शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

चोरी गेलेले साहित्य परत देऊन आरपीएफने दिला प्रवाशांना दिलासा

By नरेश डोंगरे | Updated: May 27, 2024 22:04 IST

आरपीएफकडून चोरट्यांना दणका; २१ लाख, ३७ हजारांच्या चिजवस्तू प्रवाशांना परत

नागपूर : घाईगडबडीत कुणी प्रवासाला निघालेल्या शंभरावर व्यक्तींच्या सामानाचा छडा लावून त्या चिजवस्तू ज्याच्या त्याला परत करण्याची कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) बजावली आहे. चोरीला गेलेले सामान परत मिळत नाही, असा गैरसमज दूर करून या निमित्ताने आरपीएफने प्रवाशांच्या मनात एक नवा विश्वासही निर्माण केला आहे.

अलिकडे विविध मार्गावरील रेल्वे गाड्यांत प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. या गर्दीची संधी साधून चोर भामटे प्रवाशांचे किंमती सामान, रोख रक्कम लांबवित आहेत. तशा तक्रारीही नेहमीच वेगवेगळ्या रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होतात. दुसरीकडे अशा चोर भामट्यांना जेरबंद करण्याची जबाबदारी असलेले आरपीएफही सक्रिय असते. गर्दीतून ते संशयीतांना हेरतात आणि चाैकशीतून चोर-भामट्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून गुन्ह्यांची कबुली मिळवतानाच चोरीचे साहित्यही जप्त करतात.

जानेवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने पन्नासावर चोरट्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून २१ लाख, ३७ हजारांच्या चिजवस्तू जप्त केल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणावर मोबाईल्स आहेत. काही प्रवाशांचे चोरीला गेलेले दागिने, रोख रक्कम आणि ईतर चिजवस्तूंचाही समावेश आहे. आरपीएफने या सर्व चिजवस्तूंची ओळख पटवून त्या ज्याच्या त्यांना परतही केल्या आहेत.

विद्यार्थ्यांची कागदपत्र, मोबाईलही मिळाला

रोजगार अथवा अन्य शैक्षणिक कामाच्या निमित्ताने गावोगावचे विद्यार्थी प्रवासाला निघतात. चोर-भामटे त्या विद्यार्थ्यांनाही सोडत नाहीत. त्यांच्या बॅग, मोबाईल लंपास करतात. शैक्षणिक कागदपत्रे चोरीला गेली तर अनेक विद्यार्थी नैराश्याने घेरले जातात. आरपीएफने चोरट्यांना जेरबंद केल्यानंतर त्यांच्या ताब्यातून काही विद्यार्थ्यांचे चोरीला गेलेले मोबाईल अन् शैक्षणिक तसेच अन्य महत्वाची कागदपत्रही परत मिळवून दिली आहेत.

तातडीने तक्रार नोंदवा

एकदा चोरीला गेलेली चिजवस्तू परत मिळत नाही, असा अनेकांचा समज असतो. मात्र, वेळीच आरपीएफ किंवा रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदविल्यास गुन्ह्यांचा छडा लावणे सोपे असते. त्यामुळे प्रवाशांनी असे काही झाल्यास रेल्वेच्या हेल्पलाईन नंबरवर, आरपीएफ किंवा रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRailway Passengerरेल्वे प्रवासीIndian Railwayभारतीय रेल्वे