शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

संविधानामध्ये बाबासाहेबांची भूमिका व्यापक : अशोक गोडघाटे

By admin | Updated: June 20, 2016 02:53 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणांच्या नव्हे तर ब्राह्मण्याच्या विरोधात होते. त्यांना समाजात समता प्रस्थापित करायची होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणांच्या नव्हे तर ब्राह्मण्याच्या विरोधात होते. त्यांना समाजात समता प्रस्थापित करायची होती. त्यासाठी त्यांनी देशभरात चळवळ उभी केली. बाबासाहेबांची ही व्यापक भूमिका भारतीय संविधानामध्येसुद्धा आलेली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या पहिल्या सत्रातील अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याच सत्रात धम्मसंगिनी रमागोमुख, प्रा. दिलीप चव्हाण आणि चैत्रा रेडेकर यांचा सहभाग होता. महात्मा फुले यांनी उभी केलेली चळवळ बाबासाहेबांनी संपूर्ण देशभरात पसरवली असेही गोडघाटे यांनी स्पष्ट केले. चैत्रा रेडेकर यांनी राज्यघटनेचे तत्त्वज्ञान आणि घटनात्मक नैतिकता या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, संविधानाच्या प्रास्ताविकेवर एका ओळीचे विश्लेषण करून राजकारणी मोकळे होतात. हा जणू पायंडाच पडला आहे. राज्यघटनेचे तत्त्वज्ञान इतके व्यापक आहे की, ते समजून घेण्याची गरज आहे. एक व्यक्ती एक मत इतक्यावरच आपले अधिकार थांबले होते. संविधानाने त्यात अधिकची भर घालून ती जागतिक पातळीवर नेली आहे. यावेळी धम्मसंगिनी रमगोमुख यांनी बाबासाहेबांच्या धर्म, धम्म व स्त्रीविषयक विचारांवर प्रकाश टाकला तर दिलीप चव्हाण यांनी आंबेडकरांची राष्ट्र संकल्पना आणि जातिविहीन वर्गविहीन समाजरचना यावर प्रकाश टाकला.