शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

आरपीएफ जवानांची मेस होणार ‘अत्याधुनिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 10:50 IST

Nagpur News कोरोनाच्या काळात जवानांना स्वच्छ भोजन मिळावे यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पाऊल उचलले असून या मेसमध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे स्वयंपाक तयार करण्याची तयारी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसर्वांना मिळेल ‘हायजीन फुड’ मशीनने होणार भोजन तयार

दयानंद पाईकराव

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलात सध्या अजनी आणि नागपूर येथे दोन मेस आहेत. येथे जवानांसाठी भोजन तयार करण्यात येते; परंतु कोरोनाच्या काळात जवानांना स्वच्छ भोजन मिळावे यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पाऊल उचलले असून या मेसमध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे स्वयंपाक तयार करण्याची तयारी करण्यात येत आहे. मशीन मागविण्यासाठी निविदा काढण्यात आली असून फेब्रुवारीअखेरपर्यंत मशीनच्या साह्याने तयार केलेले भोजन आरपीएफच्या जवानांना मिळणार आहे.

रेल्वे सुरक्षा दलात अनेकदा बदली झाल्यानंतर अनेक अधिकारी आणि आरपीएफ जवान आपले कुटुंबीयांना सोबत आणत नाहीत. ते रेल्वे सुरक्षा दलाच्या बॅरेकमध्ये राहतात. तेथे उपलब्ध असलेल्या मेसमधील भोजन करतात. परंतु अनेकदा मेसमधील भोजन तयार करणाऱ्या व्यक्तींकडून स्वच्छतेबाबत हवी तशी काळजी घेण्यात येत नाही. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना स्वच्छ भोजन मिळावे यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार आरपीएफच्या मेसमध्ये भोजन तयार करण्यासाठी अत्याधुनिक मशिन्स मागविण्यात येत आहेत. त्यात कणीक भिजविण्याची मशीन, चपाती तयार करणारी मशीन, राईस मेकर आदी मशीनची समावेश आहे. या मशीनच्या खरेदीसाठी निविदा काढण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या मशीन आरपीएफच्या मेसमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर आरपीएफच्या जवानांना मशीनच्या साह्याने तयार केलेले भोजन उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ५.३० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. सध्या आरपीएफच्या अजनी येथील मेसमध्ये ७५ जवान आणि नागपूर रेल्वेस्थानकावरील मेसमध्ये २५ असे एकूण १०० अधिकारी आणि जवान मेसमध्ये भोजन करतात. या मेसमध्ये भोजन तयार करण्यासाठी ६ कर्मचारी कामाला आहेत. मशीन आल्यानंतर दोन कर्मचारीच मेसचा कारभार सांभाळणार आहेत. यामुळे मनुष्यबळाची बचत होण्यासोबतच जवानांना स्वच्छ भोजनही मिळणार आहे.

फेब्रुवारीअखेर दाखल होणार मशीन

आरपीएफ जवानांना स्वच्छ भोजन पुरविण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा मेसमध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली असून फेब्रवारीअखेर जवानांना मशीनच्या साह्याने तयार केलेले स्वच्छ भोजन पुरविण्यात येईल.

-आशुतोष पांडे, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे