शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रस्त्यावरील मास्क, सॅनिटायझर धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 20:26 IST

रस्त्याच्या कडेला, सिग्नलवर स्वस्तात मास्क, ग्लोव्हज व सॅनिटाझरची विक्री होताना दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधाला या गोष्टी किती योग्यतेच्या आहेत, या विषयी सावधानता बाळगून अशा उत्पादनांच्या वापर टाळायला हवा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देकाही ग्राहक तोंडाला मास्क लावून पाहतात : सॅनिटायझरच्या दर्जावरही शंका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन शिथिल होताच रस्त्यावर, दुकानात, कार्यालयांमध्ये वर्दळ वाढली आहे. यामुळे आरोग्य विभागावरील जबाबदारी वाढली आहे. दुसरीकडे नागपुरात रुग्ण संख्येचा उच्चांक गाठल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचा फायदा घेत रस्त्याच्या कडेला, सिग्नलवर स्वस्तात मास्क, ग्लोव्हज व सॅनिटाझरची विक्री होताना दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधाला या गोष्टी किती योग्यतेच्या आहेत, या विषयी सावधानता बाळगून अशा उत्पादनांच्या वापर टाळायला हवा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.रस्त्याच्या कडेला, चौकात, हातठेल्यांवर १० ते २० रुपयांत मास्क, सॅनिटायझर विक्री होताना दिसून येत आहे. या विक्रीसाठी वापरण्यात येणारे मास्क व सॅनिटायझर वापरून पुन्हा त्याची विक्री करत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यामुळे नागपूरकरांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. रस्त्यावर उघड्यावर विकण्यात येणारे मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर खरेदी करू नये असा सल्ला मेयोचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी दिला आहे. बऱ्याच ठिकाणी फॅ न्सी मास्क पाहून विक्रेत्यांभोवती नागरिक गर्दी करतात. विशेष म्हणजे, काही नागरिक चेहऱ्यावर मास्क लावूनही पाहतात. कोणता सूट होतो, हे पाहून फॅ न्सी मास्क खरेदी करतात; मात्र हे धोकादायक ठरू शकते. कोरोना विकत घेण्यासारखा हा प्रकार असल्याने नागरिकांनी पॅकबंद मास्क खरेदी करायला हवेत किंवा घरी तयार केलेला मास्क वापरायला हवा. दर्जाहीन किंवा वापरून पुन्हा विक्री होत असलेल्या या उत्पादनांच्या माध्यमातून कोरोनाच्या विषाणूचे संक्रमण होऊ शकते. यामुळे या उत्पादनांची अशा स्वरूपाची खरेदी टाळायला हवी. या खेरीज बाहेर पडताना संवेदनशील गटात असणारी लहान मुले, गर्भवती, ज्येष्ठ नागरिक या व्यक्तींची अधिक काळजी घ्यायला हवी, असेही डॉ. पांडे म्हणाले.

नियमावली करणे आवश्यकरस्त्यावर विक्री करणारे विक्रेते हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. मास्क खरेदीने त्यांना दोन पैशांची मदत होणार आहे; मात्र मास्क उघड्यावर विकण्याऐवजी ते पॅकबंद असतील, यासाठी नियमावली करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये विक्रेत्यांच्याही रोजगाराचा प्रश्न सुटेल, महानगरपालिकेने यात पुढाकार घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर