शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोट्यवधींच्या फसवणुकीतील रितेश गोयल तुरुंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 22:31 IST

कोट्यवधींच्या फसवणुकीत ट्रॅव्हल्स व्यापारी रितेश गोयलला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. रितेश तुरुंगात गेल्यामुळे प्रकरणातील इतर आरोपीत खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देप्रकरणातील आरोपींवर आर्थिक शाखेची नजर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोट्यवधींच्या फसवणुकीत ट्रॅव्हल्स व्यापारी रितेश गोयलला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. रितेश तुरुंगात गेल्यामुळे प्रकरणातील इतर आरोपीत खळबळ उडाली आहे. आर्थिक शाखा या प्रकरणातील हव्या असलेल्या आरोपींवर काय कारवाई करते याकडे तक्रारकर्त्याचे लक्ष लागले आहे.ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ३.९० कोटीची फसवणूक करणाऱ्या आरोपी रितेश गोयलला अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी त्याचा भाऊ देवेंद्रला जबलपूरच्या तुरुंगातून वॉरंटवर ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. ३ ऑक्टोबरला जमानत झाल्यामुळे देवेंद्रला जबलपूरच्या तुरुंगात पाठविण्यात आले. त्यानंतर रितेशला अटक करण्यात आली. आज रितेशला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने त्यास तुरुंगात पाठविले. या प्रकरणात पोलिसांना निकिता गोयल, गोविंद गोयल आणि आणि अनिता गोयल हे हवे आहेत. त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे पोलिसांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. रितेश तुरुंगात गेल्यामुळे त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनुसार पोलिसांच्या संशयास्पद कामगिरीमुळे प्रकरणातील सत्यता बाहेर येत नाही. नागपूर, जबलपूर आणि रायपूरचे अनेक सट्टेबाज आरोपींशी जुळलेले आहेत. सट्टेबाजांनी कोट्यवधीची गुंतवणूक केली आहे. त्यांनाही तक्रारकर्ता कोळसा व्यापारी संदीप अग्रवाल यांच्याप्रमाणे ३० टक्के नफा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. ते सुद्धा बराच कालावधीपासून वसुलीसाठी मागे लागले होते. अग्रवाल यांनी तक्रार केल्यामुळे काळ्या धनाचा भंडाफोड होण्याच्या भीतीने ते भूमिगत झाले आहेत. बारकाईने तपास केल्यास प्रकरणातील सत्यता बाहेर येऊ शकते. आरोपींना त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होण्याची पूर्वीच माहिती होती. जबलपूर पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे देवेंद्रला पोलिसांशी व्यवहार कसा करायचा हे माहीत होते. त्यामुळे आर्थिक शाखा आठवडा होऊनही आरोपींकडून ठोस माहिती मिळवू शकली नाही.युवतीची भूमिका महत्त्वाचीसूत्रांनुसार या प्रकरणात आरोपींकडे काम करणाऱ्या एका युवतीची महत्त्वाची भूमिका आहे. ती बऱ्याच काळापासून आरोपींकडे काम करत असून गोयल बंधूंचा तिच्यावर विश्वास आहे. तिला गोयल बंधूंच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती आहे. प्रकरणाची पोलीस तक्रार झाल्यामुळे ती सतर्क झाली होती. गोयल बंधूंच्या अटकेनंतर स्वत:च्या बचावासाठी प्रयत्न करीत आहे. तिची चौकशी केल्यास धक्कादायक बाबींचा खुलासा होऊ शकतो.

टॅग्स :fraudधोकेबाजीjailतुरुंगnagpurनागपूर