शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईची प्रवेश प्रक्रिया ठप्प : पालकांच्या चिंतेत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 20:17 IST

तीन महिन्यापूर्वी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. लॉकडाऊनच्या काळात सोडतही जाहीर झाली. पालकांच्या मोबाईलवर निवड झाल्याचे संदेशही प्राप्त झाले. मात्र शाळा बंद असल्याने आणि शासनाकडून आरटीई प्रवेशाच्या बाबतीत कुठलाही विकल्प न दिल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत.

ठळक मुद्देखासगी शाळांमध्ये प्रवेशाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन महिन्यापूर्वी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. लॉकडाऊनच्या काळात सोडतही जाहीर झाली. पालकांच्या मोबाईलवर निवड झाल्याचे संदेशही प्राप्त झाले. मात्र शाळा बंद असल्याने आणि शासनाकडून आरटीई प्रवेशाच्या बाबतीत कुठलाही विकल्प न दिल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. दुसरीकडे खासगी शाळांनी प्रवेश प्रक्रिया राबवायला सुरुवात केली आहे.मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश आरक्षित असतात. त्याअंतर्गत खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीई लागू झाल्यापासून आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या माध्यमातून विविध शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र आरटीईतून दिल्या जाणाऱ्या मोफत प्रवेशामुळे राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. त्यामुळे सरकारने गेल्या वर्षीपासून आरटीईच्या नियमात बदल केला आहे. नव्या नियमानुसार घराच्या परिघापासून दीड किलोमीटर परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा उपलब्ध नसेल तरच पालकांना आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येतो. त्यामुळे आरटीईसाठी उपलब्ध असलेल्या शाळा व जागांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. यंदा २०२०-२१ या शैक्षणिक सत्रासाठी जिल्ह्यात ६८० शाळांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार ६,७८५ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या.शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे यावेळी आरटीई प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षण खात्याने आरटीई प्रवेश प्रक्रियेला चालना दिली तरी प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाnagpurनागपूर