शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

आरएसएस-भाजपाचा राष्ट्रवाद फसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 20:05 IST

देशात दलित, मुस्लीम, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत़ आसिफाचे प्रकरण ताजे आहे़ उठताबसता राष्ट्रवादाच्या गप्पा मारणारे भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवारातील संघटनांचे लोक या विषयावर गप्प आहेत. त्यांचा राष्ट्रवाद फसवा आहे, असा घणाघाती आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथील विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी केला़.

ठळक मुद्देशेहला रशीद यांचा आरोप : देशात सामाजिक न्यायाची कुचंबणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात दलित, मुस्लीम, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत़ आसिफाचे प्रकरण ताजे आहे़ उठताबसता राष्ट्रवादाच्या गप्पा मारणारे भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवारातील संघटनांचे लोक या विषयावर गप्प आहेत. त्यांचा राष्ट्रवाद फसवा आहे, असा घणाघाती आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथील विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी केला़रिपब्लिकन युथ फेडरेशनतर्फे शुक्रवारी ‘वर्तमान स्थिती व लोकतांत्रिक आव्हाने’ या विषयावर शेहला रशीद यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले़ सीताबर्डी परिसरातील अमृत भवन येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी जेएनयूतील मोहित पांडे यांचीही विशेष उपस्थिती होती़ व्यासपीठावर शहीद भगत सिंग विचार मंचचे गुरुप्रित सिंग, बानाई संघटनेचे पदाधिकारी जयंत इंगळे, रिपब्लिकन युथ फेडरेशनचे अध्यक्ष राहुल जारोंडे उपस्थित होते़ रिपब्लिकन विचारवंत रमेश जीवने अध्यक्षस्थानी होते.शेहला रशीद म्हणाल्या, ७०० वषार्पूर्वी या देशात एक राजा आला. त्याने मंदिर पाडून मशीद बांधली़ त्या मुद्यावंर आरएसएस आजही राजकारण करीत आहे़ पण, उणामध्ये काय झाले, नोटबंदीत लोकांचे कसे हाल झाले, यावर ते बोलत नाही़ आसिफावर अत्याचार झाला़ तिला मंदिरात ठेवण्यात आले़ भाजपा आणि याच परिवारातील एका ‘मंच’चा यात सहभाग असून खरे तर हीच भाजपाची संस्कृती आहे़ हे लोक हिंदू एकतेच्या गोष्टी करतात़ अन् बलात्काऱ्यांना वाचविण्यासाठी तिरंगा यात्राही काढतात़ देशात महिलांवर अत्याचार होत असताना भाजपाची ‘बलात्कारी बचाव’ मोहीम सुरू आहे़ सामाजिक न्यायाची कुचंबणा होत असताना राष्ट्रवादी म्हणवणारे बोलत नाही़ तर, जे लोक या अन्यायाविरोधात बोलतात त्यांना राष्ट्रविरोधी ठरविले जाते, अशी खंतही शेहला रशीद यांनी व्यक्त केली़ रमेश जीवने व जयंत इंगळे यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक गुरप्रित सिंग यांनी केले. संचालन दीपक डोंगरे यांनी केले़. राहुल जारोंडे यांनी आभार मानले.आरक्षणाआधी जाती संपवादेशातील आरक्षण संपवावे, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करावा यासाठी हे तथाकथित राष्ट्रवादी लोक प्रयत्न करीत आहेत़ आरक्षण संपवायचे असेल तर आधी त्यांनी जाती संपवाव्यात़ अ‍ॅट्रॉसिटी संपवा अ‍ॅक्ट आपोआप रद्द होईल़ बिमारी कायम असताना औषध बंद करण्याचे कारस्थान रचू नये, असे रशीद म्हणाल्या़चुका टाळा-एकत्र याया देशातील अराजकेतविरोधात डावे आणि आंबेडकरी विचारांना मानणारे लोक संघर्ष करीत आहेत़ मात्र आम्हाला आपल्या चुका दुरुस्त कराव्या लागतील़ चुका झाल्या म्हणूनच भाजपाला संधी मिळाली़ आता दोन्ही घटकांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचेही रशीद यांनी नमूद केले़देशात अराजक, चौकीदार गप्प?राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहत आहे़ पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही़ देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे़ आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते़ जनरल डायरने ते घडविले होते़ आजही देशात जनरल डायर अस्तित्वात असून ते लोकांमधून निवडून आल्याचे सांगत मोहित पांडे यांनीही भाजपा सरकारवर तोफ डागली़

 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीnagpurनागपूर