शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

नागपूर जिल्ह्यातील रस्ते मार्गी लागणार : मनसर टोल नाक्यापासून होणार सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:01 IST

जिल्ह्यातील रस्त्यांचा कायापालट करण्यात येणार असून रखडलेल्या प्रकल्पांना लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. सोबतच ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात, त्यांच्या मध्यवर्ती भागापर्यंत हे मार्ग बांधण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्लीत महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गडकरी यांनीच यासंदर्भात सूचना दिल्या.

ठळक मुद्देशहरांच्या मध्य भागापर्यंत जाणार महामार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील रस्त्यांचा कायापालट करण्यात येणार असून रखडलेल्या प्रकल्पांना लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. सोबतच ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात, त्यांच्या मध्यवर्ती भागापर्यंत हे मार्ग बांधण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरीनितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्लीत महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गडकरी यांनीच यासंदर्भात सूचना दिल्या.या बैठकीला ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते. बैठकीत नागपूर जिल्ह्यातील उमरेड, काटोल, नागपूर-उमरेड, वणी-वरोरा या प्रस्तावित रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील रखडलेले रस्ते प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. सोबतच प्रस्तावित मार्गांच्या कामालादेखील गती देण्याबाबत पुढाकार घ्यावा, असे निर्देश गडकरी यांनी प्रशासनाला दिले. नागपूर- भंडारा, नागपूर-काटोल, सावनेर- धापेवाडा, नागपूर-भंडारा-रामटेक-तुमसर तसेच राज्यांतील ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात त्या शहरांच्या मध्यवर्ती भागापर्यंत हे मार्ग बांधावे, अशी सूचना गडकरी यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय महामार्ग हे शहराच्या सीमेपर्यंत बांधण्यात येत असत व पुढे त्याचे काम महापालिकांकडे सोपविण्यात येत असे. पण आता शहराच्या मध्यभागापर्यंत हे मार्ग बांधण्यात येणार आहेत. यामुळे लहान शहरांचादेखील वेगाने विकास होण्यास मदत होणार आहे. सोबतच बैठकीमध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ टोल नाका, जालना जिल्ह्यातील चिखली, नाशिक- पुणे महामार्गावरील पाच बायपास तसेच टोल नाके आणि मुंबई- गोवा महामार्ग यासारख्या एकूण २४ प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.रामटेककडे जाणाऱ्यांना दिलासारामटेक ही पवित्र नगरी म्हणून ओळखली जाते व येथे विविध धर्मांची प्रार्थना व श्रद्धास्थळे आहेत. येथे येणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील मनसर टोल नाका हा नागपूर महानगर विकास प्राधिकरणातून वगळण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. हा टोल नाका आता खवासा सीमेकडे स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे रामटेक येथे दर्शनासाठी जाणारे भविक तसेच स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोबतच पाटणसावंगी-सावनेर रस्त्यावरील टोलनाका बैतुलकडे हलविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग