दिल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. दुसरीकडे खासगी शाळांनी प्रवेश प्रक्रिया राबवायला सुरुवात केली आहे.मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश आरक्षित असतात. त्याअंतर्गत खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीई लागू झाल्यापासून आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या माध्यमातून विविध शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र आरटीईतून दिल्या जाणाऱ्या मोफत प्रवेशामुळे राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. त्यामुळे सरकारने गेल्या वर्षीपासून आरटीईच्या नियमात बदल केला आहे. नव्या नियमानुसार घराच्या परिघापासून दीड किलोमीटर परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा उपलब्ध नसेल तरच पालकांना आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येतो. त्यामुळे आरटीईसाठी उपलब्ध असलेल्या शाळा व जागांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. यंदा २०२०-२१ या शैक्षणिक सत्रासाठी जिल्ह्यात ६८० शाळांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार ६,७८५ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या.शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे यावेळी आरटीई प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षण खात्याने आरटीई प्रवेश प्रक्रियेला चालना दिली तरी प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाnagpurनागपूर