शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नागपूर जिल्ह्यातील रस्ते मार्गी लागणार : मनसर टोल नाक्यापासून होणार सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:01 IST

जिल्ह्यातील रस्त्यांचा कायापालट करण्यात येणार असून रखडलेल्या प्रकल्पांना लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. सोबतच ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात, त्यांच्या मध्यवर्ती भागापर्यंत हे मार्ग बांधण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्लीत महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गडकरी यांनीच यासंदर्भात सूचना दिल्या.

ठळक मुद्देशहरांच्या मध्य भागापर्यंत जाणार महामार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील रस्त्यांचा कायापालट करण्यात येणार असून रखडलेल्या प्रकल्पांना लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. सोबतच ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात, त्यांच्या मध्यवर्ती भागापर्यंत हे मार्ग बांधण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरीनितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्लीत महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गडकरी यांनीच यासंदर्भात सूचना दिल्या.या बैठकीला ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते. बैठकीत नागपूर जिल्ह्यातील उमरेड, काटोल, नागपूर-उमरेड, वणी-वरोरा या प्रस्तावित रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील रखडलेले रस्ते प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. सोबतच प्रस्तावित मार्गांच्या कामालादेखील गती देण्याबाबत पुढाकार घ्यावा, असे निर्देश गडकरी यांनी प्रशासनाला दिले. नागपूर- भंडारा, नागपूर-काटोल, सावनेर- धापेवाडा, नागपूर-भंडारा-रामटेक-तुमसर तसेच राज्यांतील ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात त्या शहरांच्या मध्यवर्ती भागापर्यंत हे मार्ग बांधावे, अशी सूचना गडकरी यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय महामार्ग हे शहराच्या सीमेपर्यंत बांधण्यात येत असत व पुढे त्याचे काम महापालिकांकडे सोपविण्यात येत असे. पण आता शहराच्या मध्यभागापर्यंत हे मार्ग बांधण्यात येणार आहेत. यामुळे लहान शहरांचादेखील वेगाने विकास होण्यास मदत होणार आहे. सोबतच बैठकीमध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ टोल नाका, जालना जिल्ह्यातील चिखली, नाशिक- पुणे महामार्गावरील पाच बायपास तसेच टोल नाके आणि मुंबई- गोवा महामार्ग यासारख्या एकूण २४ प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.रामटेककडे जाणाऱ्यांना दिलासारामटेक ही पवित्र नगरी म्हणून ओळखली जाते व येथे विविध धर्मांची प्रार्थना व श्रद्धास्थळे आहेत. येथे येणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील मनसर टोल नाका हा नागपूर महानगर विकास प्राधिकरणातून वगळण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. हा टोल नाका आता खवासा सीमेकडे स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे रामटेक येथे दर्शनासाठी जाणारे भविक तसेच स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोबतच पाटणसावंगी-सावनेर रस्त्यावरील टोलनाका बैतुलकडे हलविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग