शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे नदीतील पाणी दूषित होऊ नये : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 00:25 IST

River water should not be polluted शहरातील सांडपाण्यामुळे नदी, नाले दूषित होऊ नयेत, यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. त्यामुळे सर्वांना शुद्ध पाणी मिळू शकेल, यासंदर्भात प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी संबंधितांना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील सांडपाण्यामुळे नदी, नाले दूषित होऊ नयेत, यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. त्यामुळे सर्वांना शुद्ध पाणी मिळू शकेल, यासंदर्भात प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी संबंधितांना दिल्या.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नीरी येथे आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार व त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ तसेच जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

शहरातील नागरिकांसाठी नागनदीच्या पाण्याचा उपयोग करून भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे दूषित भाजीपाला उत्पादित होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. या दूषित पाण्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम होणार नाही, याबाबत शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांनी चर्चा करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

कामठी व कन्हान येथील जलशुध्दीकरणाच्या कामास प्राधान्य देऊन त्या क्षेत्राची शास्त्रज्ञांमार्फत पाहणी करावी तसेच या विषयावर सखोल चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या दोन्ही क्षेत्राच्या पाहणीचे व्हिडिओ बनवून त्यानंतरच त्यावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.

या नदी क्षेत्रात घेण्यात येणाऱ्या पालक, वांगे, कोबी भाजीपाल्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा रंग गर्द हिरवा दिसतो, असे नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले.

शोष खड्डे व शौचालयासाठी बांधण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे पाणी प्रदूषणाबाबत विचारण्यात आले असता, या क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याबाबत तपास करुन अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे बैठकीत चर्चेदरम्यान सांगण्यात आले. सांडपाण्यात झाडे लावल्यास पाण्यातील घाण झाडात अडून पाणी शुध्दीकरणास मदत होते तसेच पाणी मिळाल्यामुळे झाडांची वाढ होते असे त्यांनी सांगितले. सांडपाण्यात जाळी लावून पाणी शुध्दीकरण करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.

टॅग्स :Naag Riverनाग नदीpollutionप्रदूषणcollectorजिल्हाधिकारी