शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

केंद्राच्या भूमिकेचे सरसंघचालकांनी केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 16:51 IST

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र शासनाने उचललेल्या पावलाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वागत करण्यात आले आहे.

नागपूर : जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र शासनाने उचललेल्या पावलाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वागत करण्यात आले आहे . केंद्राची ही भूमिका अतिशय साहसपूर्ण असल्याचे कौतुकोद्गार सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी काढले आहे. दरम्यान, या निर्णयानंतर संघ वर्तुळासह भाजपात आनंदाचे वातावरण आहे.

केंद्र शासनाच्या या साहसपूर्ण पावलाचे आम्ही स्वागत करतो. जम्मू-काश्मीरसह संपूर्ण देशासाठी हे अत्यावश्यक होते. देशातील सर्वांनी आपला स्वार्थ व राजकारण यांच्या पलिकडे जात याचे स्वागत व समर्थन केले पाहिजे, असे मत डॉ.मोहन भागवत व भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

देशहिताचे पाऊलराष्ट्रसेविका समितीतर्फेदेखील या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे खºया अर्थाने आज भारतात विलीनीकरण झाले आहे. ही ठो भूमिका घेण्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता होती. हे देशहिताचे पाऊल असून सर्व भारतीय याचे स्वागतच करतील, असे मत समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले.

काश्मीर साखळदंडातून मुक्त झालापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने एक नवीन इतिहास रचला आहे. जम्मू-काश्मीरला कलम ३७० च्या साखळदंडातून मुक्त करत श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्वप्नाला साकार केले आहे. हा निर्णय राष्ट्रीय एकतेला मजबूती देण्याची इच्छाशक्तीच दर्शविणारा आहे.-नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत