शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या भूमिकेचे सरसंघचालकांनी केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 16:51 IST

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र शासनाने उचललेल्या पावलाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वागत करण्यात आले आहे.

नागपूर : जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र शासनाने उचललेल्या पावलाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वागत करण्यात आले आहे . केंद्राची ही भूमिका अतिशय साहसपूर्ण असल्याचे कौतुकोद्गार सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी काढले आहे. दरम्यान, या निर्णयानंतर संघ वर्तुळासह भाजपात आनंदाचे वातावरण आहे.

केंद्र शासनाच्या या साहसपूर्ण पावलाचे आम्ही स्वागत करतो. जम्मू-काश्मीरसह संपूर्ण देशासाठी हे अत्यावश्यक होते. देशातील सर्वांनी आपला स्वार्थ व राजकारण यांच्या पलिकडे जात याचे स्वागत व समर्थन केले पाहिजे, असे मत डॉ.मोहन भागवत व भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

देशहिताचे पाऊलराष्ट्रसेविका समितीतर्फेदेखील या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे खºया अर्थाने आज भारतात विलीनीकरण झाले आहे. ही ठो भूमिका घेण्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता होती. हे देशहिताचे पाऊल असून सर्व भारतीय याचे स्वागतच करतील, असे मत समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले.

काश्मीर साखळदंडातून मुक्त झालापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने एक नवीन इतिहास रचला आहे. जम्मू-काश्मीरला कलम ३७० च्या साखळदंडातून मुक्त करत श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्वप्नाला साकार केले आहे. हा निर्णय राष्ट्रीय एकतेला मजबूती देण्याची इच्छाशक्तीच दर्शविणारा आहे.-नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत