शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दोन दिवसात आरपीएफने केली ६६ रेल्वेगाड्यांची तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 21:10 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे बहुतांश रेल्वेगाड्या जागेवरच ठप्प झाल्या होत्या. या गाड्यात प्रवासी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसात रेल्वे सुरक्षा दलाने ६६ रेल्वेगाड्यांची तपासणी केली आहे.

ठळक मुद्देरेल्वे बोर्डाचे तपासणीचे आदेश : विविध दिशांना जाताहेत रिकाम्या रेल्वेगाड्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे बहुतांश रेल्वेगाड्या जागेवरच ठप्प झाल्या होत्या. या रेल्वेगाड्या आता आपल्या मूळ ठिकाणी परत जात आहेत. या गाड्यात प्रवासी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसात रेल्वे सुरक्षा दलाने ६६ रेल्वेगाड्यांची तपासणी केली आहे.रेल्वे वाहतूक बंद केल्यामुळे बहुतांश रेल्वेगाड्या ठिकठिकाणी अडकून पडल्या आहेत. रेल्वे वाहतूक सुरु करण्याचा निर्णय झाल्यास सर्व वाहतूक एकाच वेळी सुरु झाली पाहिजे, यासाठी रेल्वेने विविध ठिकाणी असलेल्या रेल्वेगाड्या आपल्या मूळ रेल्वेस्थानकांवर पाठविणे सुरु केले आहे. नागपूर रेल्वेस्थानकावरून मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात एकूण ६६ रेल्वेगाड्या गेल्या. यात हावडा, इटारसी, मुंबई, चेन्नई या भागातील रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. रिकाम्या रेल्वेगाड्या जात असल्यामुळे यात प्रवासी प्रवास करण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशा स्थितीत प्रवासी या रिकाम्या जाणाऱ्या गाड्यातून प्रवास करीत असतील तर ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे या रिकाम्या गाड्यांची तपासणी करण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा दलाला मिळाले आहेत. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलाने दोन दिवसात नागपूर रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या ६६ रेल्वेगाड्यांची तपासणी केली आहे. परंतु या गाड्यात एकही प्रवासी प्रवास करताना आढळून आला नाही.तपासणी सुरुच राहणार‘रिकाम्या मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्या आपल्या मुळ रेल्वेस्थानकांवर परत जात आहेत. या गाड्यांची कसून तपासणी करून त्यात प्रवासी तर नाहीत ना याची खात्री करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत. त्यानुसार रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी यापुढेही सुरुच राहणार आहे.’आशुतोष पाण्ड्येय, विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर