शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रोबोटिक तंत्रज्ञानाने खाटेवरील रुग्णांचे पुनर्वसन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 21:51 IST

अपंगत्वातून रुग्णाचे पुनवर्सन करणे, त्याला त्याच्या पायावर उभे करणे, आत्मनिर्भर करणे, यात बराच कालावधी लागतो. मात्र आता हा कालावधी कमी करण्यासाठी ‘होकोमा’ हे अद्ययावत रोबोटिक यंत्र मध्यभारतात नागपुरात पहिल्यांदाच उपलब्ध झाले आहे.

ठळक मुद्देमध्यभारतात पहिल्यांदाच तंत्रज्ञान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अलिकडच्या काळात अर्धांगवायू (पॅरालिसिस), ‘स्ट्रोक’, ‘स्पायनल इन्जुरी’, ‘ब्रेन इन्जुरी’चे प्रमाण वाढले आहे. यावर अद्ययावत उपचार करून जीवाचा धोका कमी केला जाऊ शकतो. परंतु यातून येणाऱ्या अपंगत्वातून रुग्णाचे पुनवर्सन करणे, त्याला त्याच्या पायावर उभे करणे, आत्मनिर्भर करणे, यात बराच कालावधी लागतो. मात्र आता हा कालावधी कमी करण्यासाठी ‘होकोमा’ हे अद्ययावत रोबोटिक यंत्र मध्यभारतात नागपुरात पहिल्यांदाच उपलब्ध झाले आहे. या यंत्रामुळे खाटेवरील रुग्णाकडूनही ‘फिजीओथेरपी’करून घेऊन त्यांच्या हातापायात ताकद परत मिळवून देणे शक्य झाले आहे, अशी माहिती प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी व डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांनी पत्रपरिषदेत दिली.डॉ. गिरी व डॉ. पाखमोडे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) ‘पॅरालिसिस’, ‘स्ट्रोक’, ‘स्पायनल इन्जुरी’, ‘ब्रेन इन्जुरी’चे तीन लाख ५३ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील ३० हजार रुग्णांना रुग्णालात दाखल करून उपचार करण्यात आले. यातील १३ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हा आकडा एकट्या ‘न्युरॉन’ हॉस्पिटलचा आहे. यावरून असे रुग्ण किती मोठ्या संख्येत असतील यातून स्पष्ट होते. विशेष म्हणजे, यातून येणारे अपंगत्व ही एक मोठी समस्या आहे. यावर पारंपरिक ‘फिजीओथेरपी’ आहे. रुग्णांना त्याचा फायदाही होतो. परंतु यात बराच कालावधी लागतो. यामुळे अनेक रुग्ण तोचतोच व्यायाम करून कंटाळून सोडून देतात. यामुळे अपंगत्व कमी होण्यापेक्षा बळावते. अशा रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अद्ययावत ‘होकोमा’ ही ‘रोबोटिक’ यंत्रणा उभी करण्यात आली. यातील ‘लोकोमॅट’ हे उपकरण खाटेवर असलेल्या रुग्णाला जमिनीपासून काही अंतरावर अलगद उचलते. रुग्णाकडून चालण्याचा व्यायामापासून तर इतरही महत्त्वाचे व्यायाम करून घेते.‘आर्मिओ स्प्रिंग’ या रोबोटिक यंत्रामुळे हाताची ताकद तर ‘इरिगो’ यंत्रामुळे पायाची ताकद परत येण्यास मदत होते. ‘अ‍ॅण्डीगो’ रोबोटिक यंत्रामुळे चालण्याचा व्यायाम करून पडण्याची भीती दूर केली जाते. विशेष म्हणजे, हे चारही रोबोटिक यंत्र प्रत्येक व्यायामाच्यावेळी एक ‘टास्क’ देऊन रुग्णांकडून ते करवून घेते. यामुळे रुग्णाला त्यातून आनंदासोबतच एक आत्मविश्वास निर्माण करतो. परिणामी, रुग्ण लवकर बरा होतो. रोजच्या दैनंदिन कार्यासाठी दुसऱ्यावर विसंबून राहत नाही. खाटेवर असलेल्या रुग्णांसाठी ही अद्ययावत यंत्रणा वरदान ठरणारी आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Robotरोबोटtechnologyतंत्रज्ञानnagpurनागपूर