शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दाेन एकरातील साेयाबीनवर फिरविला राेटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:16 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क मेंढाला : साेयाबीनच्या पिकावर सुरुवातीला खाेडमाशी या किडीचा आणि नंतर येल्लाे माेझॅक या विषाणूजन्य राेगाचा प्रादुर्भाव ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मेंढाला : साेयाबीनच्या पिकावर सुरुवातीला खाेडमाशी या किडीचा आणि नंतर येल्लाे माेझॅक या विषाणूजन्य राेगाचा प्रादुर्भाव झाल्याने वासुदेव दंढारे, रा. वाढाेणा, ता. नरखेड येथील शेतकऱ्याचे दाेन एकरातील पीक पूर्णपणे नष्ट झाले. या दाेन एकरात मूठभर साेयाबीनचे उत्पादन हाेण्याची शक्यता मावळल्याने शेतकऱ्याने शेतातील संपूर्ण साेयाबीनचे पीक राेटाव्हेटर फिरवून काढून टाकले.

यासंदर्भात वासुदेव दंढारे यांनी सांगितले की, साेयाबीनचे पीक दिवाळीआधी येत असल्याने तसेच त्याचा उत्पादन खर्च कमी असल्याने आपण यावर्षी दाेन एकरात साेयाबीनची पेरणी केली हाेती. सुरुवातीला पिकाची अवस्था चांगली हाेती. मात्र, नंतर खाेडमाशीचा प्रादुर्भाव झाला. खाेडमाशी नियंत्रणात आणण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. फलधारणा व्हायला सुरुवात हाेताच येल्लाे माेझॅकचा प्रादुर्भाव झाला. हा राेग नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा महागड्या औषधांची फवारणी केली. मात्र, काहीही उपयाेग झाला नाही. उलट, संपूर्ण पीक पिवळे पडायला लागले. दाेन एकरात पायलीभर साेयाबीन हाेणार नसल्याने संपूर्ण पीक राेटाव्हेटरने काढून टाकण्याचा निर्णय घेतला, असेही वासुदेव दंढारे यांनी सांगितले.

वातावरणातील प्रतिकूल बदल, पावसाची अनियमितता, सततचे दमट वातावरण यासह अन्य कारणांमुळे पीक कीड व राेगाला बळी पडले, अशी माहिती कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली. असाच प्रकार नरखेड तालुक्यातील मेंढला, वाढोणा, रामठी, हिवरमठ, आरंभी, उदापूर, बानोर (चंद्र), दावसा, थडीपवनी, अंबाडा, सायवाडा, ताराउतारा, खलानगोदी, साखरखेडा, सिंजर, वडविहिरा, दातेवाडी, उमठा या शिवारात आढळून येताे. हातचे पीक गेल्याने शासनाने या संपूर्ण भागातील कीड व राेगग्रस्त साेयाबीनच्या पिकाचे सर्वेक्षण करून याेग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

...

कालबाह्य झालेले बियाणे

राेग व किडींना कायम नियंत्रणात आणणे शक्य नाही. कीड व राेगांपासून पिकांना वाचविण्यासाठी माेठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्याने एकीकडे उत्पादन खर्च वाढताे. बाजारात रास्त भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी ताेटाच पडताे. हल्ली आपल्या देशात वापरले जाणारे बहुतांश पिकांचे बियाणे कालबाह्य झाले आहेत. जगात किडी व राेगांना प्रतिबंधक असलेले बियाणे उपलब्ध आहे. केंद्र शासनाने त्या बियाण्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. शासनाने ही बंदी उठवून शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेले ‘जीएम’ (जेनेटिकली माॅडिफाईड) बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मदन कामडे, रामचंद्र बहुरूपी, वसंतराव वैद्य, परीक्षित चरपे, संदीप सेंबेकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

नुकसान भरपाई हा उपाय नाही

मागील चार वर्षापासून साेयाबीनचे पीक खाेडमाशी व येल्लाे माेझॅकमुळे उद्ध्वस्त हाेत आहे. दरवर्षी पिकाचे नुकसान हाेते व राजकीय नेत्यांद्वारे त्याचे राजकारण करीत नुकसान भरपाईची मागणी केली जाते. किडी व राेगांमुळे पिकांच्या हाेणाऱ्या दरवर्षीच्या नुकसानीवर नुकसान भरपाई हा उपाय नाही. त्यामुळे शेतकरी व त्यांच्या शेतातील पिके वाचविण्यासाठी शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययाेजना करावी, अशी मागणीही नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.