शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

दोन दिवसात आरपीएफने केली ६६ रेल्वेगाड्यांची तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 21:10 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे बहुतांश रेल्वेगाड्या जागेवरच ठप्प झाल्या होत्या. या गाड्यात प्रवासी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसात रेल्वे सुरक्षा दलाने ६६ रेल्वेगाड्यांची तपासणी केली आहे.

ठळक मुद्देरेल्वे बोर्डाचे तपासणीचे आदेश : विविध दिशांना जाताहेत रिकाम्या रेल्वेगाड्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे बहुतांश रेल्वेगाड्या जागेवरच ठप्प झाल्या होत्या. या रेल्वेगाड्या आता आपल्या मूळ ठिकाणी परत जात आहेत. या गाड्यात प्रवासी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसात रेल्वे सुरक्षा दलाने ६६ रेल्वेगाड्यांची तपासणी केली आहे.रेल्वे वाहतूक बंद केल्यामुळे बहुतांश रेल्वेगाड्या ठिकठिकाणी अडकून पडल्या आहेत. रेल्वे वाहतूक सुरु करण्याचा निर्णय झाल्यास सर्व वाहतूक एकाच वेळी सुरु झाली पाहिजे, यासाठी रेल्वेने विविध ठिकाणी असलेल्या रेल्वेगाड्या आपल्या मूळ रेल्वेस्थानकांवर पाठविणे सुरु केले आहे. नागपूर रेल्वेस्थानकावरून मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात एकूण ६६ रेल्वेगाड्या गेल्या. यात हावडा, इटारसी, मुंबई, चेन्नई या भागातील रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. रिकाम्या रेल्वेगाड्या जात असल्यामुळे यात प्रवासी प्रवास करण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशा स्थितीत प्रवासी या रिकाम्या जाणाऱ्या गाड्यातून प्रवास करीत असतील तर ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे या रिकाम्या गाड्यांची तपासणी करण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा दलाला मिळाले आहेत. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलाने दोन दिवसात नागपूर रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या ६६ रेल्वेगाड्यांची तपासणी केली आहे. परंतु या गाड्यात एकही प्रवासी प्रवास करताना आढळून आला नाही.तपासणी सुरुच राहणार‘रिकाम्या मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्या आपल्या मुळ रेल्वेस्थानकांवर परत जात आहेत. या गाड्यांची कसून तपासणी करून त्यात प्रवासी तर नाहीत ना याची खात्री करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत. त्यानुसार रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी यापुढेही सुरुच राहणार आहे.’आशुतोष पाण्ड्येय, विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर