शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आरपीएफचे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' १० महिन्यात ९५८ मुले पोहचली कुटुंबियांत

By नरेश डोंगरे | Updated: February 8, 2024 20:23 IST

रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या १० महिन्यात ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत ९५८ मुलांचे भवितव्य सुरक्षित करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पोहचवले.

नागपूर : रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या १० महिन्यात ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत ९५८ मुलांचे भवितव्य सुरक्षित करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पोहचवले. आरपीएफकडे मुख्यत्वे रेल्वेची मालमत्ता सुरक्षित राखण्याची आणि रेल्वे प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी असते. हे करतानाच आरपीएफ वेगवेगळ्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडते. प्रसंगी जीव धोक्यात घालून रेल्वे प्रवाशांचे जीवही वाचविते.

शिवाय वेगवेगळ्या कारणामुळे घर सोडून निघालेल्या अल्पवयीन मुलांना सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पोहचविण्याचे कामही आरपीएफचे जवान करतात. अनेकदा कुणी आमिष दाखवून तर कुणी फूस लावून अल्पवयीन मुला-मुलींना पळवून नेतात. काही जण रागाच्या भरात घर सोडतात तर काही जण मनासारखे जगण्याच्या हेतूने घरापासून दूर पळून स्वत:चे भवितव्य अंधारात झोकण्याचा धोका पत्करतात. अशा सर्व अल्पवयीन मुला-मुलींना अलगद हेरून आरपीएफ त्यांना ताब्यात घेते आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने त्यांचे योग्य समुपदेशन करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांमध्ये पोहचविते.

एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या १० महिन्यांच्या कालावधीत अशाच प्रकारे आरपीएफने मध्य रेल्वेच्या पाच विभागातील एकूण ९५८ मुलांना ताब्यात घेतले आणि त्यांना त्यांच्या घरी पोहचवून त्यांचे अंधकारमय होऊ पाहणारे भवितव्य सुरक्षित केले आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही दिलासा दिला. या महत्वपूर्ण कामगिरीत आरपीएफला रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि फ्रंट लाईन रेल्वे कर्मचाऱ्यांनीही मदत केली.मुलांची संख्या दुप्पटपेक्षा जास्त

विशषे म्हणजे, आरपीएफने अवघ्या एका महिन्यात अर्थात जानेवारी २०२४ मध्ये ५६ मुला-मुलींना ताब्यात घेतले आहे. घरून पळून जाणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या अधिक आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या ९५८ मुला-मुलींमध्ये ६५५ मुले तर ३०३ मुलींचा समावेश आहे.

विभागनिहाय ताब्यात घेण्यात आलेली मुले

मुंबई विभाग : १७५ मुले, ११४ मुली, एकूण २८९नागपूर विभाग : ७६ मुले, ५६ मुली, एकूण १३२भुसावळ विभाग :१६९ मुले, १०१ मुली, एकूण २७०पुणे विभाग : १९८ मुले, ८ मुली, एकूण २०६सोलापूर विभाग : ३७ मुले, २४ मुली, एकूण ६१