शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

नागपूर जिल्ह्यातील रस्ते मार्गी लागणार : मनसर टोल नाक्यापासून होणार सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:01 IST

जिल्ह्यातील रस्त्यांचा कायापालट करण्यात येणार असून रखडलेल्या प्रकल्पांना लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. सोबतच ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात, त्यांच्या मध्यवर्ती भागापर्यंत हे मार्ग बांधण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्लीत महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गडकरी यांनीच यासंदर्भात सूचना दिल्या.

ठळक मुद्देशहरांच्या मध्य भागापर्यंत जाणार महामार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील रस्त्यांचा कायापालट करण्यात येणार असून रखडलेल्या प्रकल्पांना लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. सोबतच ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात, त्यांच्या मध्यवर्ती भागापर्यंत हे मार्ग बांधण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरीनितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्लीत महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गडकरी यांनीच यासंदर्भात सूचना दिल्या.या बैठकीला ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते. बैठकीत नागपूर जिल्ह्यातील उमरेड, काटोल, नागपूर-उमरेड, वणी-वरोरा या प्रस्तावित रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील रखडलेले रस्ते प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. सोबतच प्रस्तावित मार्गांच्या कामालादेखील गती देण्याबाबत पुढाकार घ्यावा, असे निर्देश गडकरी यांनी प्रशासनाला दिले. नागपूर- भंडारा, नागपूर-काटोल, सावनेर- धापेवाडा, नागपूर-भंडारा-रामटेक-तुमसर तसेच राज्यांतील ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात त्या शहरांच्या मध्यवर्ती भागापर्यंत हे मार्ग बांधावे, अशी सूचना गडकरी यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय महामार्ग हे शहराच्या सीमेपर्यंत बांधण्यात येत असत व पुढे त्याचे काम महापालिकांकडे सोपविण्यात येत असे. पण आता शहराच्या मध्यभागापर्यंत हे मार्ग बांधण्यात येणार आहेत. यामुळे लहान शहरांचादेखील वेगाने विकास होण्यास मदत होणार आहे. सोबतच बैठकीमध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ टोल नाका, जालना जिल्ह्यातील चिखली, नाशिक- पुणे महामार्गावरील पाच बायपास तसेच टोल नाके आणि मुंबई- गोवा महामार्ग यासारख्या एकूण २४ प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.रामटेककडे जाणाऱ्यांना दिलासारामटेक ही पवित्र नगरी म्हणून ओळखली जाते व येथे विविध धर्मांची प्रार्थना व श्रद्धास्थळे आहेत. येथे येणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील मनसर टोल नाका हा नागपूर महानगर विकास प्राधिकरणातून वगळण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. हा टोल नाका आता खवासा सीमेकडे स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे रामटेक येथे दर्शनासाठी जाणारे भविक तसेच स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोबतच पाटणसावंगी-सावनेर रस्त्यावरील टोलनाका बैतुलकडे हलविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग