शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आररएसएसचा राष्ट्रवाद हिटलर-मुसोलिनीशी प्रेरित : भूपेश बघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 21:18 IST

इतरांना राष्ट्रवाद शिकविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चा राष्ट्रवाद हा हुकूमशाहीचे प्रतीक असलेल्या हिटलर व मुसोलिनीशी प्रेरित असल्याची टीका काँग्रेस नेते व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्देगांधीजींना स्वीकारताना गोडसेला नाकारणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतरांना राष्ट्रवाद शिकविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चा राष्ट्रवाद हा हुकूमशाहीचे प्रतीक असलेल्या हिटलर व मुसोलिनीशी प्रेरित असल्याची टीका काँग्रेस नेते व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सोमवारी नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. बघेल म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढाईत आरएसएसची कुठलीही भूमिका नव्हती. ते इंग्रजांचे अनुयायी होते, तरीही इतक्या वर्षांत त्यांना कधी काँग्रेसने देशद्रोही ठरविले नाही. काँग्रेस महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालतो. महात्मा गांधीजींचा राष्ट्रवाद हा या देशातील पारंपरिक राष्ट्रवाद आहे. भगवान महावीर व गौतम बुद्ध यांच्या विचारांचे प्रतीक म्हणजे महात्मा गांधी होते. त्यांच्या १५० व्या जन्मशताब्दी महोत्सवी वर्षात भाजपचे नेते पदयात्रा काढत आहेत. भाजपवाले महात्मा गांधीजींचे विचार स्वीकारताहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. परंतु महात्मा गांधीजींचे विचार स्वीकारत असतानाच नाथुराम गोडसे यांचा विरोध करणार का? गोडसे मुर्दाबाद म्हणणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.भाजप निवडणुकीमध्ये कधीच मुद्यांवर बोलत नाही. जीएसटी, नोटाबंदीमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. परंतु यावर साधा शब्दही निवडणुकीत काढला जात नाही. रिझर्व्ह बँकेकडून १ लाख ७४ हजार कोटी रुपये काढून घेतले, याचा उल्लेखही नसल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, अभिजित वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.महाराष्ट्राला केंद्रशासित केले तर चालेल का?कमल ३७० बाबत बोलताना बघेल म्हणाले, कुठल्याही राज्याला विचारात न घेता केंद्रशासित राज्य बनविणे योग्य नाही. उद्या जर महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली नाही, तर एक अध्यादेश काढून महाराष्ट्राला केंद्रशासित राज्य करण्यात आले तर तुम्हाला चालेल का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Mediaमाध्यमेcongressकाँग्रेस